शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

तब्बल २२ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे पाणी पोहचले पाथरी टेलपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:19 IST

जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे.

ठळक मुद्देपाथरी उपविभागातील ७ शाखेअंतर्गत सिंचनासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला़ तब्बल २३ दिवस डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले़ १८ डिसेंबर रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात आले़ यावर्षी प्रथमच २२ वर्षानंतर तालुक्यातील शेवटच्या भागापर्यंत डाव्या कालव्याचे पाणी पोहचले आहे़

परभणी : जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे. 

पाथरी तालुक्यातील वरखेड येथील कालवा १२२ पासून सुरू होतो़ जायकवाडी उपविभाग पाथरी अंतर्गत ७ शाखांना डाव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचा लाभ होतो़ यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे़ जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे़ तालुक्यातील शेतकरी बोंडअळीग्रस्त कापसामुळे त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी कापूस उपटून ऊस पिकाची लागवड सुरू केली आहे़ याावर्षी पाणी मिळणार असल्याने यावर्षी ऊस क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे़ 

पाथरी उपविभागातील ७ शाखेअंतर्गत सिंचनासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी पहिल्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले़ तब्बल २३ दिवस डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले़ १८ डिसेंबर रोजी पहिले आवर्तन बंद करण्यात आले़ यावर्षी प्रथमच २२ वर्षानंतर तालुक्यातील शेवटच्या भागापर्यंत डाव्या कालव्याचे पाणी पोहचले आहे़ त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना २२ वर्षानंतर या पाण्याचा लाभ मिळाला आहे़ पाणी मिळाल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे़ यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नादुरुस्तीने वंचित

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाथरी तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येते़ तब्बल तीन वर्षे या भागाला पाणी मिळाले नव्हते़ अनेक वेळा जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्याने तर चार्‍या नादुरुस्त असल्याने शेवटपर्यंतच्या भागातील शेतकर्‍यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले होते़ 

२२ वर्षानंतर गुंज वितरिकेच्या गुंज, गौंडगाव, उमरा तर लिंबा वितरिकेच्या लिंबा, कानसूर, तारुगव्हाण, डाकु पिंप्री, कुंभारी वितरिकेच्या कुंभारी, मुदगल शिवारामध्ये  वितरिका ६१ वरील रामेटाकळी, वझूर या भागातील वितरिकेच्या शेवटच्या टोकाकडील शेतकर्‍यांना पाणी मिळाले आहे. या भागामध्ये अनेक वर्षानंतर शेतकर्‍यांनी ऊसाची लागवड सुरू केली आहे़ तसेच सिंचनाचे क्षेत्रही वाढणार असल्याने शेतकर्‍यांमधून समाधन व्यक्त होत आहे. 

दुरुस्ती आवश्यक जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून यावर्षी टेल भागातील शेतकर्‍यांना पाणी मिळाले आहे़ त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे़ जायकवाडी प्रशासनाने योग्य नियोजन केल्याचा हा परिणाम आहे़ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहचण्यासाठी उपचार्‍यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे़ - मुंजाभाऊ कोल्हे, शेतकरी, उमरा

नियोजन आहे पहिल्या पाणी आवर्तनानंतर ३० डिसेंबरपासून दुसर्‍या पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे़ हे पाणी टेल भागातून सोडले जाणार आहे़ - खारकर, उपअभियंता, पाथरी (जायकवाडी)

टॅग्स :water transportजलवाहतूकJayakwadi Damजायकवाडी धरणparabhaniपरभणी