शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:58 IST

पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक ३६१.४०मिमीहंगामात जिल्ह्यात आतापर्यंत ३०३ मिमी पाऊस

परभणी : जिल्ह्यात बुधवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला असून, सरासरी १२.१६ मिमी पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे.जोरदार पावसाने पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला आहे.

आठवडाभरापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. बुधवारी रात्री सेलू तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक ४०.३३ मिमी  पाऊस झाला. त्याखालोखाल पूर्णा तालुक्यामध्ये २६.४० मिमी, गंगाखेड तालुक्यात १८ मिमी, जिंतूर ६.१७,  परभणी ६.८८ मिमी, सोनपेठ ७, मानवत आणि पाथरी तालुक्यात प्रत्येकी  २.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत ३०३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३६ टक्के  पावसाची नोंद झाली आहे.

पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक ३६१.४०मिमी तर गंगाखेड तालुक्यात सर्वात कमी २३४.७६ मिमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे परभणी २७१ मिमी, पालम ३४२ मिमी, जिंतूर २५४.६६ मिमी, सोनपेठ २५८, पाथरी ३३८मिमी आणि मानवत तालुक्यामध्ये ३१३ मिमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसfloodपूर