शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा जन्मस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर पाथरी संस्थांनकडून कृती समितीची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 17:35 IST

वादावर आता पाथरी येथील साईबाबा संस्थाननेसुद्धा कंबर कसली आहे.

ठळक मुद्देविकास आराखड्याला नाही मात्र जन्मभूमी म्हणण्याला विरोध जन्मभूमी बाबतच वाद का

पाथरी : साईबाबांच्या जन्मस्थळावरून शिर्डी येथील नागरिकांकडून सुरू झालेल्या वादावर आता पाथरी येथील साईबाबा संस्थाननेसुद्धा कंबर कसली आहे. गुरुवारी ( दि. १६ ) झालेल्या एका बैठकीत विश्वस्त संजय भुसारी यांनी शिर्डीतील वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी एका कृती समितीची घोषणा केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना पाथरीमधील साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता. मात्र शिर्डीतून या विकास आराखड्याला नाही मात्र जन्मभूमी म्हणण्याला विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर साई संस्थानचे विश्वस्त आमदार बाबाजानी दुर्राणी, संजय भुसारी, अतुल चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष ढगे ,मुंजाजी भाले पाटील व शहरातील व्यापारी, नागरिक, सर्वपक्षीय नेते यांची एक बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि विश्वस्त संजय भुसारे यांनी साई जन्मभूमी बाबत भूमिका विशद केली. तसेच बैठकीत कृती समितीची घोषणा करण्यात आली. शिर्डी येथील नागरिकांनी केलेल्या विरोधाला कुठल्याही हद्दीमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी कृती समिती असणार आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि  विश्वस्तांचा  समावेश आहे. बैठकीस दादासाहेब टेंगसे , सुभाष कोल्हे , अनिल नखाते ,चक्रधर उगले ,भावना नखाते,  शिवसेनेचे मुंजाभाऊ कोल्हे , अशोक गिराम, एकनाथ शिंदे , उपनगराध्यक्ष हनांन खान , गंगाधर गायकवाड ,  ऍड बी बी तळेकर  यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. 

जन्मभूमी बाबतच वाद कासाई बाबांची जन्मभूमी पाथरी असल्याचे अनेक पुरावे आहेत.  इतके वर्ष जन्मभूमी विकासापासून वंचित राहिली, राष्ट्रपती कोविंद यांच्या भेटीनंतर साई जन्मभूमीच्या विकासाला नवीन मार्ग  सापडला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी मंजूर केला असताना आताच साई बाबा जन्मभूमी बाबत वाद का निर्माण केला जात आहे. शिर्डीचे नागरिक म्हणत असतील साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाला नाही तर कोठे झाला हे सिद्ध करावा ? - आमदार बाबाजानी दुर्राणी

टॅग्स :saibabaसाईबाबाparabhaniपरभणीshirdiशिर्डी