शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

स्वभावाला औषध असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:08 IST

दिवसभर एकटी रूमवर पडून असते. खाणंपिणं नाही, अंघोळ नाही, आत्मविश्वास कमी, कशातच मन लागत नाही. सोहिनीचं नेमकं काय बिनसलेलं असेल?

ठळक मुद्दे हेल्पलाइन - कुणाशीच बोलता न येणारे विषय बोलण्याची हक्काची जागा!

- मानसी जोशी

सोहिनी दवाखान्यात आली तीच रडत रडत. गेल्या काही महिन्यांपासून तिला अतिशय निराश आणि हताश वाटत होतं. मूळची नागपूरची असलेली सोहिनी बारावीनंतर मुंबईत प्रतिष्ठित महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेत होती. पहिल्याच वर्षाला असताना तिचं अभ्यासात लक्ष कमी होऊ लागलं. ती कॉलेजला जाईनाशी झाली. दिवसभर आपल्या रूमवर एकटी पडून राहायची. खाणंपिणं नाही, अंघोळ नाही. हळूहळू तिचा आत्मविश्वास नाहीसा होत चालला होता. तिचं कोणत्याही गोष्टीत मन लागेना. कशातच रस वाटेना. शेवटी रूम पार्टनरने तिच्या घरी फोन करून तिच्या तब्येतीची खबर दिली. वडील येऊन गेले, चार दिवस राहिले. कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटले. तिला घरी घेऊन जातो म्हणाले; पण त्यालाही ती तयार नव्हती. शेवटी तिनं मानसोपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि एका मैत्रिणीला घेऊन दवाखान्यात आली. तिच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की तिला सतत धडधड, भीती वाटत होती, घराबाहेर पडणं तिनं पूर्ण बंद केलं होतं. तपशिलात शिरल्यावर असं लक्षात आलं की हे यापूर्वीसुद्धा एक-दोन वेळा होऊन गेलं होतं. तत्कालिक कारणं नेहमी वेगवेगळी असतात. या वेळचं कारण होतं ब्रेकअप. तिच्या सततच्या मूड स्विन्ग्सना कंटाळून तिच्या मित्नानं तिला पुन्हा आपण नको भेटायला असं सुनावलं आणि मॅडम कोसळल्या. एका क्षणात जानू, स्वीटू असलेला तो हरामखोर, लुच्चा आणि मतलबी बनला. तिच्या मैत्रिणीने सांगितलं की तिच्या मनासारखं झालं नाही तर ती असंच करते, जीव द्यायची धमकी देणं, ब्लेडनं हात कापून घेणं, आदळ आपट, चिडचिड करणं आणि नंतर दिवसेंदिवस नैराश्य. असं चक्र  तयार झालं होतं.सोहिनीचं सध्याचं निदान जरी नैराश्य असलं आणि त्यासाठी तिला औषधोपचारांची गरज असली तरी मूळ समस्या ही तिच्या स्वभावदोषांत आहे असं दिसतं. आक्र मक, आततायी, समाजोमुख, धीट, बोलका किंवा भित्रा , घाबरट, चिंता करणारा, विचित्न विचार करणारा, संशय घेणारा असे स्वभावाचे असंख्य कंगोरे आपल्या सगळ्यांच्या मध्येच कमी-अधिक प्रमाणात असतात; परंतु एखादी स्वभाव विकृती जेव्हा या कोणत्याही प्रकारचा अतिरेक करते तेव्हा त्याचा तिच्या सर्व नातेसंबंधांवर, कामावर आणि पर्यायानं आयुष्यावर परिणाम होत असतो. या स्वभाव विकृती कुत्र्याच्या शेपटासारख्या असतात. वाकडय़ा (कि वाकडय़ात). स्वभावाला औषध नाही म्हणतात ते काही उगीच नाही. लहानपणाच्या अनुभवांतून, सभोवतालच्या परिस्थितीतून या विकृती निर्माण होत असतात आणि त्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य हिस्सा होऊन जातात. त्यात आयुष्यात एखादा तणाव उद्भवला की या विकृती अक्राळ-विक्र ाळ स्वरूपात प्रकट होतात आणि जोडीला इतर मानसिक समस्या घेऊन येतात. तसंच सोहिनीचं झालं होतं.अशा व्यक्तींना मानसोपचारांची मदत होते. त्याचा खूपच परिणाम दिसून येतो. आयुष्य जगताना निर्माण होणार्‍या समस्या सोडवायला हे उपचार मदत करतात. आणि कालांतराने आपण हे प्रश्न आपले आपले सोडवायला शिकतो. मात्र आपलं नक्की काय होतं आहे, हे कळलं तर पाहिजे. ती अनेकदा असते का?हा प्रश्न आहे.

( मानसी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ आहे.)