शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उतरलेलं आसामी तारुण्य का म्हणतंय, फाइट ऑर डाय?

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 08:05 IST

आय अ‍ॅम आसामी, सो आय एक्झिस्ट, आसामी आहोत म्हणून जिवंत आहोत नाहीतर मेलेलं बरं या टोकावर का पोहोचलं आहे आसामी तारुण्य?

ठळक मुद्देत्यांचा आक्रोश सरकार्पयतच नाही तर तमाम भारतीयांर्पयत पोहोचेल का. प्रश्न आहेच.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम

‘आय अ‍ॅम आसामी, सो आय एक्झिस्ट.. सोचो की, हम सब हिमा दास है, तिरंगा तो अपना है, लेकीन गले का आसामी गमछा निकाल दो तो हम कुछ नही.!’ - अरिंदोम सांगत असतो.

तो गुवाहाटी विद्यापीठात शिकतो. एकदम गरीब, साधासा, हळू बोलणारा तरुण मुलगा. त्याला पीएच.डी. करायला लंडनला जायचंय, एवढंच त्याच्या कालर्पयत डोक्यात होतं. आज मात्र त्याच्या डोक्यात आंदोलन आहे. त्याच्या डोक्यात आक्रोश आहे. एरव्ही कधी मित्रांच्या अंगावर ओरडला नसेल हा मुलगा, तो आता भर रस्त्यात मोठमोठय़ानं ‘जोय ओई आखॉम!’ची घोषणा देतोय. समोर पोलीस उभेत. अश्रुधुराचा मारा होतोय; पण हा घाबरत नाही. त्याचे दोस्त घाबरत नाही.

त्याला विचारलं, भीती नाही वाटली? तर तो उत्तर देतो, ‘व्हॉट फिअर? फाइट ऑर डाय इज द ओन्ली ओप्शन!’ करा किंवा मरा असे दोनच पर्याय अरिंदोमसारख्या आसामी तरुणांपुढे आज का उभे राहिलेत.

आसामीच कशाला, मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, त्रिपुरा या राज्यातले तरुणही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हातात मशाली घेऊन, नो कॅब म्हणत भयंकर संतापाने सरकारला विरोध करत आहेत. त्यांचा विरोध आपल्याला राष्ट्रीय चॅनल्सवर दिसतो. मात्र त्यामागचा त्यांचा आक्रोश दिसत नाही. आंदोलन नव्हे तर आक्रोशच आहे. या तरुण मुलांनी इतकी वर्षे भारतापासून अलगथलग पडणं स्वीकारलं. त्यांची इतर शहरांत थट्टा होते, त्यांच्या डोळ्यांवरून, चेहरेपट्टीवरून टिंगल होते, हे सारं सहन केलं. आपल्याच देशात परकीय वागणूक मिळते हेही त्यांनी भोगलं. त्यांचं राज्य अनेकांना भारताच्या नकाशावर दाखवता येत नाही, तेही सहन केलं. आपण ‘भारतीय’च आहोत याचे पुरावे वारंवार ते देत राहिले; पण उर्वरित भारताला त्यांचं अस्तित्वही दिसलं नाही. चक दे सिनेमात दोन ईशान्य भारतीय मुलींना जेव्हा कुणी म्हणतं की, आप तो हमारे मेहमान है, तेव्हा त्या सांगतात की, आपल्याच देशात मेहमान आहे हे ऐकून घेणं कसं वाटेल? - हे सारं होत राहिलंच आहे. त्याच्यावरची कडी होती. आसाममध्ये राबवण्यात आलेली एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया. आपण भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी अत्यंत अवघड कागदपत्रांची प्रक्रिया आसाममध्ये तीन कोटीहून अधिक लोकांनी पार पाडली. आणि आता अचानक नागरिक सुधारणा कायदा अर्थात सिटिझन अमेंडमेण्ट अ‍ॅक्ट आला. आणि 2014 र्पयत पाकिस्तान, बांग्लादेश, अफगणिस्तान येथून भारतात आलेल्या मुस्लीम वगळून अन्य सर्व धर्मीयांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

त्याला ईशान्येकडील राज्यांचा विरोध आहे. आपल्या भाषेवर, राज्याच्या संस्कृतीवर आणि रोजीरोटीवरच हे बाहेरच्यांचा आक्रमण आहे आणि ते आपल्याला मान्य नाही असं आता ईशान्येतल्या राज्यांचं म्हणणं आहे. त्यात आसाम आघाडीवर आहे कारण बांग्लादेशातून आलेल्यांचा लोंढा आजवर आसामनेच सहन केला आहे, आणि आताही करावा लागणार आहे. म्हणून तर सध्या तरुण मुली, मुलं, म्हातारेकोतारे अगदी लहान मुलंही या आंदोलनात उतरली आहेत. त्यांचा आक्रोश सरकार्पयतच नाही तर तमाम भारतीयांर्पयत पोहोचेल का. प्रश्न आहेच.

टॅग्स :Assamआसाम