शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

परभणीतून मदत :पूरग्रस्तांसाठी सरसावले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:52 IST

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तसेच वस्तू स्वरुपातील मदत कोल्हापूर, सांगलीकडे रवाना केली जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून अनेकांनी पुढाकार घेतला आहे़ काही सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी समोर येत पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली असून, थेट आर्थिक स्वरुपात तसेच वस्तू स्वरुपातील मदत कोल्हापूर, सांगलीकडे रवाना केली जात आहे़मागील आठवडाभरापासून कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे़ अनेक जण या पुरात अडकल्याने त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे़ पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ अन्न, पाण्याबरोबरच आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाल्याने या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परभणी जिल्ह्यामधून अनेक सेवाभावी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे़ येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, चतुरंग प्रतिष्ठान परभणी, मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी, शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांसाठी मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे़ कांतराव देशमुख यांच्या हस्ते या केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले़ यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक विजय कान्हेकर, अनिल जैन, विलास पानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ या संकलन केंद्रात १५ आॅगस्टपर्यंत मदत संकलित केली जाणार असून, १६ आॅगस्ट रोजी ती पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे़ पूरग्रस्तांसाठी परभणीकर नागरिकांनी मुक्त हस्ते मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले़ प्रा़ सचिन खडके यांनी सूत्रसंचालन केले़ विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविक केले़ कार्यक्रमास बालासाहेब फुलारी, रुस्तूमराव कदम, श्रीराम गर्जे, गंगाधर गायकवाड, धर्मराज शेजूळ, डॉ़ प्रशांत मेने, प्रा़ बी़पी़ कालवे, एकनाथराव मस्के, के़डी़ जाधव, प्रा़ डॉ़ भगवान पाटील, नितीन बावळे, डॉ़ रमेश भालेराव, विष्णू वैरागड, प्रा़ डॉ़ हनुमंत शेवाळे, प्रा़डॉ़ दत्ता चामले, प्रा़ डॉ़ अविनाश पांचाळ, प्रा़ श्याम पाठक आदींची उपस्थिती होती़शिक्षकांनीही घेतला पुढाकार४पूरग्रस्तांसाठी येथील शिक्षकांनीही मदतीसाठी कंबर कसली आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करीत ही मदत जमा करण्यात आली़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ गेट परिसरात जीवन उपयोगी वस्तू एकत्र करण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे़ बिस्कीट, फरसाण, राजगिरा लाडू, साबण, सॅनिटरी नॅपकीन, धान्य, तेल, कपडे, ब्लँकेट, साड्या, स्वेटर अशा स्वरुपात ही मदत जमा करून त्याचे पॅिक ंग करण्यात आले आहे़४तसेच पैशांच्या स्वरुपात जमा झालेल्या मदतीतून जीवन उपयोगी साहित्य खरेदी केले जाणार आहे़ मंगळवारी सकाळी हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली़ निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, डॉ़ केदार खटींग, डॉ़ मारोती हुलसुरे, रणजित कारेगावकर आदींनी या ठिकाणी भेट देऊन मदत देऊ केली़४या उपक्रमात अजय महाजन, संतोष चव्हाण, देवानंद शेटे, शरद लोहट, प्रा़ डॉ़ जयंत बोबडे, युवराज गरुड, सुनील कदम, गजानन चोपडे, सचिन गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, प्रेमदास राठोड, ज्योती चौंढे, अर्चना पावडे, सविता भाले, श्रेया बोबडे, सविता बोधने, राजश्री बनाळे, उषा मोतीपवळे, संजना लोकरे, जयश्री कदम आदींनी सहभाग नोंदविला़

टॅग्स :parabhaniपरभणीKolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगली