शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

आमच्याबद्दल आम्ही नायतर कोण लिहिणार? सोळाव्या वर्षी लॉग आउट

By admin | Updated: November 13, 2014 21:01 IST

आपण एखादं पुस्तक लिहावं, असं माङया डोक्यात कधीच आलं नव्हतं. मला खूप लहानपणापासून डायरी लिहायची सवय होतीच.

 
नाव : श्रुती आवटे
पुस्तकाचं नाव - ‘लॉग आउट’
कधी प्रसिद्ध झालं? - सप्टेंबर 2क्14
पुस्तकात काय आहे? - पौगंडावस्थेतील मुलीच्या बदलत्या भावविश्वाची कहाणी.
पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेन्ट-‘मला ही कांदबरी एकूण आवडली. ती रेसी आहे. काळावर नीट बोलते. भावनांचं नीट चित्रण करते आणि अनोख्या अशा पौंगडावस्थेबद्दल आत्मीयतेने बोलते’ - प्रसिद्ध लेखक विश्रम गुप्ते 
पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट - आत्तार्पयत तरी एकही नाही.
 
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
आपण एखादं पुस्तक लिहावं, असं माङया डोक्यात कधीच आलं नव्हतं. मला खूप लहानपणापासून डायरी लिहायची सवय होतीच. पत्र हा लिखाणातला खूप इन्ट्रेस्टिंग प्रकार वाटतो मला. माझी दहावीची परीक्षा संपली त्याकाळात मी जरा अस्वस्थच होते. ती अस्वस्थता कुठल्या तरी माध्यमातून व्यक्त करण्याची गरज आहे असं वाटू लागलं. ज्यात मी पुरेशी कम्फरटेबल असेन नि मी माङो विचार मुळासकट मांडू शकेन असं मला काहीतरी हवं होतं. मी काहीतरी लिहायला सुरुवात केली. डोक्यात साहित्यातला कुठलाच फॉर्म नव्हता. लिखाणाचा स्पीड वाढत गेला नि माङयाही नकळत लिखाणानं कादंबरीचं रूप घेतलं!
हल्लीची मुलं कुठे वाचतात? आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न- शंका मनात आली नाही का?
मुळात पुस्तक लिहायचं असं काही डोक्यातच नसल्यानं अशी काही शंका मनात डोकावलीच नाही. मला वाटलं ते मी लिहिलं. माङयातली हुरहुर, घालमेल, अस्वस्थता मला मांडायची होती. थोडक्यात, मला रिक्त व्हायचं होतं. हे लिखाण कोणी वाचेल-न वाचेल मला त्याची काहीच पर्वा नव्हती. ‘लॉग आउट’ पुस्तकरूपात आल्यावर मात्र मला हे लख्खपणो जाणवलं की, वाचणा:यांची संख्या आपल्याकडे खूप आहे. मी हे पुस्तक लिहिलं सोळा वर्षाची असताना. (आज मी सतरा वर्षाची आहे) मराठीत इतक्या लहान वयात कादंबरी लिहिणारी मी पहिली लेखिका आहे असं मला अनेकांनी सांगितलं. कादंबरीवर अनेकजणांचे अभिप्राय येत आहेत. त्यातले बहुतेकजण माङयाच वयाचे आहेत. यावरून तरु ण मुलं वाचत नाहीत हे मला तरी खरं वाटत नाही.
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला?
खरं तर, पेशन्स आणावाच लागला नाही. अनेकदा मला असं वाटतं की, हे लेखन मी केलेलंच नाही. माङयातली एक अनामिक शक्ती माङयाकडून हे सारं लिहून घेत होती. त्यामुळे मला खरंच नाही माहीत हा पेशन्स कुठून आणि कसा आला माङयात ते. पण जे काही होत होतं ते भन्नाट होतं. मी अगदी घरी, बस स्टॉपवर, लायब्ररीत कुठेही लिहीत सुटले होते. 
या प्रोसेसने तुला काय शिकवलं?
या प्रोसेसने मला लिखाणासारख्या दमदार माध्यमाशी कनेक्ट केलं. आणि आपणही या माध्यमातून प्रभावीपणो काही सांगू शकतो याची जाणीव झाली. लिखाणासारख्या माध्यमातून व्यक्त होताना आपण किती बेभान होतो हेदेखील समजलं. पण त्याचबरोबर इतस्तत: विखुरलेली ‘श्रुती’ एकसंध होऊन विचार करू लागली. अधिक खोलात जाऊन विचार करू लागली. भावनांचा तळ शोधू लागली. या लिखाणाने भावनांचा गुंता हळूहळू सुटत गेला. माणूस होण्याची वाट धरणं, हे या प्रोसेसने दिलेलं मोलाचं गिफ्ट !
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
असं मला वाटत नाही. मुळात आमच्या पिढीचं जगणं हे आम्हीच मांडायला हवं. आमच्या जगण्याचं आकलन हे आमच्या अगोदरच्या पिढीला पूर्णत: होऊ शकत नाही. त्यामुळे आपली नस आपण शोधावी, पकडावी नि जगालाही दाखवावी, असं माझं मत आहे.