शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आयुष्यात मैत्री असेल तर आपण नशीबवान आहोत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:55 IST

जगण्याच्या वाटेवर दोस्त बदलतीलही; पण आपण बदलत नाही, कारण आपल्यातला दोस्त आपल्याला बदलू देत नाही!

-निशांत महाजन

दोस्ती क्या है?क्या है दोस्ती?- या प्रश्नाचं उत्तर दोस्तहो, कुणाला देता आलंय, एका वाक्यात बरोबर?गाळलेल्या जागा भरा किंवा संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या असं म्हणत तरी कुठं येते दोस्ती आयुष्यात?तिला ना कुठले प्रमेय, ना कुठली गृहीतकं.पुस्तकातल्या कुठल्याच चौकटीत बसू नये आणि तरी जगण्याचं पुस्तक व्यापून उरावी अशी ही जादू आहे.ती जादू भेटते कशी? कुणाला? का?याची काही उत्तरं नाहीत, आहेत त्या फक्त जाणिवा, हिंदीत म्हणतात ना, सिर्फ एहसास! ये बतानेवाली, समझानेवाली चीज नहीं, ये सिर्फ महसूस की जा सकती है!खरं सांगायचं तर ती महसूसही नाही होत, किंवा महसूस करूनही नाही भागत, ती ‘निभवावी’ लागते, आणि जिथं मित्राचा संकटात निभाव लागतो तिथंच ती निभतेही, टिकतेही!आणि म्हणून हा फ्रेण्डशिप डे!ज्यानं त्यानं आपणच आपल्याला विचारावा हा प्रश्न की, खरंच आपण अशी दोस्ती निभावतोय का? दोस्त म्हटलं की फक्त विश्वास, स्वत:पेक्षाही जास्त त्याच्यावर जास्त भरवसा असा कुणी चेहरा येतो का डोळ्यासमोर?आपल्याआधी आपला विचार करणारा, आपले कान धरणारा, आपल्याला लागेल असं बोलणारा, आपला मनसोक्त अपमान करणारा, पाठीत चार फटके मारणारा आणि सारं जग आपल्याकडेच पाठ करून उभं राहिलं तरी आपली साथ न सोडणारा.असा कुणी मित्र असेलच आपला.तर आपण नशीबवान आहोत!***आपण कधी हरतो, थकतो कधी जगण्याच्या वाटेवरत्या वाटेवर आपल्याला हात देतो तो दोस्त.आपल्याला उभारी देतो, समजावतो, उमेद दाखवतो,पायाखालच्या वाटेवर नाही तर स्वत:च्या पावलावर विश्वास ठेव म्हणतो, तो असतो मित्र.असा कुणी असेलच आपला मित्र.तर आपण नशीबवान आहोत!*****शाळेत, आपल्याच बेंचवर बसून मोठा झालेला असतो तो,कुणी आपल्या शेजारी आपल्या ऑफिसच्या डेस्कशेजारीच डेस्क लावून बसतो,कुणी आपल्या बसमध्ये रोज असतो,कुणी येतो शेजारी अवचित राहायलाआणि मग प्रश्न पडतो की, इतकी वर्षे याच्याशिवाय कसं काय आपण जगत होतो आयुष्य? किती सहज आपण आपलं जगणं वाटून घेतलं त्याच्यासोबत? किती सहज आजवरचा प्रवास त्याच्यासह केल्यासारखंच जगतोय आपण आता.असा कुणी असेलच आपला मित्र.तर नशीबवान आहोत आपण!***मित्र मित्र म्हणता, मैत्रीण नसते का अशी कुणी?मुळात मित्र हा शब्द वाटत असला पुल्लिंगी तरी अपेक्षित असतं त्यात निरपेक्ष मैत्र.त्यामुळे मित्र काय नी मैत्रीण काय, त्यांना कुठं कळतात जगाची नाती?त्यांना कुठं समजतात तीच ती जुनी वेढी, ज्यात मित्रला लिंगभाव जोडला जातो,ज्यात मुलामुलींच्या मैत्रीला लावले जातात नियम,त्यापलीकडे असतं मैत्र.शारीर काही नसतं त्यात, असतं निखळ-अवखळ असं दोस्तीचं जिंदादिल रूप.ते रूप विसरून जातं, कोण मुलगा नी कोण मुलगी.त्यांना दिसतो फक्त आपला मित्र, दोस्त, आपलं मैत्र.असं निखळ नजरेचं आणि नितळ मनाचं असेल कुणी आपल्या आयुष्यात.तर खरंच समजा, नशीबवान आहोत आपण!***मग ऑनलाइन मैत्रीचं काय?की ऑनलाइन नसतात का मित्र? की ते नुस्ते लाइक्स आणि अंगठय़ांपुरते.तेवढय़ापुरतेच नसतात तिथंही काहीजण.तिथंही भेटते, निखळ मैत्री.होतात नव्या ओळखी.जुळतात मनाचे धागे आणि दोस्ती तिथंही दाखवतेच आपले रंग.फक्त तसा मित्र त्या आभासी जगात आपल्याला शोधता आला पाहिजे.त्यासाठी आपलीही नजर हवी स्पष्ट.त्या नजरेला सापडलंच असं मैत्रतर खरंच समजा, नशीबवान आहोत आपण!***सगळ्यात महत्त्वाचं. नसेलही आपल्या आयुष्यात असा कुणी मित्रतर आपण तसं होऊ!विश्वासानं मित्र जोडू, जिवाला जीव देऊ,मदतीला हात देऊ,निभावू दोस्ती.खरं सांगतो, तेवढं जरी जमलं.तरी नशीबवान आहोत आपण!