शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

जिल्ह्यात ६७६ नवे रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोनाने जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याने नागरिकांची धास्तीही ...

मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोनाने जिल्हावासीयांना त्रस्त करून सोडले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याने नागरिकांची धास्तीही वाढली आहे. आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही हा संसर्ग कमी होत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील १२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील दहा आणि खासगी रुग्णालयातील दोन रुग्णांचा यात समावेश आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. दररोज १० ते १५ रुग्ण दगावत असल्याने आता नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाला गुरुवारी १ हजार ८८३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार २५ अहवालांमध्ये ३४३ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टच्या ८५८ अहवालांमध्ये ३३३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ हजार ५०२ झाली आहे. त्यापैकी १७ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ५९१ वर पोहोचली आहे. सध्या ५ हजार ४३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात १४७, आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये १३५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २३१, अक्षदा मंगल कार्यालयात १२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे ४ हजार २५९ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात आहेत. उर्वरित रुग्ण परभणी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

५२२ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील ५२२ रुग्णांनी गुरुवारी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने आरोग्य विभागाने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. मागील तीन दिवसांपासून दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांची सुटी होत आहे, ही समाधानाची बाब आहे.