शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

प्रशासनाकडे उपलब्ध नाही जुन्या खत साठ्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खत, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागच्या दोन दिवसांपासून मोंढा ...

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खत, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागच्या दोन दिवसांपासून मोंढा बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. यावर्षी खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिल्लक असलेला जुना खत साठा जुन्याच दराने विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यात जुन्या खताचा किती साठा उपलब्ध आहे, तो कोणाकडे आहे, याविषयीची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. वारंवार ही माहिती मागवूनही उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे जुन्या खताची माहितीच नसेल तर त्याविरुद्ध कारवाई कशी करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे बाजारपेठेत सर्रास जुने खत नवीन दराने विक्री केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यावर्षी खताच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने जुना खत साठा किती आहे? आणि तो कुठे उपलब्ध आहे? त्याची माहिती जाहीर करावी आणि जुन्याच दराने या खताची विक्री होईल, या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खताची कृत्रिम टंचाई

येथील बाजारपेठेत आतापासूनच खताची कृत्रिम टंचाई केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे शेतकर्‍यांना हवे असलेले खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आतापासूनच खताची साठेबाजी करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. तेव्हा कृषी विभागाने याबाबतही तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

१ लाख १७ हजार मे. टन आवंटन मंजूर

जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख ५४ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यातून एप्रिल महिन्यामध्ये १ लाख १७ हजार ८८० मे. टन आवंटन मंजूर करण्यात आले. १ एप्रिल रोजी जिल्ह्यामध्ये १४६५० मे. टन खत उपलब्ध होते. १ ते १५ एप्रिल या काळात २४ हजार २६० मे. टन खताचा पुरवठा करण्यात आला. उपलब्ध असलेल्या ३८ हजार ९१० मे. टनांपैकी १३८४ मे. टन खताची विक्री झाली. सध्या ३७ हजार ६५२ मे. टन खत शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली आहे.