शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

११ हजार क्विंटल सोयाबीनची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रबी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार ...

दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रबी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने योग्य हजेरी लावल्याने पिके जोमात आली होती. मात्र, सोयाबीन, कपाशी काढण्याच्या अवस्थेत असतानाच बदलत्या वातावरणाचा फटका या पिकांना बसला. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका काढणीसाठी आलेल्या कापूस, सोयाबीन या पिकांना बसला. यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. अशाही परिस्थितीमध्ये सोयाबीन व कपाशीचे पीक घेतले आहे. त्याची आवक येथील बाजार समितीमध्ये झाली असून, ऑक्टोबर महिन्यात ४ हजार ३०९ क्विंटल, नोव्हेंबर महिन्यात ५ हजार २२५ क्विंटल तर २१ डिसेंबरपर्यंत ८०४ क्विंटल अशी एकूण ११ हजार ५७५ क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीनचा उठाव वाढल्याने सोयाबीनच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. केंद्र शासनाने सोयाबीनला ३ हजार ८८० रुपयांचा हमीभाव घोषित केलेला आहे; परंतु व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची हमीभावापेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे. आतापर्यंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ हजार ३०० रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

मागील वर्षी १८ हजार क्विंटलची आवक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात १८ हजार ५२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यावर्षी मात्र खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक निसर्गाच्या तडाख्यात भुईसपाट झाले. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक घटली आहे.