शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाच हजार शेतकऱ्यांना नाकारली गारपिटीची नुकसान भरपाई; अडीच कोटीचा बसला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:51 IST

जिंतूर तालुक्यामध्ये फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता.

- विजय चोरडिया

जिंतूर (परभणी ) : तालुक्यामध्ये फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना २ कोटी ६६ लाखांचा फटका बसला होता. प्रशासनाने पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता; परंतु, शासनाने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान मिळण्याच्या आशा आता मावळल्या आहेत.

जिंतूर तालुक्यात फेब्रुवारी, मार्च २०१६ मध्ये १८ गावांत मोठी गारपीट झाली होती. यामध्ये हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने त्यावेळी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले होते. मदतीसाठी जिरायत क्षेत्र ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर व फळ पिके १८ हजार रुपये प्रती हेक्टर मदत मिळावी, म्हणून शासनाकडे प्रस्तावही पाठविला होता. 

या गारपिटीमध्ये सावंगी म्हाळसा या गावातील ५७३ शेतकऱ्यांचे १९ लाख ७१ हजार ७२०, मुरूमखेडा २३ शेतकऱ्यांचे १ लाख ७९ हजार, किन्ही येथील १४९ शेतकऱ्यांचे ४ लाख ५२ हजार, हिवरखेडा येथील २५८ शेतकऱ्यांचे ९ लाख ३ हजार, दाभा येथील ३५१ शेतकऱ्यांचे २७ लाख १६ हजार, डिग्रस येथील ५१० शेतकऱ्यांचे ४० लाख ७९ हजार, सायखेडा येथील १८२ शेतकऱ्यांचे ४ लाख ८२ हजार, केहाळ येथील १ हजार ६२ शेतकऱ्यांचे ६१ लाख ९९ हजार, सावळी येथील ६८१ शेतकऱ्यांचे ३२ लाख ५२ हजार, घडोळी येथील २८६ शेतकऱ्यांचे १३ लाख ४ हजार, बामणी येथील ३८६ शेतकऱ्यांचे ६ लाख ३७ हजार, चौधरणी येथील ४० शेतकऱ्यांचे २ लाख ६१ हजार, कवठा बदनापूर येथील ५८ शेतकऱ्यांचे ९७ हजार, कोलपा येथील १३ शेतकऱ्यांचे १३ हजार, उमरद येथील २०३ शेतकऱ्यांचे ११ लाख ९५ हजार, बेलखेडा येथील ८९ शेतकऱ्यांचे ६ लाख ७२ हजार असे एकूण ४ हजार ६७४ शेतकऱ्यांचे २ कोटी ६७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. 

या गारपिटीमध्ये २ हजार ९०१ हेक्टर जिरायत, ४१४ हेक्टर बागायत व ७७ हेक्टर फळ पिके असे एकूण ३ हजार ३९३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होेते. यामध्ये जिरायत शेतकऱ्यांना १ कोटी ९७ लाख ३२ हजार, बागायतदारांना ५५ लाख ९६ हजार व फळ पिकांना १२ लाख ८३ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार होती; परंतु, राज्य शासनाने या लाभार्थ्यांना २०१५ ला खरिपाचे अनुदान मिळाले. ही सबब पुढे करून मार्च २०१६ च्या गारपिटीचे अनुदान देण्यास नकार दिला आहे. यामुळे या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे.

केहाळ, डिग्रसचे सर्वाधिक नुकसान४२०१६ मध्ये झालेल्या गारपिटीमध्ये तालुक्यातील केहाळ, डिग्रस या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. केहाळ येथील १ हजार ६२ शेतकऱ्यांचे ६२ लाखांचे तर डिग्रस येथील ५१० शेतकऱ्यांचे ४० लाख ७९ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे ही दोन्ही गावे गारपिटीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना मदत मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे या शेतकऱ्यांना आपल्या मदतीवर पाणी फेरावे लागल्याचे दिसून येत आहे. 

पाठपुरावा करणार जिंतूर विधानसभा मतदार संघातील १८ गावांतील ५ हजार शेतकऱ्यांना गारपिटीची मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व शासन दरबारी या प्रकरणाचा पाठपुरावा करून आपद्ग्रस्तांना मदत मिळवून देऊ.-विजय भांबळे, आमदार जिंतूर-सेलू मतदार संघ

गावांना मदत देता आली नाहीराज्य शासनाने १० मार्च २०१६ ला परिपत्रक पाठवून जी गावे दुष्काळमुक्त यादीत आहेत व ज्या गावांना अनुदान मिळालेले आहे, अशा गावांना परत मदतीसाठी ग्राह्यधरू नये, असे आदेश असल्याने या गावांना मदत देता आली नाही. - सुरेश शेजूळ, तहसीलदार 

टोलवाटोलवीची उत्तरे दिलीया संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा केला; परंतु, सतत प्रशासनाने आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरे दिली. या गारपिटीमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत, आम्हाला मदत मिळाली नाही तर मोठे आर्थिक संकट गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभे राहणार आहे.- प्रभाकर चव्हाण, शेतकरी

टॅग्स :HailstormगारपीटFarmerशेतकरीagricultureशेतीcollectorतहसीलदारAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा