शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

रस्त्यावर उतरलेलं आसामी तारुण्य का म्हणतंय, फाइट ऑर डाय?

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 08:05 IST

आय अ‍ॅम आसामी, सो आय एक्झिस्ट, आसामी आहोत म्हणून जिवंत आहोत नाहीतर मेलेलं बरं या टोकावर का पोहोचलं आहे आसामी तारुण्य?

ठळक मुद्देत्यांचा आक्रोश सरकार्पयतच नाही तर तमाम भारतीयांर्पयत पोहोचेल का. प्रश्न आहेच.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम

‘आय अ‍ॅम आसामी, सो आय एक्झिस्ट.. सोचो की, हम सब हिमा दास है, तिरंगा तो अपना है, लेकीन गले का आसामी गमछा निकाल दो तो हम कुछ नही.!’ - अरिंदोम सांगत असतो.

तो गुवाहाटी विद्यापीठात शिकतो. एकदम गरीब, साधासा, हळू बोलणारा तरुण मुलगा. त्याला पीएच.डी. करायला लंडनला जायचंय, एवढंच त्याच्या कालर्पयत डोक्यात होतं. आज मात्र त्याच्या डोक्यात आंदोलन आहे. त्याच्या डोक्यात आक्रोश आहे. एरव्ही कधी मित्रांच्या अंगावर ओरडला नसेल हा मुलगा, तो आता भर रस्त्यात मोठमोठय़ानं ‘जोय ओई आखॉम!’ची घोषणा देतोय. समोर पोलीस उभेत. अश्रुधुराचा मारा होतोय; पण हा घाबरत नाही. त्याचे दोस्त घाबरत नाही.

त्याला विचारलं, भीती नाही वाटली? तर तो उत्तर देतो, ‘व्हॉट फिअर? फाइट ऑर डाय इज द ओन्ली ओप्शन!’ करा किंवा मरा असे दोनच पर्याय अरिंदोमसारख्या आसामी तरुणांपुढे आज का उभे राहिलेत.

आसामीच कशाला, मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, त्रिपुरा या राज्यातले तरुणही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हातात मशाली घेऊन, नो कॅब म्हणत भयंकर संतापाने सरकारला विरोध करत आहेत. त्यांचा विरोध आपल्याला राष्ट्रीय चॅनल्सवर दिसतो. मात्र त्यामागचा त्यांचा आक्रोश दिसत नाही. आंदोलन नव्हे तर आक्रोशच आहे. या तरुण मुलांनी इतकी वर्षे भारतापासून अलगथलग पडणं स्वीकारलं. त्यांची इतर शहरांत थट्टा होते, त्यांच्या डोळ्यांवरून, चेहरेपट्टीवरून टिंगल होते, हे सारं सहन केलं. आपल्याच देशात परकीय वागणूक मिळते हेही त्यांनी भोगलं. त्यांचं राज्य अनेकांना भारताच्या नकाशावर दाखवता येत नाही, तेही सहन केलं. आपण ‘भारतीय’च आहोत याचे पुरावे वारंवार ते देत राहिले; पण उर्वरित भारताला त्यांचं अस्तित्वही दिसलं नाही. चक दे सिनेमात दोन ईशान्य भारतीय मुलींना जेव्हा कुणी म्हणतं की, आप तो हमारे मेहमान है, तेव्हा त्या सांगतात की, आपल्याच देशात मेहमान आहे हे ऐकून घेणं कसं वाटेल? - हे सारं होत राहिलंच आहे. त्याच्यावरची कडी होती. आसाममध्ये राबवण्यात आलेली एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया. आपण भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी अत्यंत अवघड कागदपत्रांची प्रक्रिया आसाममध्ये तीन कोटीहून अधिक लोकांनी पार पाडली. आणि आता अचानक नागरिक सुधारणा कायदा अर्थात सिटिझन अमेंडमेण्ट अ‍ॅक्ट आला. आणि 2014 र्पयत पाकिस्तान, बांग्लादेश, अफगणिस्तान येथून भारतात आलेल्या मुस्लीम वगळून अन्य सर्व धर्मीयांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

त्याला ईशान्येकडील राज्यांचा विरोध आहे. आपल्या भाषेवर, राज्याच्या संस्कृतीवर आणि रोजीरोटीवरच हे बाहेरच्यांचा आक्रमण आहे आणि ते आपल्याला मान्य नाही असं आता ईशान्येतल्या राज्यांचं म्हणणं आहे. त्यात आसाम आघाडीवर आहे कारण बांग्लादेशातून आलेल्यांचा लोंढा आजवर आसामनेच सहन केला आहे, आणि आताही करावा लागणार आहे. म्हणून तर सध्या तरुण मुली, मुलं, म्हातारेकोतारे अगदी लहान मुलंही या आंदोलनात उतरली आहेत. त्यांचा आक्रोश सरकार्पयतच नाही तर तमाम भारतीयांर्पयत पोहोचेल का. प्रश्न आहेच.

टॅग्स :Assamआसाम