शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

परभणी जिल्ह्यातील १७० गावे झाली ‘जलयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:01 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.राज्य शासनाने २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यात टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १७० गावांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सेलू तालुक्यातील १९, जिंतूर तालुक्यातील २६, पालम तालुक्यातील १३, गंगाखेड तालुक्यातील २४, मानवत तालुक्यातील १७, सोनपेठ तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील १२, परभणी तालुक्यातील ३४ व पाथरी तालुक्यातील ४ गावांचा समावेश करण्यात आला होता. या गाव शिवारात सिमेंटनाला बांध, कोल्हापुरी बंधारे, नदी, ओढे खोलीकरण, सलग समतलस्तर, विहीर पूनर्भरण, ढाळीचे बांध, मातानाला बांध, शेततळे आदी कामे करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ६ हजार ६१६ कामे करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ही कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ७५५ ढाळीचे बांध उभारण्यात आले. त्यावर १३ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. १४६ सलग समतलस्तर तयार करण्यात आले.७५ मातीनाला बांधाची कामे पूर्ण करण्यात आली. जिल्हाभरातील एकूण ६ हजार ६१६ कामांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. याबाबतचा अहवालही आता राज्य शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर राज्यशासनाने ही गावे जलयुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या गावांमध्ये आता पुढील किमान तीन वर्षे तरी जलसंधारणाची कामे घेता येणार नसल्याचे समजते.गतवर्षीच्या कामांना मार्चपर्यंत मुदतवाढ२०१५-१६ ची कामे पूर्ण झाली असून २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानांर्गत जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली होती. जून २०१७ पर्यंत या गावांमध्ये कामे पूर्ण होेणे आवश्यक होते. जवळपास ६ हजार कामे यासाठी निश्चित करण्यात आली होती. परंतु, साडे तीन हजार कामांचे आराखडेच जून २०१७ पर्यंत तयार झाले नव्हते.या संदर्भात जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी आढावा बैठक घेऊन विविध यंत्रणांच्या अधिकाºयांना धारेवर धरले. त्यानंतर कामांचे आराखडे तयार करण्यात आले. आराखडे तयार करण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत चालले. त्यानंतर या कामांना आता कुठे सुरुवात झाली. सद्यस्थितीत शेतींमध्ये पिके उभी असल्याने कामांना अडचणी येत असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. ही बाब विचारात घेऊन या कामांना मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यावर्षीच्या कामांना पुढील वर्षीच मुहूर्तगतवर्षीचीच कामे यावर्षी पूर्ण झाली नसल्याने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता निवडलेल्या १२८ गावांतील कामांना पुढील आर्थिक वर्षातच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. २०१६-१७ मधील कामे मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मनसुबा संबंधित यंत्रणांनी बाळगल्याने यावर्षीच्या कामांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. परिणामी २०१६-१७ मधील कामाच्या दिरंगाईचा फटका २०१७-१८ मध्ये निवडलेल्या गावांना बसणार आहे.