शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

Atal Bihari Vajpayee Death:...अन् अटलजींनी कारमध्येच घेतले जेवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:08 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली.

परभणी : माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली. ही सभा आटोपल्यानंतर अटलजींना भूक लागली आणि त्यांनी जवळच्याच कार्यकर्त्यांना ‘अरे मुझे भूक लगी है’ असे सांगताच परभणीतील स्थानिक कार्यकर्त्यांची धावपळ झाली. एका कार्यकर्त्याने घरुनच आणलेल्या दोन पोळ्या आणि शिरा अटलजींनी चक्क रोल करुन कारमध्येच बसून खाल्ल्या, अशी आठवण येथील ज्येष्ठ पत्रकार व भाजपाचे तत्कालीन जिल्हा सरचिटणीस विजय जोशी यांनी ‘लोकमत’जवळ सांगितली.

तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या विषयींच्या आठवणींना उजाळा देताना विजय जोशी म्हणाले की, १९८२ मध्ये नुकतीच भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती आणि अध्यक्षपदाचा पदभार तत्कालीन माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होता. अटलजींची परभणीमध्ये सभा व्हावी, अशी माझी मनोमन इच्छा होती. त्यामुळे मी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस वसंतराव भागवत यांच्याकडे सभेचा आग्रह धरला आणि दिलेल्या शब्दानुसार अटलजींनी परभणीत सभा घेतली. परळी येथे कृषी मेळावा घेऊन अटलजी परभणीमार्गे नांदेडला जाणार होते. परभणीला ते चहाही घेणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. परभणीत अटलजींची झालेली ही सभा विक्रमी ठरली. 

परभणी येथील स्टेडियमच्या जागेवरील मैदानावर सायंकाळी ४ वाजता ते भाषणासाठी उभे राहिले. राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय विषयांपासून ते कार्यकर्ता कसा घडला पाहिजे, इथपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केले. तब्बल पावणे दोन तास मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना भूक लागली आणि त्यांनी जेवणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यावेळेचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणपतराव गव्हाणे यांनी तातडीने घरी जावून आणलेल्या पोळ्या आणि शिरा अटलजींनी कारमध्येच बसून खाल्ल्या. अशी आठवण सांगतानाच अटलजींच्या त्या सभेला झालेली गर्दी विक्रमी होती. अटलजींची ही परभणीतील एकमेव सभा असल्याचेही विजय जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधानAIIMS hospitalएम्स रुग्णालय