शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

आमच्याबद्दल आम्ही नायतर कोण लिहिणार? सोळाव्या वर्षी लॉग आउट

By admin | Updated: November 13, 2014 21:01 IST

आपण एखादं पुस्तक लिहावं, असं माङया डोक्यात कधीच आलं नव्हतं. मला खूप लहानपणापासून डायरी लिहायची सवय होतीच.

 
नाव : श्रुती आवटे
पुस्तकाचं नाव - ‘लॉग आउट’
कधी प्रसिद्ध झालं? - सप्टेंबर 2क्14
पुस्तकात काय आहे? - पौगंडावस्थेतील मुलीच्या बदलत्या भावविश्वाची कहाणी.
पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेन्ट-‘मला ही कांदबरी एकूण आवडली. ती रेसी आहे. काळावर नीट बोलते. भावनांचं नीट चित्रण करते आणि अनोख्या अशा पौंगडावस्थेबद्दल आत्मीयतेने बोलते’ - प्रसिद्ध लेखक विश्रम गुप्ते 
पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट - आत्तार्पयत तरी एकही नाही.
 
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
आपण एखादं पुस्तक लिहावं, असं माङया डोक्यात कधीच आलं नव्हतं. मला खूप लहानपणापासून डायरी लिहायची सवय होतीच. पत्र हा लिखाणातला खूप इन्ट्रेस्टिंग प्रकार वाटतो मला. माझी दहावीची परीक्षा संपली त्याकाळात मी जरा अस्वस्थच होते. ती अस्वस्थता कुठल्या तरी माध्यमातून व्यक्त करण्याची गरज आहे असं वाटू लागलं. ज्यात मी पुरेशी कम्फरटेबल असेन नि मी माङो विचार मुळासकट मांडू शकेन असं मला काहीतरी हवं होतं. मी काहीतरी लिहायला सुरुवात केली. डोक्यात साहित्यातला कुठलाच फॉर्म नव्हता. लिखाणाचा स्पीड वाढत गेला नि माङयाही नकळत लिखाणानं कादंबरीचं रूप घेतलं!
हल्लीची मुलं कुठे वाचतात? आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न- शंका मनात आली नाही का?
मुळात पुस्तक लिहायचं असं काही डोक्यातच नसल्यानं अशी काही शंका मनात डोकावलीच नाही. मला वाटलं ते मी लिहिलं. माङयातली हुरहुर, घालमेल, अस्वस्थता मला मांडायची होती. थोडक्यात, मला रिक्त व्हायचं होतं. हे लिखाण कोणी वाचेल-न वाचेल मला त्याची काहीच पर्वा नव्हती. ‘लॉग आउट’ पुस्तकरूपात आल्यावर मात्र मला हे लख्खपणो जाणवलं की, वाचणा:यांची संख्या आपल्याकडे खूप आहे. मी हे पुस्तक लिहिलं सोळा वर्षाची असताना. (आज मी सतरा वर्षाची आहे) मराठीत इतक्या लहान वयात कादंबरी लिहिणारी मी पहिली लेखिका आहे असं मला अनेकांनी सांगितलं. कादंबरीवर अनेकजणांचे अभिप्राय येत आहेत. त्यातले बहुतेकजण माङयाच वयाचे आहेत. यावरून तरु ण मुलं वाचत नाहीत हे मला तरी खरं वाटत नाही.
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला?
खरं तर, पेशन्स आणावाच लागला नाही. अनेकदा मला असं वाटतं की, हे लेखन मी केलेलंच नाही. माङयातली एक अनामिक शक्ती माङयाकडून हे सारं लिहून घेत होती. त्यामुळे मला खरंच नाही माहीत हा पेशन्स कुठून आणि कसा आला माङयात ते. पण जे काही होत होतं ते भन्नाट होतं. मी अगदी घरी, बस स्टॉपवर, लायब्ररीत कुठेही लिहीत सुटले होते. 
या प्रोसेसने तुला काय शिकवलं?
या प्रोसेसने मला लिखाणासारख्या दमदार माध्यमाशी कनेक्ट केलं. आणि आपणही या माध्यमातून प्रभावीपणो काही सांगू शकतो याची जाणीव झाली. लिखाणासारख्या माध्यमातून व्यक्त होताना आपण किती बेभान होतो हेदेखील समजलं. पण त्याचबरोबर इतस्तत: विखुरलेली ‘श्रुती’ एकसंध होऊन विचार करू लागली. अधिक खोलात जाऊन विचार करू लागली. भावनांचा तळ शोधू लागली. या लिखाणाने भावनांचा गुंता हळूहळू सुटत गेला. माणूस होण्याची वाट धरणं, हे या प्रोसेसने दिलेलं मोलाचं गिफ्ट !
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
असं मला वाटत नाही. मुळात आमच्या पिढीचं जगणं हे आम्हीच मांडायला हवं. आमच्या जगण्याचं आकलन हे आमच्या अगोदरच्या पिढीला पूर्णत: होऊ शकत नाही. त्यामुळे आपली नस आपण शोधावी, पकडावी नि जगालाही दाखवावी, असं माझं मत आहे.