शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

तुम्हीही भूक मारता...

By admin | Updated: March 21, 2017 15:13 IST

तुम्ही भूक मारता, चालता चालता काहीबाही पोटात ढकलता? जेवण उरकताय?-सावधान!

 तुम्ही भूक मारता, चालता चालता काहीबाही पोटात ढकलता? जेवण उरकताय?-सावधान! दिवस उगवला की आधी आठवतात ती दिवसभरात करावी लागणारी कामं. आणि या कामांमागे पळता पळता या कामांसाठी ऊर्जा देणाऱ्या खाण्यापिण्याकडे, जेवणाच्या वेळाकडे आपण मात्र फारचं कॅज्युअली बघतो. ते का? ऐन भुकेच्या वेळेस सात्विक गुणांचं जेवण टाळून आपण चटक मटक आणि वर वर पोटभरल्याचा आभास निर्माण करणारं काहीबाही खावून मोकळे होतो. ते का? जेवणासारखं अत्यंत महत्त्वाचं काम आपण अगदीच उरकल्यासारखं करतो. ते का? या अशा वागण्यानं आपण आपल्याच आरोग्याशी खेळत असतो याची आपल्याला जाणीव असते का? या प्रश्नांची उत्तरं खरंतर आपली आपणच शोधायला हवीत. स्वत:ला वेळेवर जेवण्याची आणि पौष्टिक ते खाण्याची सवय लावण्यासाठी कोणी बाहेरून येणार नाही हे काम स्वत:चं स्वत:च करावं लागेल. वेळेवर जेवणं आणि जेवणाच्या वेळेत पौष्टिक आहार घेणं या दोन गोष्टी आपल्याला आयुष्यभर धष्टपुष्ट ठेवू शकतात. आणि या दोन्ही गोष्टी चुकवल्या तर आपल्या आरोग्याचं घड्याळ बिघडतं ते मग कायमचंच! वेळेवर म्हणजे कधी जेवावं? वेळेवर खाणं आवश्यक असलं तरी जेवणाची वेळ घड्याळावरून ठरवू नये, तर शरीराच्या जैविक घड्याळानुसार ठरवावी आणि जैविक घड्याळ मात्र भिंतीवरील घड्याळाप्रमाणे नियमित चालेल याची सवय लावावी. पहिलं अन्न पूर्ण पचलं आहे, त्याची पावती म्हणून शुद्ध ढेकर आला आहे, भुकेची संवेदना झाली आहे, शरीराला हलकेपणा आहे अशावेळीच पुढचा आहार घ्यावा. पहिले सेवन केलेलं अन्न पचलं नसताना, जेवणाची इच्छा नसताना, शरीर जड असताना किंवा जेवल्यानंतर पुन्हा सतत काहीतरी तोंडात टाकत राहणं या सवयींमुळे रोगांना आमंत्रण मिळतं. पचनशक्तीवर अतिरिक्त ताण येतो. निसर्गाला जमतं मग आपल्याला का नाही? सकाळी ९ वाजले की नाश्ता करावा. घड्याळात १२ वाजले की जेवायला बसावं असं न करता भुकेची संवेदना झाल्यावर खावं हेच योग्य. पण ही संवेदना मात्र वेळेवर होईल याची सवय स्वत:च स्वत:ला लावावी लागते. आपल्या आजूबाजूला, निसर्गात जरी आपण डोळे उघडून पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की, निसर्गाचं चक्र अगदी घड्याळाबर हुकूम चालू आहे. सूर्योदय नियमित वेळेलाच होतो. आणि ना लवकर ना उशिरा सूर्यास्तही अगदी ठरलेल्या वेळीच होतो. मग जे निसर्गाला जमतं ते आपल्याला का नाही? निसर्गाच्या चक्राशी आपलं घडयाळ आपण सेट करून घ्यायला हवं. आपल्या शरीरातील जैविक घड्याळही खरं तर आपलं कार्य बिनचूक करीत असतं. सकाळ झाली की येणारी जाग, सूर्य डोक्यावर गेल्यावर लागणारी क्षुधा आणि रात्र झाली की मिटायला लागणारे डोळे याचंच प्रतीक आहे. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो आणि वेळा चुकवत राहतो. परिणामस्वरूप अनेक आजारांचं संकट आयुष्यभर आपल्यावर ओढवून घेतो. वेळ पाळण्याचे फायदे आहाराची वेळ नियमित असेल तर नेमक्या त्याच वेळी पाचकस्त्रावही स्त्रावतात. अन्नाचं पचन होतं. खाल्लेलं अन्न अंगी लागतं. योग्य वेळ नसताना जेवल्यास पूर्ण पाचकस्त्राव येत नाहीत. अन्नाचं योग्य पचन होत नाही. याउलट जेवणाची वेळ निघून गेल्यास स्त्राव ठरलेल्या वेळी स्त्रवतात पण तेव्हा पोटात अन्न नसतं. परिणामी ते स्त्राव स्त्रवून गेल्यावर, जेवणाची वेळ उलटून गेल्यावर घेतलेल्या अन्नाचंही पूर्णत: पचन होत नाही. म्हणूनच जेवणाच्या वेळा जरी आपल्या सोयीनुरूप किंवा कामानुरूप ठरवल्या तरी जे ठरवलं आहे ते नियमित ठेवून त्यांचं पालन करणं हे महत्त्वाचं!

- वैद्य रजनी गोखले