शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

पहिल्याच वर्षात विमा कंपनीचा १५० कोटींचा नफा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स ...

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीचे तीन वर्षांसाठी केंद्र शासनाने परभणी जिल्ह्यासाठी निवड केली. २०२०-२१ या पहिल्या वर्षी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके या विमा कंपनीकडे संरक्षित केली. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६३२४ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर-२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस या पिकांचे ९० टक्के नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून प्रति हेक्‍टरी राज्य शासनाने ८ हजार ६०० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अदा केले. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीला कळविले नाही ही आडकाठी टाकून विमा देण्यास नकार दिला. जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ३०१ शेतकऱ्यांना ८७ कोटी ३२ लाख ४९ हजार रुपयांचे वाटप केले. मात्र परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान पाहून या विमा कंपनीने २०० ते ३०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे अपेक्षित होते. मात्र लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व कृषी विभागाचा पाठपुरावा कमी पडल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचा विमा मिळाला नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी भरलेले ३२ कोटी ९० लाख, राज्य व केंद्र शासनाचे असे एकूण जवळपास २४० कोटी रुपये जमा झाले. यातील विमा कंपनीने केवळ ९० कोटी रुपयांचे वाटप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले. त्यामुळे या विमा कंपनीला एकट्या परभणी जिल्ह्यातून दीडशे कोटी रुपयांचा पहिल्याच वर्षी नफा झाल्याचे दिसून येत आहे.

मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पाठ

विमा कंपनीने १५ जुलैपर्यंत २०२१-२२ या खरीप हंगामातील पिके संरक्षित करण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत ४ लाख ९१ हजार ६६३ शेतकऱ्यांनी २ लाख ७९ हजार ६०० हेक्टरवरील पिके संरक्षित केली. त्यापोटी २३ कोटी ६३ लाख रुपयांचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग केला आहे. त्यामुळे गतवर्षी पेक्षा यावर्षी १५ जुलैअखेर ३ लाख शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.