शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साधेपणानं लग्न करायला काय हरकत आहे?

By admin | Updated: October 30, 2014 19:55 IST

साध्या लग्नाच्या आणि नंतरच्या अत्यंत साध्या लाईफस्टाईलच्या कहाण्या आपण वाचलेल्या असतात. पण नेमकी लग्न करायची वेळ येते तेव्हा कुठं जातं हे शहाणपण?

साधेपणानं लग्न केलेली कितीतरी जोडपी आपल्या अवतीभोवती असतात. नारायण आणि सुधा मूर्तीसारख्यांच्या साध्या लग्नाच्या आणि नंतरच्या अत्यंत साध्या लाईफस्टाईलच्या कहाण्या आपण वाचलेल्या असतात. पण नेमकी लग्न करायची वेळ येते तेव्हा कुठं जातं हे शहाणपण? साधेपणानं लग्न केलं अगदी ‘व्यवहार’ डोळ्यासमोर ठेवून जरी केलं तरी बरेच फायदे आहेत.
मात्र त्यासाठीच हे काही ‘जिव्हारी’ लागणारे प्रश्न.
 
1) एकतर जेवणावळी, डेकोरेशन, देणीघेणी यावरचा अवास्तव खर्च टळतो. त्यातून वाचलेला पैसा आपण आपल्यासाठी कुठं गुंतवू शकतो. विशेषत: मुलींच्या वडिलांनी तो पैसा मुलींच्या नावे फिक्स डिपॉङिाट करावा. (म्हणजे मुलीला द्यायचा असा हट्टच असेल स्वत:चा आणि मुलीचा तर.) अर्थात मुलींनी तरी का म्हणून सांगू नये की, मला नको हा पैसा नि खर्च. माझं लग्न साधेपणानंच करा.
 
2) लग्न ठरलं की विचारतो का आपण एकमेकांना की, पैशाचं प्लॅनिंग कसं करणार? कुठली बिलं कोण भरणार? आर्थिक जबाबदारी नक्की कुणाची? 
 
3) ज्या मुलांना एरव्ही सगळ्यासंदर्भात स्वातंत्र्य हवं असतं त्यांनी आईवडिलांचा पैसा स्वत:च्या लग्नासाठी उडवणं, वापरणं किती बरोबर याचाही विचार करावा. आपण स्वकमाईचे पैसेसुद्धा अनाठायी उधळत नाही मग पालकांचे कष्टाचे पैसे असे का उडवावेत?
 
4) लाईफस्टाईलचा आपला आग्रह काय, महागडे गिफ्ट्स, प्रवास, हॉटेलिंग, दागिने हे हवंच असेल तर सांगतो का एकमेकांना की गृहीत धरतो लग्नाच्या नावाखाली?
 
5) साधेपणातून लग्न म्हणजे परस्पर विश्वास, सामंजस्य, आणि एकमेकांना साथ देत नव्या आयुष्याची सुरूवात असं आपण मानतो की लग्नातला तामझामच जास्त महत्त्वाचा वाटतो?