शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

डॉक्टर म्हणून मी नक्की कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 09:59 IST

गडचिरोलीला गेलो आणि वाटलं, इथं माझ्यासारख्यांनी पोहचायला हवं. इथं आपली गरज आहे.

- डॉ. प्रथमेश हेमनानी

मी बॉण्ड पूर्ण करायचं ठरवलं. म्हणजे काय तर तो पूर्ण करण्याचं बंधनच होतं. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकलो, त्यानंतर वर्षभर ग्रामीण भागात जाऊन काम करणं सक्तीचं होतोच. मीच ठरवलं की आपण गडचिरोली जिल्ह्यात जाऊन काम करायचं. मलाच राज्यातल्या दुर्गम, आदिवासी भागात जाऊन काम करायचं होतं. भविष्यातही आपण आदिवासी भागातल्या आरोग्य सुविधांसाठी काम करू असं डोक्यात होतं. त्यामुळे मग आरोग्यनिर्देशांकात अगदीच मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काम करायचं ठरवलं.माझे अनेक मित्र उच्चशिक्षण घेण्यासाठी जाणार होते. पीजीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होते. आणि मी बॉण्ड पूर्ण करायचं ठरवलं. निर्णय अर्थातच सोपा नव्हता. कारण माझ्या अवतीभोवतीचे अनेकजण वेगळंच काही ठरवत होते. बॉण्ड पूर्ण करू म्हणणारे फारच कमी होते. पण मी गडचिरोलीला जायचं ठरवलं. ‘एमओशिप’ घेतली. गडचिरोली जिल्ह्यातले आरोग्य सुविधांचे प्रश्न पाहून अस्वस्थही झालो. ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या आरोग्य सुविधांचं चित्र पाहून हादरलोच. जागतिक आरोग्यव्यवस्थेने सुचवलेल्या नियमांनुसार दरहजारी रुग्णांमागे किमान एक डॉक्टर पाहिजे (अर्थात हे प्रमाणही आदर्श नाही); पण आपल्या ग्रामीण भागात १७०० लोकांमागे एक डॉक्टर आहे. २०१५ च्या जागतिक आरोग्यसंस्थेच्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. (प्रचंड लोकसंख्येच्या चीनमध्ये पण १६०० रुग्णांमागे एक डॉक्टर आहे.) ही आकडेवारी ढोबळ असली तरी बहुसंख्य डॉक्टर हे शहरांतच प्रॅक्टिस करतात. ग्रामीण भागात परिस्थिती बिघडत जाते. मी ज्या आरोग्य केंद्रात काम करतो, ते आरोग्य केंद्र आणि संलग्न केंद्रामध्ये मिळून ३ डॉक्टर आहेत आणि सुमारे १४,००० आदिवासींवर आम्ही उपचार करणं अपेक्षित आहे. म्हणजे माझ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात एक डॉक्टर आणि ४ हजार रुग्ण असं प्रमाण आहे. पण हे बरं कारण नंतर लक्षात आलं की काही आरोग्य केंद्रांत तर डॉक्टरच नाहीत, जागा रिक्त आहेत. कारण एमबीबीएस झालेले अनेकजण हा बॉण्ड करण्यापुरतेही मेडिकल आॅफिसर म्हणून आदिवासी-ग्रामीण भागात येत नाहीत.सध्या जगभर माणसांना परवडेल अशा आरोग्य सुविधांची चर्चा आहे. आपण मात्र समाज म्हणून आजही अगदी सामान्य आरोग्य सुविधाही लोकांपर्यंत पोहचवू शकलेलो नाही. ७० वर्षे झाली स्वातंत्र्याला आपण आजही मलेरिया, डेंग्यू, टीबी यांसारख्या आजारांशी लढतो आहोत. (गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगात टीबीचे सर्वाधिक मृत्यू भारतात होतात.) गडचिरोलीत तर मलेरियाची साथ सर्रास दिसते. अजूनही घरातच प्रसूती होतात, त्यात बाळं दगावतात. न्युमोनिया, सेप्सिस सारख्या आजारांना मुलं बळी पडतात. त्यात आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहन व्यवस्था नसते, रस्ते नसतात. आणि त्यात रुढींचा पगडा. म्हणजे ज्या गावात १९८० पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या गावचे आणि आजूबाजूचे लोकही अजून भगताकडे जातात, आणि दवाखान्यात येत नाही. अजूनही त्यांचा भगतावर जास्त विश्वास दिसतो, डॉक्टरवर नाही. हे फार हतबल करणारं आहे. कितीदा हे चित्र पाहून माझ्या पोटात कालवलं आहे.हे मान्य आहे की आपल्या देशात प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि केंद्राच्याही अनेक समस्या आहेत; पण त्या कुठे नाहीत. सगळ्याच क्षेत्रात प्रश्न आहेत. पण म्हणून बदल होत नाही असं नाही. ते होत आहेत. मी माझ्याच आरोग्य केंद्रात ते बदल पाहतोय. कधीही औषधं संपली, वैद्यकीय साहित्य नाही असं आता केंद्रात घडत नाही. मेडिकल आॅफिसर म्हणूनही आम्हाला शासनाकडून काही निधी मिळतात आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्रात काही कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आम्ही वापरू शकतो. काही औषधं, साधनं मागविण्यासाठी मी गरज पडेल तसा तो निधी वापरलाही आहे. वरिष्ठांनीही त्याकामी सहकार्य केलं. त्यांना भरवसा वाटला की हे नवीन डॉक्टर खरंच आरोग्य सुविधा देण्यासाठी मनापासून काम करत आहेत. नुस्ती ‘ड्युटी’च्या वेळा भरत नाहीत.या वर्षभराच्या एमओशिप बॉण्डने डॉक्टर म्हणून माझे व्यावसायिक कौशल्यही वाढवले, माणूस म्हणून तर मी खूप शिकलो. घरापासून लांब राहिलो. कनेक्टिव्हिटी अगदी जमते. वीज नसणं हे तर कायमचंच, तरीही या भागात माणसं कशी जगतात, एकमेकांसोबत असतात हे मी फार जवळून पाहिलं. घरी असताना वाय-फायचा स्पीड जरा कमी झाला तरी मी ब्रॉडबॅण्डवाल्यांना तातडीने फोन करून कामाला लावायचो. पण हे जग मात्र फार वेगळं होतं. म्हणून त्या एका वर्षानं मला शिकवलं की वीज असणं, घरात इंटरनेट, त्याचा उत्तम स्पीड हे सारं लक्झरी आहे. साध्याशा आरोग्य सुविधा मिळणं मात्र सगळ्यांसाठी गरजेचं आहे. आणि काहींना तर त्या परवडतही नाही, हाती पैसा नाही. आणि त्यासोबत आरोग्य व्यवस्थाही त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.ती पोहचायला नको का?

( डॉ. प्रथमेश हेमनानी गडचिरोली जिल्ह्यातल्या पेंढारी प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल आॅफिसर वर्षभर काम केलं आहे. हे पेंढारी गडचिरोलीपासून ६० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात आहे.)

टॅग्स :docterडॉक्टरHealthआरोग्य