शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत २८ मुले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:11 IST

बेवारस स्थितीत आढळलेली मुले, हरवलेली मुले, पालकांचा शोध न लागलेली मुले आणि नवजात बालकांना सोडून दिल्याने अनाथ झालेल्या मुलांसाठी ...

बेवारस स्थितीत आढळलेली मुले, हरवलेली मुले, पालकांचा शोध न लागलेली मुले आणि नवजात बालकांना सोडून दिल्याने अनाथ झालेल्या मुलांसाठी शासनाच्या वतीने बालगृह चालविले जाते. या बालगृहात मुलांचे संगोपन तर होतेच शिवाय जे दाम्पत्य या मुलांना दत्तम घेऊ इच्छितात त्यांना दत्तक म्हणूनही दिले जाते. मुलांची संपूर्ण काळजी घेण्याची शाश्वती निर्माण झाल्यानंतरच जिल्हा न्यायाधिशांच्या माध्यमातून दत्तक विधानकेल े जाते. या प्रक्रियेतून परभणी जिल्ह्यातील २८ मुलांचे पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. त्यातून अनाथ मुलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील वर्षाची तुलना करता दत्तक विधानचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवरीवरून दिसते. जिल्ह्यात परित्याग केलेल्या मुलांचाही बालकल्याण समिती सांभाळ करते. कुमारी मातेकडून बाळ बेवारस स्थितीत सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. कुमारी मातेने परित्याग केलेल्या बाळास स्वीकारून मातेची माहिती गोपनीय ठेवली जाते.

अशी आहे दत्तक विधान प्रक्रिया

शिशूगृहात बालक दाखल झाल्यानंतर बालकल्याण समितीच्या माध्यमातून दत्तक विधानमुक्त करण्याची प्रक्रिया राबविली जाते. या समितीने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्या बालकाला दत्तक दिले जाते. मुल दत्तक घेण्यासाठी देशपातळीवर सेंट्रल ॲडॉब्शन रिसोर्सेस ॲथॉरिटी हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर पालकांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यानंतर दत्तक घेण्यासाठी असलेल्या मुलांचे छायाचित्रे समोर दिसतात. या छायाचित्रातून आवडलेले मूल सलेक्ट केल्यास त्या मुलाचा पत्ता दिला जातो. पालकांच्या संपर्कानंतर जिल्हास्तरावर समिती पालकांची संपूर्ण माहिती घेते. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने दत्तक विधान होते.

मुलाबरोबरच मुलींनाही घेतले जाते दत्तक

मुलांबरोबरच मुलींनाही दत्तक घेणाऱ्या माता-पित्यांची संख्या अधिक आहे. दत्तक घेण्यासाठी मुलगाच हवा असा कोणताही आग्रह नसतो.

परंतु, मुल मिळाल्याचा आनंद या दाम्पत्याला अधिक असतो. त्यामुळे मुलगा दत्तक हवा अशा आग्रहाचे पालक कमी आहेत.

जिल्ह्यात मुलांबरोबरच मुलींचेही दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे दत्तक प्रक्रियेसाठी एकच ऑनलाईन संकेतस्थळ असल्याने देशातील कानाकोपऱ्यातून पालक येतात.

दत्तक घेण्यासाठी दोन-तीन हजारांची वेटींग

बालगृहांमध्ये दाखल झालेल्या बालकांना दत्तक घेण्यासाठी देशभरात दोन-तीन हजार नागरिकांची वेटींग असल्याचे संकेतस्थळावरून स्पष्ट होते. जिल्ह्यात बालगृहातील मुलांची संख्या प्रत्येक महिन्यात वेगवेगळी असली तरी दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. मागील वर्षी दोन मुले आणि मुलींना दत्तक घेण्यात आले आहे.

गैरकायदेशीर मार्गानेच मुलांना दत्तक देणे आणि घेणे हा गुन्हा ठरतो. त्यामुळे नागरिकांनी गैरकायदेशीर मार्गाने दत्तक प्रक्रिया करू नये. या प्रक्रियेसाठी असलेल्या कायदेशीर मार्गाचाच वापर करावा. त्यासाठी असलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच दत्तक विधान प्रक्रिया पूर्ण करावी.

-ॲड. संजय केकान, अध्यक्ष बालकल्याण समिती, परभणी