शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तू मूळची कुठची?

By admin | Updated: February 22, 2017 15:04 IST

शहरांच्या सजीव सोबतीचा कारवॉँ

अजून इतकं तीव्रतेनं वाटलं नाही कदाचित, पण ‘कायमचा पत्ता’ मिळवायला मी काही धडपड केली नाही. असोशी आहे ती वाहतं,खळाळतं राहण्याची. स्थावर जंगम मालमत्तांच्या नाईलाजांना नाकारत माझ्याएवढंच जिवंत स्थलांतर स्वीकारत राहण्याची.

शहरात राहणं स्वीकारलं तरी जाणवलं की पुढचा बराच काळ मी माझ्या आत गावच घेऊन फिरत होते. गाव मराठवाड्यातलं. दुष्काळात पाण्यासाठी, रोजगारासाठी, हंगामात हाती कोयता घेत ऊसतोडीसाठी स्थलांतर करणारं गाव. मराठवाड्यानं सतत तीन वर्षे दुष्काळकळा सोसलेल्या. या काळात गावाकडच्या किती जणांनी स्थलांतरं केली. शहरात येऊन वडापावचा गाडा लावलेली, लहानमोठी कामं करणारी अनेक तरु ण मुलं, स्त्रिया असे सगळे भेटायचे. भाषेवरून लगेच कळायचं, हे आपल्याकडचे! थोडंसं बोललं की बांध फुटल्यागत ते मन मोकळं करायचे. त्यांच्या डोळ्यात गावाकडं मागं सोडून आलेल्यांच्या जगण्याची चिंता साकळलेली असायची. मनात नसताना गाव सोडून इथं परमुलखात यावं लागल्याची सल दिसायची. पण असं करून मी शहराच्या शहरपणाचा अवमान करतेय असं लक्षात आलं. शहर फिरताना, शहरातच असणं जमवून आणताना कळलं आपणच शहर व्हायला हवं. या शहराचा वेग, अस्वस्थता, खालीपन सगळ्यांना समजून घ्यायला हवं. शहराशी जशी जवळीक वाढायला लागली, तसं कळालं, इथंही अनेक गावं आपापल्या इलाक्यात आपलं गावपण घेऊन सालोसाल राहतात की! मराठवाडा, खान्देश, विदर्भातून स्थलांतरित होत शहरात रोजगारासाठी दाखल झालेल्यांच्या अनेक वस्त्या, कॉलन्यांमधून फिरताना हे ‘गावपण’ तुकड्या-तुकड्यांत भेटत राहिलं. ‘कम्फर्ट झोन’ सोडणं आता कदाचित अंगवळणी पडलं होतं. तोवर पुन्हा शांत-निवांत पुणं सोडून औरंगाबाद नावाच्या शहरात स्वत:ला शोधावंसं वाटलं. कित्येक युद्ध, संघर्ष आणि दंगली सोसलेलं, गंगाजमनी तहजीबची खुशबू जपलेलं हे ऐतिहासिक शहर. इतर मराठवाड्याहून केवढी तरी वेगळी असलेली इथली मराठी आणि हिंदी. दखनी अंदाजातल्या उर्दूशी रिश्ता सांगणारी. गुलमंडी, शहागंज, बेगमपुरा, दिवाण देवडी, जयसिंगपुरा... शहरातल्या ठिकाणांची शायराना नावंच प्रेमात पाडणारी. सिटी चौकातल्या अत्तर बाजारात दरवळणारी हीना, फिरदौस, चमेलीची अत्तरं हरेक दिवसाचा जश्न करणारी. जुन्या-पुराण्या नजाकतदार मशिदी, काही ढासळलेले तर काही बुलंद दगडी दरवाजे, बुरु ज, वाडे, अनोळख्या गल्या-मोहल्ले.... ज्याच्याशी तासन्तास मूकपणे बोलत राहावं, अनकही दास्तान ऐकावी असा संगमरवरी मकबरा...