शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

कृषी पदवीधारकांचा परभणीत मोर्चा; रखडलेली पदभरती तत्काळ करण्याची मागणी

By मारोती जुंबडे | Updated: May 27, 2025 13:30 IST

स्पर्धा मंचच्या वतीने मंगळवारी कृषी विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

परभणी: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदभरती प्रक्रियेविरोधात कृषी पदवीधारकांनी एकत्र येत आज दुपारी १२ वाजता परभणीत जोरदार मोर्चा काढला. स्पर्धा मंचच्या वतीने कृषी विद्यापीठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

परभणी कृषी विद्यापीठात गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली पदभरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. अनेक वर्षांपासून कृषी विद्यापीठांमध्ये कोणतीही नवीन भरती न झाल्यामुळे हजारो पदवीधारक बेरोजगार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, कृषी आचार्य पदवीधारक आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना कोणतीही पात्रता परीक्षा न घेता थेट पीएच.डी. फेलोशिप देण्यात यावी. तसेच राज्यातील शालेय शिक्षणात कृषी विषय अनिवार्य करावा आणि तो शिकवण्यासाठी केवळ कृषी पदवीधारकांनाच पात्र मानावे, या मागण्यांचाही समावेश होता. 

त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. इंद्र मणि आणि कुलसचिव संतोष वेणीकर यांच्याकडे सादर केले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान, कृषी पदवीधारकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनAgriculture Sectorशेती क्षेत्र