शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

रस्त्यावर उतरलेलं आसामी तारुण्य का म्हणतंय, फाइट ऑर डाय?

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 08:05 IST

आय अ‍ॅम आसामी, सो आय एक्झिस्ट, आसामी आहोत म्हणून जिवंत आहोत नाहीतर मेलेलं बरं या टोकावर का पोहोचलं आहे आसामी तारुण्य?

ठळक मुद्देत्यांचा आक्रोश सरकार्पयतच नाही तर तमाम भारतीयांर्पयत पोहोचेल का. प्रश्न आहेच.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम

‘आय अ‍ॅम आसामी, सो आय एक्झिस्ट.. सोचो की, हम सब हिमा दास है, तिरंगा तो अपना है, लेकीन गले का आसामी गमछा निकाल दो तो हम कुछ नही.!’ - अरिंदोम सांगत असतो.

तो गुवाहाटी विद्यापीठात शिकतो. एकदम गरीब, साधासा, हळू बोलणारा तरुण मुलगा. त्याला पीएच.डी. करायला लंडनला जायचंय, एवढंच त्याच्या कालर्पयत डोक्यात होतं. आज मात्र त्याच्या डोक्यात आंदोलन आहे. त्याच्या डोक्यात आक्रोश आहे. एरव्ही कधी मित्रांच्या अंगावर ओरडला नसेल हा मुलगा, तो आता भर रस्त्यात मोठमोठय़ानं ‘जोय ओई आखॉम!’ची घोषणा देतोय. समोर पोलीस उभेत. अश्रुधुराचा मारा होतोय; पण हा घाबरत नाही. त्याचे दोस्त घाबरत नाही.

त्याला विचारलं, भीती नाही वाटली? तर तो उत्तर देतो, ‘व्हॉट फिअर? फाइट ऑर डाय इज द ओन्ली ओप्शन!’ करा किंवा मरा असे दोनच पर्याय अरिंदोमसारख्या आसामी तरुणांपुढे आज का उभे राहिलेत.

आसामीच कशाला, मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, त्रिपुरा या राज्यातले तरुणही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हातात मशाली घेऊन, नो कॅब म्हणत भयंकर संतापाने सरकारला विरोध करत आहेत. त्यांचा विरोध आपल्याला राष्ट्रीय चॅनल्सवर दिसतो. मात्र त्यामागचा त्यांचा आक्रोश दिसत नाही. आंदोलन नव्हे तर आक्रोशच आहे. या तरुण मुलांनी इतकी वर्षे भारतापासून अलगथलग पडणं स्वीकारलं. त्यांची इतर शहरांत थट्टा होते, त्यांच्या डोळ्यांवरून, चेहरेपट्टीवरून टिंगल होते, हे सारं सहन केलं. आपल्याच देशात परकीय वागणूक मिळते हेही त्यांनी भोगलं. त्यांचं राज्य अनेकांना भारताच्या नकाशावर दाखवता येत नाही, तेही सहन केलं. आपण ‘भारतीय’च आहोत याचे पुरावे वारंवार ते देत राहिले; पण उर्वरित भारताला त्यांचं अस्तित्वही दिसलं नाही. चक दे सिनेमात दोन ईशान्य भारतीय मुलींना जेव्हा कुणी म्हणतं की, आप तो हमारे मेहमान है, तेव्हा त्या सांगतात की, आपल्याच देशात मेहमान आहे हे ऐकून घेणं कसं वाटेल? - हे सारं होत राहिलंच आहे. त्याच्यावरची कडी होती. आसाममध्ये राबवण्यात आलेली एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया. आपण भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी अत्यंत अवघड कागदपत्रांची प्रक्रिया आसाममध्ये तीन कोटीहून अधिक लोकांनी पार पाडली. आणि आता अचानक नागरिक सुधारणा कायदा अर्थात सिटिझन अमेंडमेण्ट अ‍ॅक्ट आला. आणि 2014 र्पयत पाकिस्तान, बांग्लादेश, अफगणिस्तान येथून भारतात आलेल्या मुस्लीम वगळून अन्य सर्व धर्मीयांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

त्याला ईशान्येकडील राज्यांचा विरोध आहे. आपल्या भाषेवर, राज्याच्या संस्कृतीवर आणि रोजीरोटीवरच हे बाहेरच्यांचा आक्रमण आहे आणि ते आपल्याला मान्य नाही असं आता ईशान्येतल्या राज्यांचं म्हणणं आहे. त्यात आसाम आघाडीवर आहे कारण बांग्लादेशातून आलेल्यांचा लोंढा आजवर आसामनेच सहन केला आहे, आणि आताही करावा लागणार आहे. म्हणून तर सध्या तरुण मुली, मुलं, म्हातारेकोतारे अगदी लहान मुलंही या आंदोलनात उतरली आहेत. त्यांचा आक्रोश सरकार्पयतच नाही तर तमाम भारतीयांर्पयत पोहोचेल का. प्रश्न आहेच.

टॅग्स :Assamआसाम