शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

सर्वसाधारण सभेच्या ठरावाला प्रशासनाने दाखविला कात्रजचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शासनाची फसवणूक करून नुकसान करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव घेऊनही अधिकाऱ्यांनी ...

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शासनाची फसवणूक करून नुकसान करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव घेऊनही अधिकाऱ्यांनी या निर्णयाला कात्रजचा घाट दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे.

जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या काही वर्षांत अलबेल झाला आहे. अधिकाऱ्यांच्या आर्थिक चुप्पीतून प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडत आहे. याकडे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे नुकसान होत आहे. जि. प. प्रशासनातील असाच एक निष्क्रियतेचा कळस गाठणारा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागांतर्गत परभणी तालुक्यातील दैठणा येथे सिमेंट नाला बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे काम निश्चित केलेल्या मानकानुसार झाले की नाही, हा वेगळा विषय असला तरी प्रत्यक्ष हे काम निविदा प्रक्रियेनुसार कोणी केले आणि त्याची देयके कोणाच्या खात्यात जमा करण्यात आली, हा बऱ्याच दिवसांपासून जि. प.च्या वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. उपलब्ध कागदपत्रानुसार हे काम सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथील अण्णा भाऊ साठे मजूर सहकारी सोसायटीला देण्यात आले होते; परंतु जि. प.च्या लेखा विभागाने या कामाची १० लाख १८ हजार ९६९ रुपयांची देयके के. व्ही. कच्छवे, न्यू महाराणा कन्स्ट्रक्शनच्या खात्यात ११ जुलै २०१७ रोजी जमा केली. याबाबत अण्णा भाऊ साठे मजूर सहकारी सोसायटीचे साहेबराव ताटे यांनी ११ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. त्यानंतर जि. प.ने कंत्राटदार कच्छवे यांना पत्र पाठवून ही रक्कम चुकून न्यू महाराणा कन्स्ट्रक्शनच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे ती ११ जुलै २०१७ ते ३० ऑगस्ट २०१८ या कालावधीतील व्याजासह परत करण्याचे पत्र दिले. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०१८ रोजी वर्षभरानंतर न्यू महाराणा कन्स्ट्रक्शनने ही रक्कम जि. प.ला परत केली; परंतु त्यावरील व्याज परत दिले नाही. या प्रकरणी न्यू महाराणा कन्स्ट्रक्शनचे बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून या संस्थेस काळ्या यादीत टाकावे व संबंधितावर गुन्हा दाखल करावा, असा ठराव जि. प.च्या सर्वसाधारण सभेत एका सभापतींच्या तक्रारीनंतर घेण्यात आला. त्यानंतर स्थायी समितीच्या २५ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीतही याबाबत ठराव घेण्यात आला. या प्रक्रियेस १६ दिवस उलटले तरी या प्रकरणी जि. प. प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे जि. प. प्रशासनाने सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीस सध्या तरी कात्रजचा घाट दाखविल्याचे दिसून येत आहे.