शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

परभणी जिल्ह्यात महिनाभरानंतर खरीप हंगामातील ३५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:08 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़; परंतु, अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे़ २ जुलैपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७७ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३४़१० टक्के पेरणी झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़; परंतु, अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे़ २ जुलैपर्यंत जिल्ह्यात १ लाख ७७ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३४़१० टक्के पेरणी झाली आहे़गतवर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने नियोजित केलेल्या जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पुर्णपणे पेरणी झाली होती; परंतु, जून व जुलै या दोन महिन्यात झालेल्या कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांची पिके चांगलीच बहरली़ त्यानंतर मात्र पूर्ण पावसाळा कोरडा गेला़ त्यामुळे शेतकºयांची बरहलेली पिके जागेवरच करपून गेली़ रबी हंगामात तर शेतकºयांनी पेरणीच केली नाही़ त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या गंभीर दुष्काळी यादीमध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश झाला़ त्यानंतर उर्वरित तीन तालुक्यांत सर्वसाधारण दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले़ दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांचा आर्थिक संकटाशी सामना सुरूच असताना यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला़ उसणवारी व बँकांच्या दारात उभे राहून शेतकºयांनी खरीप हंगाम २०१९-२० मधील पेरणीसाठी बाजारपेठेतून बी-बियाणे खरेदी केले आहे़ यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़ आतापर्यत जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी १०० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु, जून महिना पूर्णत: कोरडा गेला आहे़ जुलै महिन्याचे सात दिवस उलटले आहेत़ तरीही अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे जिल्ह्यात २ जुलैपर्यंत केवळ १ लाख ७७ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३४़१० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़यामध्ये ९७ हजार ५३५ हेक्टरवर कापूस तर ५८ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे़ अजूनही ६५ टक्के शेतकरी पेरणीपासून वंचित आहेत़ येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर दुष्काळी स्थिती यावर्षीही निर्माण होते की काय? असा प्रश्न शेतकºयांना पडू लागला आहे़शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षापावसाळा सुरू होवून जून महिना पूर्ण उलटला आहे़ जुलै महिना सुरू होवून सात दिवस पूर्ण झाले आहेत; परंतु, दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत़ येत्या चार दिवसांत जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस व्हावा, यासाठी शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ काही ठिकाणी तर पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी