शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Atal Bihari Vajpayee Death:...अन् अटलजींनी कारमध्येच घेतले जेवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:08 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली.

परभणी : माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली. ही सभा आटोपल्यानंतर अटलजींना भूक लागली आणि त्यांनी जवळच्याच कार्यकर्त्यांना ‘अरे मुझे भूक लगी है’ असे सांगताच परभणीतील स्थानिक कार्यकर्त्यांची धावपळ झाली. एका कार्यकर्त्याने घरुनच आणलेल्या दोन पोळ्या आणि शिरा अटलजींनी चक्क रोल करुन कारमध्येच बसून खाल्ल्या, अशी आठवण येथील ज्येष्ठ पत्रकार व भाजपाचे तत्कालीन जिल्हा सरचिटणीस विजय जोशी यांनी ‘लोकमत’जवळ सांगितली.

तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या विषयींच्या आठवणींना उजाळा देताना विजय जोशी म्हणाले की, १९८२ मध्ये नुकतीच भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती आणि अध्यक्षपदाचा पदभार तत्कालीन माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होता. अटलजींची परभणीमध्ये सभा व्हावी, अशी माझी मनोमन इच्छा होती. त्यामुळे मी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस वसंतराव भागवत यांच्याकडे सभेचा आग्रह धरला आणि दिलेल्या शब्दानुसार अटलजींनी परभणीत सभा घेतली. परळी येथे कृषी मेळावा घेऊन अटलजी परभणीमार्गे नांदेडला जाणार होते. परभणीला ते चहाही घेणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. परभणीत अटलजींची झालेली ही सभा विक्रमी ठरली. 

परभणी येथील स्टेडियमच्या जागेवरील मैदानावर सायंकाळी ४ वाजता ते भाषणासाठी उभे राहिले. राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय विषयांपासून ते कार्यकर्ता कसा घडला पाहिजे, इथपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केले. तब्बल पावणे दोन तास मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना भूक लागली आणि त्यांनी जेवणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यावेळेचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणपतराव गव्हाणे यांनी तातडीने घरी जावून आणलेल्या पोळ्या आणि शिरा अटलजींनी कारमध्येच बसून खाल्ल्या. अशी आठवण सांगतानाच अटलजींच्या त्या सभेला झालेली गर्दी विक्रमी होती. अटलजींची ही परभणीतील एकमेव सभा असल्याचेही विजय जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानAIIMS hospitalएम्स रुग्णालय