शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील १७० गावे झाली ‘जलयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:01 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.राज्य शासनाने २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यात टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १७० गावांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सेलू तालुक्यातील १९, जिंतूर तालुक्यातील २६, पालम तालुक्यातील १३, गंगाखेड तालुक्यातील २४, मानवत तालुक्यातील १७, सोनपेठ तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील १२, परभणी तालुक्यातील ३४ व पाथरी तालुक्यातील ४ गावांचा समावेश करण्यात आला होता. या गाव शिवारात सिमेंटनाला बांध, कोल्हापुरी बंधारे, नदी, ओढे खोलीकरण, सलग समतलस्तर, विहीर पूनर्भरण, ढाळीचे बांध, मातानाला बांध, शेततळे आदी कामे करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ६ हजार ६१६ कामे करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ही कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ७५५ ढाळीचे बांध उभारण्यात आले. त्यावर १३ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. १४६ सलग समतलस्तर तयार करण्यात आले.७५ मातीनाला बांधाची कामे पूर्ण करण्यात आली. जिल्हाभरातील एकूण ६ हजार ६१६ कामांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. याबाबतचा अहवालही आता राज्य शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर राज्यशासनाने ही गावे जलयुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या गावांमध्ये आता पुढील किमान तीन वर्षे तरी जलसंधारणाची कामे घेता येणार नसल्याचे समजते.गतवर्षीच्या कामांना मार्चपर्यंत मुदतवाढ२०१५-१६ ची कामे पूर्ण झाली असून २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानांर्गत जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली होती. जून २०१७ पर्यंत या गावांमध्ये कामे पूर्ण होेणे आवश्यक होते. जवळपास ६ हजार कामे यासाठी निश्चित करण्यात आली होती. परंतु, साडे तीन हजार कामांचे आराखडेच जून २०१७ पर्यंत तयार झाले नव्हते.या संदर्भात जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी आढावा बैठक घेऊन विविध यंत्रणांच्या अधिकाºयांना धारेवर धरले. त्यानंतर कामांचे आराखडे तयार करण्यात आले. आराखडे तयार करण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत चालले. त्यानंतर या कामांना आता कुठे सुरुवात झाली. सद्यस्थितीत शेतींमध्ये पिके उभी असल्याने कामांना अडचणी येत असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. ही बाब विचारात घेऊन या कामांना मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यावर्षीच्या कामांना पुढील वर्षीच मुहूर्तगतवर्षीचीच कामे यावर्षी पूर्ण झाली नसल्याने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता निवडलेल्या १२८ गावांतील कामांना पुढील आर्थिक वर्षातच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. २०१६-१७ मधील कामे मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मनसुबा संबंधित यंत्रणांनी बाळगल्याने यावर्षीच्या कामांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. परिणामी २०१६-१७ मधील कामाच्या दिरंगाईचा फटका २०१७-१८ मध्ये निवडलेल्या गावांना बसणार आहे.