शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

मंगळवारी जिल्ह्यात १५ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. १३ एप्रिल रोजी १५ ...

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. १३ एप्रिल रोजी १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ५३२ नवे रुग्ण दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज १५ ते २० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. मंगळवारी शासकीय रुग्णालयातील नऊ आणि खासगी रुग्णालयातील सहा अशा १५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १० पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मृत्युदर वाढत असल्याने नवी चिंता निर्माण झाली आहे.

बाधित रुग्णांची संख्याही दररोज वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी एक हजार ४२० नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ५९५ अहवालांमध्ये २६६ आणि रॅपिड टेस्टच्या ८२५ अहवालांमध्ये २६६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता २१ हजार ६५४ झाली आहे. त्यांपैकी १६ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ६६८ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहरातील जिल्हा रुग्णालयात ६७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५४, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२३, अक्षदा मंगल कार्यालयात १३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ३ हजार ५५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयातही उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये बेड कमी झाले आहेत. बेडसाठी रुग्णांची धावपळ होत आहेत.

३६७ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यातील ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्हावासीयांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. ३६७ रुग्णांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली.