शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

पहिल्याच वर्षात विमा कंपनीचा १५० कोटींचा नफा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स ...

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीचे तीन वर्षांसाठी केंद्र शासनाने परभणी जिल्ह्यासाठी निवड केली. २०२०-२१ या पहिल्या वर्षी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके या विमा कंपनीकडे संरक्षित केली. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६३२४ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर-२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस या पिकांचे ९० टक्के नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून प्रति हेक्‍टरी राज्य शासनाने ८ हजार ६०० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अदा केले. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीला कळविले नाही ही आडकाठी टाकून विमा देण्यास नकार दिला. जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ३०१ शेतकऱ्यांना ८७ कोटी ३२ लाख ४९ हजार रुपयांचे वाटप केले. मात्र परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान पाहून या विमा कंपनीने २०० ते ३०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे अपेक्षित होते. मात्र लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व कृषी विभागाचा पाठपुरावा कमी पडल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचा विमा मिळाला नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी भरलेले ३२ कोटी ९० लाख, राज्य व केंद्र शासनाचे असे एकूण जवळपास २४० कोटी रुपये जमा झाले. यातील विमा कंपनीने केवळ ९० कोटी रुपयांचे वाटप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले. त्यामुळे या विमा कंपनीला एकट्या परभणी जिल्ह्यातून दीडशे कोटी रुपयांचा पहिल्याच वर्षी नफा झाल्याचे दिसून येत आहे.

मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पाठ

विमा कंपनीने १५ जुलैपर्यंत २०२१-२२ या खरीप हंगामातील पिके संरक्षित करण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत ४ लाख ९१ हजार ६६३ शेतकऱ्यांनी २ लाख ७९ हजार ६०० हेक्टरवरील पिके संरक्षित केली. त्यापोटी २३ कोटी ६३ लाख रुपयांचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग केला आहे. त्यामुळे गतवर्षी पेक्षा यावर्षी १५ जुलैअखेर ३ लाख शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.