शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
3
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
4
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
5
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
6
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
7
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
8
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
9
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
10
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
11
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
12
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
13
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
15
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
16
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
17
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
18
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
19
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
20
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...

थिन फॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:36 IST

ज्यांचं वजन कमी, वजन वाढतच नाही त्यांना लुकडे, बारकुडे म्हणून बाकीचे चिडवतात. पण कुणी काहीही म्हणो, वजन वाढवण्याचा अट्टहास न करता फिट रहा. नाहीतर..

-डॉ. यशपाल गोगटे

आधुनिक तंत्रज्ञानात यंत्राचा आकार जितका छोटा तितकी त्यातली टेक्नॉलॉजी भारी ! तसेच काहीसे मानवी शरीरातही घडत असते. आपल्या आजूबाजूस काही अतिशय बारीक व्यक्ती असतात; परंतु त्या अधिक काटक असतात. त्यांना बरेच वेळा बारक्या, लुकड्या म्हणून हिणवले जाते. आईवडिलांच्या मनात तर अशा मुलांना जबरदस्तीने खायला घालून त्यांचं वजन वाढवण्याचा एकमेव विचार असतो. अशा तºहेचा कमी वजनाचा न्यूनगंड न बाळगता या मुलांना कसे बारीक ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे. अशा मुला-मुलींनी बारीकच का राहावं या बद्दलची माहिती जाणून घेऊ.बाळसं की सूज?गरोदरपणात कुपोषित मातांची अर्भके कमी वजनाची असली तरीही काटक असतात. गरोदरपणात कुपोषणामुळे बाळाच्या शरीराला कमी कॅलरिजमध्ये शरीराचे व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळता येते. जन्मानंतर मात्र या कमी वजनाच्या बाळांना बाळसेदार - गुबगुबीत करण्याच्या हव्यासापायी त्यांना अधिक प्रमाणात (आवश्यकता नसताना मागे लागून) खायला दिलं जातं. कमी कॅलरिजवर निभावणाऱ्या त्यांच्या शरीरावर या अतिरिक्त खाण्याचा भार येतो. ही मुलं बाळसेदार तर होतात; परंतु हे बाळसं त्यांच्या पुढील वयात लठ्ठपणामुळे होणाºया आजारांना निमंत्रण देतं. खासकरून वयात येण्याच्या काळात या मुला-मुलींचं वजन झपाट्यानं वाढतं. म्हणूनच जन्मत: कमी वजनाच्या (२.५ किलोच्या आतील) बाळांचं वजन वाढवण्याचा अट्टाहास टाळावा. या उलट त्यांना सुदृढ राहण्यावर भर द्यावा. शक्यतो या मुलांना बारक्या, किडकिडीत असं म्हणून हिणवू नये.प्रतिकूल परिस्थितीत, कुपोषित आईच्या पोटात वाढलेल्या अर्भकाच्या शरीराचं कार्य कमी कॅलेरिजमध्येदेखील उत्तम चालतं. त्याला अनुकूल परिस्थिती मिळाल्यास तो लठ्ठपणाकडे वळतो व चयापयाच्या आजारांना बळी पडतो.थीन फॅट इंडियन१८-२० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असतं ते आपल्या शरीराला सहजपणे पेलवते. सामान्यत: एक समज आहे की वयाबरोबर वाढणारं वजन हे शरीराला सहजपणे पेलवता येतं. तुमच्या १८-२० वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचं वजन पाच किलोपेक्षा अधिक असेल, आणि जरीही ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरुवात ठरू शकते. ही गोष्ट खासकरून भारतीय समाजात खरी ठरते.बºयाचशा भारतीयांचं वजन जन्मत: कमीच असते व ते १८-२०व्या वर्षांपर्यंत कमीच राहतं. आपल्या वजनप्रेमी मानसिकतेमुळे या लोकांना जाड केलं जातं. यामुळे आज भारतामध्ये चयापचयाचे आजार साथीच्या रोगाप्रमाणे पसरत आहेत. भारतीयांमध्ये आढळणाºया अशा लोकांना थिन फॅट असे म्हटले जाते. ही लोकं दिसायला जरी बारीक असली तरीही त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण अधिक असतं व ते नुकसानकारक ठरतं. त्यामुळे तुलनात्मक रीतीने ते लठ्ठ किंवा जाड याच वर्गात मोडतात. अशा लोकांनी फक्त दिसण्याचा विचार न करता थीन फॅट न राहाता थिन फिट राहण्याचा प्रयत्न करावा.

(लेखक एण्डोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत. dryashpal@findrightdoctor.com)