ईदच्या महिन्यात अफलातून पदार्थांनी ओसंडणारी बुढीलेन... सगळंच नजरबंदी करणारं. औरंगाबादमध्ये असलेल्या भोईवाडासारख्या वस्त्या तर अगदी औरंगजेबाच्या काळापासून येऊन वसलेल्या लोकांच्या. औद्योगिक शहर म्हणून मिळालेल्या ओळखीनंतर गेल्या चार दशकांत इथं भारतभरातून स्थलांतरित झालेले कामगार येऊन राहिलेत. त्यांच्या वस्त्या, तिथं त्यांनी सोबत आणलेले आपापले सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, भाषा जीवनशैली यांचा शोध घेत फिरण्याचा अनुभव खासच होता.‘वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज’चा जयघोष करणाऱ्या या काळात सगळंच कसं एकरंगी, एकसुरी होत चाललंय. सगळ्या शहरांना ‘स्मार्ट सिटीज’ बनवण्याच्या नादात त्यांचा ओबडधोबड का असेना पण एकमेव असलेला खास चेहराच आपण गमावून बसू की काय अशी भीती शहरांच्या प्रेमात असलेल्या अनेकांना वाटते आहे. हा चेहरा नसला तर मग मागे उरेल ते काय असेल? शहराला समजून घेताना जाणवलं, केवळ शहरातल्या माणसांमुळं शहराची ओळख बनत नसते. या माणसांना वगळूनही शहर स्वत: कुणीतरी सजीव व्यक्ती असते. त्याचा स्वत:चा असा बदलता चेहरा असतो. त्याचं बरं-वाईट चरित्र समजावून घेणं समृद्ध करतं. काही लोक मिळून शहर वसवत असतील, पण पुढचा सर्वकाळ शहरच माणसाला वसवत, घडवत राहतं. माणसांची बरी-वाईट वृत्ती, संकुचितता, खुलेपण, सुकून, बेचैनी, संघर्ष यासाठीची रसद त्याला शहर पुरवतं. माणसाच्या माणूस असण्यात वा नसण्यात त्याच्या भौगोलिकतेचा केवढा तरी वाटा असतो हे मी दोन-चार शहरं बदलल्यावर नक्की म्हणू शकते. आर्थिक अडचणीमुळे गावाकडची शेती, वाडा विकून शहरात आल्यावर माझे एक चुलतकाका आतून खूप मोडून पडले. पण त्यांना ते दाखवण्याचीही मुभा नव्हती. आता नव्या शहरात मुलीची शाळा बदलायला त्यांची धावपळ सुरू होती. एका फॉर्मवर कागदावर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता असं लिहायचं होतं. ‘कायमचा पत्ता’ लिहिताना ते थबकले आणि ‘आता आपल्याला कायमचा पत्ता कुठं उरला गं...’ असं बायकोला सांगत हमसून-हमसून रडायलाच लागले. मी बरीच लहान होते तेव्हा. पण आता ते आठवताना कळतं, ‘कायमचा पत्त्या’मध्ये केवढं काय काय साठवलेलं होतं ते.अजून इतकं तीव्रतेनं वाटलं नाही कदाचित, पण ‘कायमचा पत्ता’ मिळवायला मी काही धडपड केली नाही. असोशी आहे ती वाहतं, खळाळतं राहण्याची. स्थावर जंगम मालमत्तांच्या नाईलाजांना नाकारत माझ्याएवढंच जिवंत स्थलांतर स्वीकारत राहण्याची.‘तू मूळची कुठली?’ असं कुणी विचारलं की एका शब्दातलं उत्तर नसतं आता माझ्याकडंमी माझ्यापुरती निदा फाजलींच्या आवडत्या ओळी गुणगुणते, ‘वक्त के साथ है मिट्टी का सफर सदियोंसे किसको मालूम कहॉँ के है, किधर के हम है...’- शर्मिष्ठा भोसले( शर्मिष्ठा मुक्त पत्रकार आहे.sharmishtha.2011@gmail.com)