शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शेतक-यांच्या पैशांवर अंबानींनी घातला दरोडा, परभणीत राजू शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 15:31 IST

शेतक-यांना विमा परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. 

परभणी- कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या सहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून शेतक-यांना विमा परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी येथे केला.

पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांनी रिलायन्स पीक विमा कंपनीविरूद्ध १३ दिवसांपासून आंदोलन उभे केले आहे़ खा़ राजू शेट्टी यांनी रविवारी या आंदोलकांची भेट घेतली़ शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगतानाच शेट्टी म्हणाले, पीक विम्या संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून, पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही नोंदविली आहे़.

परंतु, राज्य शासनातील मंत्री अंबानी यांच्या कार्पोरेट कंपनीसमोर गुडघे टेकत आहेत़ हा देश कार्पोरेट कंपनीला  गहान ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला़ रिलायन्स कंपनीने अनेक बोगस पंचनामे करून शेतक-यांच्या हक्काचा परतावा दिला नाही़ देशभरातून ९ हजार ४१ कोटी रुपये रिलायन्स विम्यापोटी जमा केले आणि परतावा मात्र केवळ ८१२ कोटी रुपयांचाच दिला आहे़ त्यामुळे ही प्रधानमंत्री पीक विमा नसून अंबानी कल्याण योजना असल्याचेच दिसत आहे़.

शेतक-यांचे कोट्यवधी रुपये लुटणाºया अंबानींच्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाºया शेतकºयांवर तांत्रिक मुद्दे काढून गुन्हे दाखल केले जात आहेत़ सत्ताधारी अंबानींना का सांभाळत आहेत़ अंबानींचा एवढा दरारा का ? असा सवाल करीत येत्या आठ दिवसांत परभणीतील पीक विमा प्रश्नी शेतकºयांना न्याय न दिल्यास अंबानींच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा खा़ राजू शेट्टी यांनी दिला़ यावेळी कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, स्वाभिमानी संघटनेचे माणिक कदम, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आदींची उपस्थिती होती़