शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

आयआयटीतून बाहेर पडून खेडय़ापाडय़ात जाणारा एक तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 07:00 IST

आयआयटीमधून पासआउट मेकॅनिकल इंजिनिअर, त्यानं शहरी वाट नाकारली आणि कुपोषणमुक्तीसाठी थेट खेडय़ापाडय़ात पोहोचला!

ठळक मुद्दे कुपोषणग्रस्तांसाठी ‘स्वस्थ भारत प्रेरक’ म्हणून काम करायचं ठरवलं.

- चेतन ननावरे

आयआयटी गांधीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन तो उत्तीर्ण झाला. खरं तर त्याला कुठंही उत्तम पगाराची चकाचक कार्पोरेट नोकरी मिळाली असती; पण  24 वर्षाचा या तरुणानं कुपोषण या विषयात काम करायचं ठरवलं. करण पळसकर. त्याची आई अंगणवाडी सेविका. तिच्या कामाच्या निमित्तानं त्यानं गावखेडय़ातलं वास्तव अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मोठय़ा शहरात काम करण्यापेक्षा आणि तिथं समाधान शोधण्यापेक्षा खरंखुरं समाधान शोधत त्यानं खेडय़ापाडय़ाची वाट धरली.  कुपोषणग्रस्तांसाठी ‘स्वस्थ भारत प्रेरक’ म्हणून काम करायचं ठरवलं.केंद्र सरकार आणि टाटा ट्रस्टने एक करार केला आहे. त्याअंतर्गत महिला व बालविकास विभागासाठी स्वस्थ भारत प्रेरक म्हणून अहमदनगर जिल्ह्यात करण सध्या काम करतो आहे. आता राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांसोबत ग्राउण्ड लेव्हलवर काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पोखरी येथील शाळेत करणनं प्राथमिक शिक्षण घेतले. करणची हुशारी पाहून तेथील शिक्षकांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी येथील जवाहर नवोदय विद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. इथंच करणच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हुशार असल्यानं त्यानं आयआयटी गांधीनगर्पयतचा प्रवास सहज केला. तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं पदवी प्रशिक्षण घेताना करणला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. या महाविद्यालयात औपचारिक शिक्षण सुरू असतानाच सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी विद्याथ्र्याना डेव्हलपमेंटल स्टडीज आणि ग्लोबल पॉलिटिकल इकॉनॉमी हे विषय शिकावे लागतात. या विषयांच्या माध्यमातून करणने गुजरात सरकारसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयावर दोन महिने काम केलं. हा अनुभव करणसाठी मोलाचा होता. त्या काळात करण यूपीएससीची तयारीही करत होता. याच काळात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या उपक्रमात स्वस्थ भारत प्रेरक म्हणून कुपोषणमुक्तीसाठी काम करण्याची संधी चालून आली. याआधी आईसोबत कुपोषणमुक्तीवर चर्चा करणार्‍या करणला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कुपोषणमुक्तीचं काम करण्याची संधी मिळाली. मनुष्यबळाच्या मदतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कुपोषणमुक्तीचं ध्येय लवकर साध्य करता येईल असं करण नेहमी आईला सांगायचा. आज हीच वाक्य खरी करून दाखवण्याची किमया करण करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीवर तो सरकारसोबत काम करत आहे. जिल्हास्तरावरील माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना संकलित करून देणं, शासनाच्या निधी सोबतच  लोकसहभागातून कुपोषणमुक्तीसाठी  प्रयत्न करणं असं त्याच्या कामाचं स्वरूप आहे.  गेल्या सात महिन्यांपासून ग्रामीण भागात काम करत असताना आपल्या शहरी मित्रांचीही त्याला मोठी मदत होत आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचं ध्येयही त्याच्यासोबत आहेच. मात्र प्रत्यक्ष गावपातळीवर काम करण्याचा अनुभव आपल्याला अधिक समृद्ध करतोय असं तो सांगतो!