शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

३५ हजार शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST

जिंतूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये ...

जिंतूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे शेतकरी कर्जमुक्त झाले असल्याची माहिती सहायक निबंधक आसाराम गुशिंगे यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. यामध्ये ४० हजार ४६३ शेतकऱ्यांपैकी ३८ हजार १९१ शेतकऱ्यांचा समावेश होता. यातील ३६ हजार ६४४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यातील ३५ हजार ३९१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०२ कोटी ६९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हे ३५ हजार ३९१ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील एक हजार ५४८ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असतानाही त्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतलेले नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे योजनेसाठी पात्र प्रत्येक लाभार्थींनी आधार प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक आहे. या संदर्भात अनेकवेळा सुचित करण्यात आले असल्याचे सहायक निबंधक गुशिंगे यांनी सांगितले. कर्जमुक्त ठरलेल्या लाभार्थींना खरीप हंगामात बँकांकडून नव्याने कर्जही देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. ज्यांचे प्रमाणिकरण झाले नाही, त्यांना मात्र नवीन कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

४७२ शेतकऱ्यांच्या तक्रारी

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत तालुक्यातील ४७२ शेतकऱ्यांनी विविध प्रकरणांतर्गत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार संबंधित समितीकडे २२ तक्रारी प्रलंबित आहेत, तर १४५ शेतकऱ्यांच्या तक्रारीचे तहसीलदारांकडून निवारण करण्यात आले असल्याची माहिती सहायक निबंधक गुशिंगे यांनी दिली.