शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Atal Bihari Vajpayee Death:...अन् अटलजींनी कारमध्येच घेतले जेवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:08 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली.

परभणी : माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली. ही सभा आटोपल्यानंतर अटलजींना भूक लागली आणि त्यांनी जवळच्याच कार्यकर्त्यांना ‘अरे मुझे भूक लगी है’ असे सांगताच परभणीतील स्थानिक कार्यकर्त्यांची धावपळ झाली. एका कार्यकर्त्याने घरुनच आणलेल्या दोन पोळ्या आणि शिरा अटलजींनी चक्क रोल करुन कारमध्येच बसून खाल्ल्या, अशी आठवण येथील ज्येष्ठ पत्रकार व भाजपाचे तत्कालीन जिल्हा सरचिटणीस विजय जोशी यांनी ‘लोकमत’जवळ सांगितली.

तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या विषयींच्या आठवणींना उजाळा देताना विजय जोशी म्हणाले की, १९८२ मध्ये नुकतीच भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती आणि अध्यक्षपदाचा पदभार तत्कालीन माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होता. अटलजींची परभणीमध्ये सभा व्हावी, अशी माझी मनोमन इच्छा होती. त्यामुळे मी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस वसंतराव भागवत यांच्याकडे सभेचा आग्रह धरला आणि दिलेल्या शब्दानुसार अटलजींनी परभणीत सभा घेतली. परळी येथे कृषी मेळावा घेऊन अटलजी परभणीमार्गे नांदेडला जाणार होते. परभणीला ते चहाही घेणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. परभणीत अटलजींची झालेली ही सभा विक्रमी ठरली. 

परभणी येथील स्टेडियमच्या जागेवरील मैदानावर सायंकाळी ४ वाजता ते भाषणासाठी उभे राहिले. राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय विषयांपासून ते कार्यकर्ता कसा घडला पाहिजे, इथपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केले. तब्बल पावणे दोन तास मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना भूक लागली आणि त्यांनी जेवणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यावेळेचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणपतराव गव्हाणे यांनी तातडीने घरी जावून आणलेल्या पोळ्या आणि शिरा अटलजींनी कारमध्येच बसून खाल्ल्या. अशी आठवण सांगतानाच अटलजींच्या त्या सभेला झालेली गर्दी विक्रमी होती. अटलजींची ही परभणीतील एकमेव सभा असल्याचेही विजय जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानAIIMS hospitalएम्स रुग्णालय