शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

बहिणींचं म्हणणं काय?

By admin | Updated: August 27, 2015 18:27 IST

बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना

 बहिणींचं म्हणणं काय?

नका ना करू आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.बहिणींचं म्हणणं काय?
नका ना करू 
आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.