शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बँकेच्या सभासदांकडे २२ वर्षांपासून ४३ कोटींची वसुली थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:39 IST

भूविकास बँकेच्या माध्यमातून सातबारावर बोजा टाकून कर्ज पुरवठा केला जात होता.

ठळक मुद्दे१९९८ पासून कर्जवाटप बंदवसुलीसाठी आता ओटीएस योजना

परभणी : जिल्ह्यातील भूविकास बँकांच्या थकबाकीदार सभासदांकडील कर्जाचा डोंगर ४३ कोटींवर पोहचला असून, तब्बल २२ वर्षांपासून थकबाकी असल्याने आता शासनाने ओटीएस योजना सुरू केली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भूविकास बँकेच्या माध्यमातून सातबारावर बोजा टाकून कर्ज पुरवठा केला जात होता. शेतकऱ्यांसाठी भूविकास बँक पैसा उपलब्ध करून देणारी बँक ठरली होती. मात्र बँकेकडील कर्जाचा डोंगर वाढत गेला. साधारणत: ४३ कोटी रुपयांचे कर्ज थकले असून, या कर्जाच्या वसुलीसाठी सहकार विभागाने आता एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत थकबाकीदार सभासदांकडील १ एप्रिल २००४ रोजी शिल्लक असलेली मुद्दल आणि त्यावर केवळ ६ टक्के सरळ व्याजाने कर्ज भरणा करून खाते बंद करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. योजनेंतर्गत आतापर्यंत २ हजार १०४ सभासदांनी ७ कोटी ३५ लाख रुपयांच्या कर्जाचा भरणा केला आहे. यात शेतकऱ्यांना शासनाकडून १३ कोटी ७० लाख रुपयांची व्याजाची सवलत देण्यात आली आहे. 

सध्या  १ हजार ९०० सभासद थकबाकीदार असून, योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या सभासदांनी एक रकमी कर्जपरत फेड केल्यास त्यांचा फायदा होणार आहे. परभणी येथील बँकेच्या मुख्य शाखेत शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक एम.बी. सुरवसे यांनी केले आहे. आतापर्यंत थकलेल्या या कर्जाचा बोजा या योजनेत कितपत कमी होतो? हे ३१ मार्च २०२१ नंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी ही बँक बंद असतानाही सभासदांकडे मात्र बँकेकडून घेतलेली थकबाकी वसूल करण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू आहे. 

१९९८ पासून कर्जवाटप बंदभूविकास बँक बंद झाली असून, १९९८ पासून बँकेने कर्ज वाटपच बंद केले होते. त्यामुळे जे थकबाकीदार शेतकरी आहेत ते सर्व १९९८ पूर्वीचे आहेत.  विशेष म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये काही जण १९७० पासून थकाबीदार असल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्ह्यामध्ये या बँकेच्या ९ शाखा होत्या. या सर्व शाखा आता बंद करण्यात आल्या असून, परभणी येथील मुख्य कार्यालयात ९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत वसुलीचे प्रयत्न होत आहेत. इलेक्ट्रीक मोटार, नवीन विहीर, पाईपलाईन, ट्रॅक्टर खरेदी, दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालन अशा विविध सुविधांसाठी भूविकास बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. राज्य शासनाने पीक कर्जासाठीची कर्जमाफी दिली असली तरी भूविकास बँकेच्या कर्जांना अद्यापपर्यंत माफी दिली नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढत आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँकfundsनिधी