शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मानवत तालुक्यात २१०० शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:45 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार अनुदान जाहीर केले होते.

ठळक मुद्देसात महिन्यांचा कालावधी उलटूनही मिळेना रक्कम१० हजार रुपयांपर्यंत मिळणार अनुदान

मानवत (परभणी ) :  तूर विक्री करण्यासाठी तालुक्यातील ३१५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यामधील केवळ ८४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या मात्र तूर विक्री करता न आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले; परंतु, हे अनुदान प्रत्यक्षात कधी मिळणार याची २१९७ शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र सात  महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर ही शेतकऱ्यांना मदत देण्याचा सोयीस्कर  विसर राज्य शासनाला पडला आहे. 

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय  हमीभाव केंद्रावर विदर्भ को. आॅपरेटिव्ह फेडरेशन यासाठी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी लागणारे पीक पेरा, सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक, अशी कागदपत्रे एकत्र करुन नोंदणी केली होती. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला होता. अनेक दिवसाची वाट पाहिल्यानंतर मानवत आणि पाथरी तालुक्यातील तूर खरेदीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर करुन ९ फेब्रुवारी २०१८  ला हमीभाव केंद्रावर विदर्भ फेडरेशन ने  तूर खरेदीला सुरवात केली  होती . तालुक्यातील ३१५० शेतकऱ्यांनी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. शेतकऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करुन तूर घेऊन येण्याच्या सूचना केल्या जात होत्या. टप्याटप्याने खरेदी विक्री संघाकडून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना संदेश पाठवून तूर विक्रीसाठी आणण्याचे अवाहन केले होते. ६ एप्रिल अखेर ४५७ शेतकऱ्यांची एकूण ६ हजार ७८१ क्विंटल तूर विदर्भ फेडरेशनने खरेदी केली होती. त्यानंतर खरेदीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणखी ३९४  शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. अशी एकूण नोंदणी केलेल्या ८४४  शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २२०० शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक राहीलेली होती. दरम्यान,  तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी उशिरा आॅनलाईन नोंदणी केल्यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या ३ हजारांवर  गेली होती. त्यावेळी  बाजार पेठेत ४३०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. तर हमीभाव केंद्रावर ५ हजार ४५० भाव आहे. आर्थिक फायदा होत असल्यामुळे शेतकरी हमी भाव केंद्रावर तूर विक्री करण्यावर ठाम होते. मात्र उर्वरीत २१९७ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी झालीच नाही. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार अनुदान जाहीर केले होते. मात्र ८  महिन्यांचा कालावधी उटून गेल्यानंतरही जाहीर केलेले अनुदान देण्यासाठी राज्य सरकार उदासीन असल्याचे चित्र आहे. 

१० हजार रुपयांपर्यंत मिळणार अनुदान

ज्या शेतकऱ्यांची तूर, हरभरा विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी झालेली होती; परंतु, मुदतीत खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर ही खरेदी होवू शकली नाही. अशा शेतकऱ्यांना १० क्विंटल प्रती हेक्टरी मर्यादित प्रती क्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून ५ मे २०१८ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठक  करण्यात आली होती. या संदर्भातही संथगतीने यंत्रणा काम करत आहे. या अनुदानाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावर्षी पाउस न बरसल्याने पीक आले नाही. त्यातच अनुदान मिळेना, अशी दुहेरी अडचण शेतकऱ्यांची झाली आहे. शासकीय हमीभाव केंद्रावर विकलेल्या मालाची हक्काची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे बळीराजाची सध्याची विवंचना पाहता ही हक्काची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :fundsनिधीparabhaniपरभणीFarmerशेतकरी