शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

बहिणींचं म्हणणं काय?

By admin | Updated: August 27, 2015 18:27 IST

बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना

 बहिणींचं म्हणणं काय?

नका ना करू आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.बहिणींचं म्हणणं काय?
नका ना करू 
आमची काळजी!
‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रंत बहिणींनी मांडलेली ही गा:हाणी!
 
 
1) बहिणी म्हणतात की, घरात नकळत असं वातावरण असतं की, तो भाऊ आहे ना, मुलगा आहे ना, मग त्याला तुङयापेक्षा जास्त कळतं, हे मान्य कर! असं का? अनेक बहिणींना तर भावांच्या एका वाक्याचा कायम त्रस होताना दिसतो, ‘तू गप्प बस, तुला काय कळतं? बाहेर माहिती आहे का पोरं काय काय बोलतात?’
मुली म्हणतात, पोरं जे बोलतात, ते बोलणं बंद नाही करता येत म्हणून आम्हाला का घरात बसवता?
 
2) घरकाम हा आणखी एक वादाचा विषय. घरात भाऊ काहीच काम करत नाही. आयतं बसून खातात. ऑर्डरी सोडतात. ही मुलींची आणखी एक तक्रार. त्या म्हणतात, आम्ही कॉलेजातून आल्यावर लगेच कामाला लागतो. हे काहीच काम करत नाहीत. उलट आम्हाला कामं सांगतात. रुबाब करतात. असं का?
 
3) भावांचे मित्र ही अनेकींसाठी मोठी डोकेदुखी. हे मित्रच त्या भावाला काहीबाही सांगतात. कुठं पाहिलं कुणाशी बोलताना की फोन करतात. बहिणी विचारतात की, आमच्यापेक्षा मित्रंवर भावाचा विश्वास जास्त. आमचं काही ऐकूनच घेत नाहीत. मग आम्ही तरी यांच्याशी का पोटातलं काही बोलावं?
 
4) सख्खेच कशाला, चुलत-मावसभाऊही आपल्यावर नजर ठेवतात, आपल्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवतात, आपल्याला अक्कल शिकवतात असं मुलींचं म्हणणं. आणि हे सारं का, तर पुन्हा तेच, बाहेर जग वाईट आहे, तुझी आम्हाला काळजी वाटते. मुली म्हणतात, नका ना करू आमची काळजी!
 
5) फोन हा या नात्यातला सगळ्यात जास्त वादाचा, अविश्वासाचा प्रश्न झाला आहे असं दिसतं. फोनवर तासन्तास बोलणं, मित्रमैत्रिणी, त्यांचे सिक्रेट, वेगळ्या खोल्या या सा:यावरून भाऊबहिणीत संशयाचं, वादाचं आणि मुख्य म्हणते हेव्यादाव्याचं वातावरण आहे. बहिणी म्हणतात, हे सारं भाऊ स्वत: करतो. त्याच्या जगात काय चाललंय हे तो आम्हाला सांगत नाही. मग आम्ही का त्याला सांगायचं? जे तो करतो, तेच आम्ही केलं तर आमचं काय चुकलं?
6) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सख्खे, नात्यातलेच नाही तर मानलेले भाऊही मुलींना धाकात ठेवायचा प्रयत्न करतात असा अनेकींचा अनुभव आहे.
मात्र तरीही. भाऊ पाठीराखा आहेच!
1) अजूनही काही मुलींना वाटतं की, भाऊ आपल्यावर ओरडला तर तो त्याचा हक्कच आहे. त्यानं काही बिघडत नाही. शेवटी घराची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे तो आपल्याला कण्ट्रोल करणारच!
2) आणि काही मुली मात्र डोळ्यात पाणी आणून सांगतात की, आपल्या भावानं आपल्याला मदत केली. तो कायमच पाठीराखा म्हणून उभा राहिला. त्याच्याचमुळे आपण थोडंबहुत शिकून स्वत:च्या पायावर उभं राहू शकलो.