शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील १७० गावे झाली ‘जलयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:01 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत खर्च झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.राज्य शासनाने २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यात टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १७० गावांची निवड करण्यात आली. त्यामध्ये सेलू तालुक्यातील १९, जिंतूर तालुक्यातील २६, पालम तालुक्यातील १३, गंगाखेड तालुक्यातील २४, मानवत तालुक्यातील १७, सोनपेठ तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील १२, परभणी तालुक्यातील ३४ व पाथरी तालुक्यातील ४ गावांचा समावेश करण्यात आला होता. या गाव शिवारात सिमेंटनाला बांध, कोल्हापुरी बंधारे, नदी, ओढे खोलीकरण, सलग समतलस्तर, विहीर पूनर्भरण, ढाळीचे बांध, मातानाला बांध, शेततळे आदी कामे करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ६ हजार ६१६ कामे करण्याचा आराखडा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार ही कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ७५५ ढाळीचे बांध उभारण्यात आले. त्यावर १३ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. १४६ सलग समतलस्तर तयार करण्यात आले.७५ मातीनाला बांधाची कामे पूर्ण करण्यात आली. जिल्हाभरातील एकूण ६ हजार ६१६ कामांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. याबाबतचा अहवालही आता राज्य शासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर राज्यशासनाने ही गावे जलयुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या गावांमध्ये आता पुढील किमान तीन वर्षे तरी जलसंधारणाची कामे घेता येणार नसल्याचे समजते.गतवर्षीच्या कामांना मार्चपर्यंत मुदतवाढ२०१५-१६ ची कामे पूर्ण झाली असून २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानांर्गत जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली होती. जून २०१७ पर्यंत या गावांमध्ये कामे पूर्ण होेणे आवश्यक होते. जवळपास ६ हजार कामे यासाठी निश्चित करण्यात आली होती. परंतु, साडे तीन हजार कामांचे आराखडेच जून २०१७ पर्यंत तयार झाले नव्हते.या संदर्भात जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी आढावा बैठक घेऊन विविध यंत्रणांच्या अधिकाºयांना धारेवर धरले. त्यानंतर कामांचे आराखडे तयार करण्यात आले. आराखडे तयार करण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत चालले. त्यानंतर या कामांना आता कुठे सुरुवात झाली. सद्यस्थितीत शेतींमध्ये पिके उभी असल्याने कामांना अडचणी येत असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. ही बाब विचारात घेऊन या कामांना मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यावर्षीच्या कामांना पुढील वर्षीच मुहूर्तगतवर्षीचीच कामे यावर्षी पूर्ण झाली नसल्याने २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता निवडलेल्या १२८ गावांतील कामांना पुढील आर्थिक वर्षातच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. २०१६-१७ मधील कामे मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मनसुबा संबंधित यंत्रणांनी बाळगल्याने यावर्षीच्या कामांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. परिणामी २०१६-१७ मधील कामाच्या दिरंगाईचा फटका २०१७-१८ मध्ये निवडलेल्या गावांना बसणार आहे.