शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

परभणी जिल्ह्यात रबीची ७५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:46 AM

यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवातीला जुलै आणि आॅगस्ट महिन्यामध्ये पावसाने जिल्ह्यामध्ये उघडीप दिली होती. त्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके शेतकºयांची हातची गेली होती. मात्र जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने विहीर, नदी, नाले आणि बोअरला मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले.१८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये २ लाख ९५ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामध्ये ९२ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, २६ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर गहू तसेच ८५ हजार ८१४ हेक्टरवर हरभरा, २ हजार ३५१ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असल्याने यावर्षीच्या रबी हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे.जायकवाडी, निम्न दुधनाचा शेतकºयांना झाला फायदा४जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबरपर्यंत २ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरणीपूर्ण झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने जायकवाडी धरणे १०० टक्के तर निम्न दुधना प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे या पाण्याचा रब्बी हंगामात वापर होऊ शकतो, या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली आहे. जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे एकदा तसेच निम्न दुधना प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे आणि दुधना नदीच्या पात्रातून असे दोनदा पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उत्पन्न वाढीसाठी शेतकºयांना मोठा फायदा होणार आहे.