शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

४ वर्षांत १३० अपघात बळी; रखडलेली रस्त्यांची कामे हीच परभणी जिल्ह्याची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 16:25 IST

मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.

परभणी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची कामे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आली की तेथून पुढे रखडतात, असा आजवरचा अनुभव असून, सध्याही जिल्ह्याच्या हद्दीत तीन पैकी दोन राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली आहेत. परिणामी वाहनधारकांचा त्रास तर वाढलाच आहे शिवाय अपघातांची संख्याही वाढली आहे.

कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र.६१, परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर आणि जालना- सेलू या राज्य महामार्गाची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. या कामांपैकी परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम वेगाने हाती घेतले. हा रस्ता जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली. मात्र इतर महामार्गांची कामे रखडली आहेत. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम पाथरीपर्यंत झाले आहे. या मार्गावरील मानवतरोड ते परभणी इथपर्यंत कंत्राटदाराने रस्ता खोदून ठेवला अन् काम बंद केले. त्यामुळे दोन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त होते. आता कुठे या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. याच मार्गादवर जिल्ह्याच्या हद्दीवर झिरोफाटा ते आसोला पाटीपर्यंत काम रखडले आहे. परभणी ते जिंतूर या रस्त्याची स्थितीही अशीच आहे. अनेक भागात कामे अजून पूर्ण झाली नाहीत. मागील चार ते पाच वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दोनदा कंत्राटदारही बदलले. मात्र रस्ता अर्धवट आहे.

४ वर्षांत १३० बळीकल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील मानवतरोड ते झिरोफाटा या ४४ कि.मी. अंतराचे काम रखडले आहे. या कामासाठी चार कंत्राटदार बदलण्यात आले. मात्र तरीही काम ठप्प आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रश्नात लक्ष घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवले होते. त्यात मागील चार वर्षांत ४४ कि.मी.च्या या रस्त्यावर १३० अपघाती मृत्यू झाल्याची नोंद घेतली होती. तसेच खराब रस्त्यामुळे अपघात वाढत असल्याचे नमूद करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेडच्या कार्यकारी अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मानवतरोड ते परभणी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र झिरोफाटा भागात काम रखडलेले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग