शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरातून २२ टिप्पर गेले चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:34 IST

शहरातील विविध भागातून गेल्या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीस गेले असून यातील एकाही टिप्परचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील विविध भागातून गेल्या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीस गेले असून यातील एकाही टिप्परचा तपास लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.परभणी शहरात गेल्या दीड वर्षापासून टिप्पर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. या संदर्भात पोलिसांत तक्रार देऊनही फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा प्रकार समोर येत आहे. या दीड वर्षात तब्बल २२ टिप्पर चोरीला गेले आहेत.विशेष म्हणजे टिप्पर चोरणारी पर जिल्ह्यतील टोळी शहरात कार्यरत असून या टोळीला स्थानिक काही व्यक्तींची मदत असल्याचे टिप्पर चालकांचे म्हणणे आहे. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर प्रारंभी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली जाते. नंतर तक्रार दाखल करण्यासाठी तगादा लावल्यास तक्रार नोंद करुन घेण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. तपास मात्र केला जात नसल्याचा अनुभव टिप्पर चालकांनी व्यक्त केला आहे. सर्वसामान्य टिप्पर चालकांना याबाबतचा अनुभव येत असताना राजकीय नेत्यांच्या धाकांमुळे एक- दोघांचे चोरीला गेलेले टिप्पर सापडल्याचाही अनुभव काहींनी व्यक्त केला.टिप्पर चोरीची नुकतीच एक घटना शहरातील काद्रबाद प्लॉट भागात घडली. शंकर किशनराव नाईकनवरे यांचे एम.एच.१७ ए ६२४७ या क्रमांचे टिप्पर १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सरकारी दवाखान्याजवळील त्यांच्या घर परिसरात उभे केले असता अज्ञात व्यक्तींनी ते चोरुन नेले. याबाबत त्यांनी २० नोव्हेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु, तक्रारीमध्ये टिप्परची किंमत फक्त ५० हजार रुपये दर्शविली गेली. अधिक रक्कम तक्रारीत दर्शविल्यास वरिष्ठ अधिकाºयांकडून तपासासाठी विचारणा होईल म्हणून या वाहनाची कमी रक्कम पोलिसांनी नोंदविली गेली असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले. याबाबत वारंवार विनंती करुनही वेगाने तपास केला जात नसल्याचे ते म्हणाले.चोरलेले टिप्पर भंगारात४टिप्पर चोरणारी परजिल्ह्यातील एक टोळीच कार्यरत असून त्यांना स्थानिकांची मदत असल्याचे जाणकारांनी सांगितले. बहुतांश वेळा चोरुन नेलेला टिप्पर तोडून तो भंगारात विकला जातो किंवा परभणीपासून १०० ते २०० कि.मी.अंतरावर असलेल्या भागात तो विक्री करुन खदानीच्या कामासाठी नंबर प्लेट न लावता वापरला जातो, असेही जाणकारांचे मत आहे. टिप्पर चोरीच्या घटना मध्यरात्री होत असताना गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास ही बाब कशी काय येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.