शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बाकी सोडा , कामाचं बोला असं म्हणणा र्‍या बिहारी तरूणांच्या मनात काय चाललंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 08:00 IST

लॉकडाऊननंतर हजारो बिहारी तरुण राज्यात परतले, आता तिथं त्यांच्या हाताला काम नाही, प्रश्न आहे जगायचं कसं? निवडणुकीच्या मोसमात  हे तरुण मात्र भयंकर संतापलेले आहेत.

- पार्थ एमएन

पाटण्यातला सिपारा पूल. रोज दिवस उजाडला की या पुलाखालची आशा मावळायला लागते. या पुलाखाली रोज सकाळी पटना आणि लगतच्या जिल्ह्यातले शेकडो मजूर जमतात. मजूर बाजारच म्हणतात या भागाला. बिहारच्या गावखेड्यातून लोक रोजीरोटीच्या शोधात पाटण्यात येतात आणि हाताला काम मिळावं म्हणून सकाळ झाली की, या पुलाखाली येऊन उभे राहतात. आशा एवढीच की कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर येईल, कामासाठी त्यांना उचलून घेऊन जाईल. जसजसा दिवस डोक्यावर यायला लागतो तसतसं काम मिळण्याची शक्यता संपायला लागते. हात रिकामे राहतात. या पुलाखालच्या गर्दीचं एक चित्र चटकन डोळ्यात भरतं, तो म्हणजे त्यांचा वयोगट. पुलाखाली मजूर बाजारात आशाळभूत उभ्या या चेह-यांचं वय असतं 18 ते 35 वर्षे. बिहारमध्ये हाताला कामच नाही म्हणून त्यांचं तारुण्य असं या पुलाखाली उभं राहण्यातच निघून जातं. या मुलांच्या आकांक्षांना खतपाणी घालेल असं वातावरणच अवतीभोवती नाही.

आता राज्यात निवडणूक होतेय, तेजस्वी यादवने बेरोजगारी याच मुद्दय़ाभोवती आखलेली रणनीती तरुणांचं लक्ष वेधते आहे. भाजप आणि जेडीयूच्या युतीसमोर तो उभा ठाकलाय, त्याचवेळी त्याच्याच वयाच्या मुलांच्या मनात काय घुसमट आहे याची तार त्यानं छेडलेली दिसतेय. सिपारा पुलाखालीच मला राहुल कुमार भेटला. वय वर्षे 28. सिपारा पुलाखाली नुसता बसून होता. तो मुंबईत एम्ब्रॉयडरीचं काम करून महिन्याला वीस हजार रुपये कमवायचा. लॉकडाऊनमध्ये त्याच्या हाताचं काम गेलं आणि तो जेहानबादला परतला. पटण्यापासून 50 किलोमीटर अंतरावरचं हे गाव. आता काम शोधत तोही या पुलाखाली येऊन बसला होता. गेल्या 19 दिवसात फक्त दोनदा काम मिळालं असं सांगत होता. बोलता बोलता त्याला भरून आलं; म्हणाला, ‘आता घरी परत जायचं तरी माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. मी रेल्वे स्टेशनवरच झोपत, दिवसातून एकदा जेवतो. मंदिराच्या आवारात रोज कुणीतरी अन्नदान करतो, तिथंच जेवतो.’ राहुल तसा नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचा सर्मथक मतदार. यावेळी नाही देणार मत असं तो सांगत होता.

 

तीन आठवडे मी बिहारमध्ये फिरलो, राहुलसारखी अनेक तरुण मुलं भेटली. लॉकडाऊननंतर त्यातले बहुसंख्य देशाच्या विविध भागातून बिहारमध्ये परतले होते. आता जगायचं तर त्यांना काम हवं, मात्र राज्य सरकार रोजगार उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत बिहारने दोन लाख तीनस हजार जॉब कार्ड दिले असं मनरेगाची माहिती सांगते. म्हणजे रोजगारी जॉब कार्ड देण्यात 20 टक्के वाढ झालेली दिसते. मात्र असं असूनही फक्त 4,551 कुटुंबानाच ऑक्टोबर मध्यापर्यंत 100 दिवस काम मिळालं होतं. एकीकडे रोजगार हमीची ही स्थिती दुसरीकडे दुसरे पर्यायी काहीच रोजगार उपलब्ध नाहीत. बिहारमधले हजारो तरुण मुलं बेकायदा दारू गाळण्याच्या व्यवसायात काम करतात. एप्रिल 2016 मध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदीची घोषणा केली. मात्र त्यातून बेकायदा दारूचा व्यवसाय फोफावला, लिकर माफियांनी डोकं वर काढलं. याच लिकर माफियांनी शेकडो तरुण मुलांना डिलिव्हरी बॉय म्हणून काम दिलं. पटण्याला लागून असलेल्या भागात मी दारूगाळणार्‍या काही तरुण मुलांना भेटलो. त्यातला एकजण सांगतो, ‘लिकर बॅनपूर्वी एका दारूच्याच दुकानात काम करायचो. दारूबंदी झाली, माझं काम गेलं. पण तेव्हा जे काम करायचो तेच मी आताही करतोय. फक्त तेव्हा हे काम कायदेशीर होतं आता बेकायदा आहे. आमच्या हातचं काम काढून घेण्यापूर्वी नितीश कुमारने आमच्यासाठी काही वेगळं काम तयार ठेवलं होतं का? इथं काही उद्योग-व्यवसाय उभारले का? नाही ना मग काय म्हणून आम्हाला बेरोजगार केलं? तुम्हाला जर हाताला काम देता येत नसेल, तर हातचं काम निदान काढून तर घेऊ नका.’ दुसरा त्याच्यासोबतचाच मुलगा म्हणाला, ‘तुमच्याकडे पर्याय आहेत तरी तुम्ही बेकायदा काम करता तर ते काही बरोबर नाही. पण जर सरकार जर आमची काळजी करणार नसेल, हाताला काम नसेल तर आम्हाला तर पोट भरण्यासाठी काहीतरी करावंच लागेल.’

फसलेल्या दारूबंदीचं हे असं भयंकर चित्र आहे. दारूबंदी असल्यानं काळ्या बाजारात दारू अत्यंत महागडी विकली जाते. गरिबांना ती परवडत नाही मग ते मादक द्रव्यांची नशा करू लागलेत. बिहारच्याच दिशा डीअँडिक्शन सेंटरमध्ये गेलो. तिथंही वय वर्षे 18 ते 35 याच वयोगटातले अनेकजण अँडमिट असलेले दिसले. मादक द्रव्यांची नशा करून या सेंटरपर्यंत पोहोचलेले हे तरुण. बिहारी तारुण्याची अवस्था अशी भीषण आहे. ते मतदानाला जातील तेव्हा हे सारं सोबत असेल. हेही खरंच की, बिहारमध्ये जातीपातीचं राजकारण मोठं आहे. तरुण मुलं जातपात घरी ठेवून मतदानाला जातील असं मानणंही भाबडेपणाचं ठरेल. मात्र बिहारमध्ये भेटणारा तरुण आजतरी चिडलेला, संतप्त आहे. आणि आजतरी नितीश कुमार आणि त्यांची मुख्यमंत्रिपदाची चौथी टर्म यांच्या मध्ये जर कुणी उभं असेल तर ती ही तरुण मुलं आहेत!

(पार्थ इंडियास्पेण्ड या पोर्टलसाठी काम करतो, तीन आठवडे बिहार दौरा करून तो नुकताच परतला आहे.)

parth.mn@gmail.com