शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

४ वर्षांत १३० अपघात बळी; रखडलेली रस्त्यांची कामे हीच परभणी जिल्ह्याची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:25 IST

मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.

परभणी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची कामे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आली की तेथून पुढे रखडतात, असा आजवरचा अनुभव असून, सध्याही जिल्ह्याच्या हद्दीत तीन पैकी दोन राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत. परिणामी वाहनधारकांचा त्रास तर वाढलाच आहे शिवाय अपघातांची संख्याही वाढली आहे.

कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र.६१, परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर आणि जालना- सेलू या राज्य महामार्गाची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. या कामांपैकी परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम वेगाने हाती घेतले. हा रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली. मात्र इतर महामार्गांची कामे रखडली आहेत. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम पाथरीपर्यंत झाले आहे. या मार्गावरील मानवतरोड ते परभणी इथपर्यंत कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवला अन् काम बंद केले. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त होते. आता कुठे या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. याच मार्गादवर जिल्ह्याच्या हद्दीवर झिरोफाटा ते आसोला पाटीपर्यंत काम रखडले आहे. परभणी ते जिंतूर या रस्त्याची स्थितीही अशीच आहे. अनेक भागात कामे अजून पूर्ण झाली नाहीत. मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.

४ वर्षांत १३० बळीकल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील मानवतरोड ते झिरोफाटा या ४४ कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. या कामासाठी चार कंत्राटदार बदलण्यात आले. मात्र तरीही काम ठप्प आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रश्नात लक्ष घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवले होते. त्यात मागील चार वर्षांत ४४ कि.मी.च्या या रस्त्यावर १३० अपघाती मृत्यू झाल्याची नोंद घेतली होती. तसेच खराब रस्त्यामुळे अपघात वाढत असल्याचे नमूद करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेडच्या कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मानवतरोड ते परभणी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र झिरोफाटा भागात काम रखडलेले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग