शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

स्वभावाला औषध असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:08 IST

दिवसभर एकटी रूमवर पडून असते. खाणंपिणं नाही, अंघोळ नाही, आत्मविश्वास कमी, कशातच मन लागत नाही. सोहिनीचं नेमकं काय बिनसलेलं असेल?

ठळक मुद्दे हेल्पलाइन - कुणाशीच बोलता न येणारे विषय बोलण्याची हक्काची जागा!

- मानसी जोशी

सोहिनी दवाखान्यात आली तीच रडत रडत. गेल्या काही महिन्यांपासून तिला अतिशय निराश आणि हताश वाटत होतं. मूळची नागपूरची असलेली सोहिनी बारावीनंतर मुंबईत प्रतिष्ठित महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेत होती. पहिल्याच वर्षाला असताना तिचं अभ्यासात लक्ष कमी होऊ लागलं. ती कॉलेजला जाईनाशी झाली. दिवसभर आपल्या रूमवर एकटी पडून राहायची. खाणंपिणं नाही, अंघोळ नाही. हळूहळू तिचा आत्मविश्वास नाहीसा होत चालला होता. तिचं कोणत्याही गोष्टीत मन लागेना. कशातच रस वाटेना. शेवटी रूम पार्टनरने तिच्या घरी फोन करून तिच्या तब्येतीची खबर दिली. वडील येऊन गेले, चार दिवस राहिले. कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटले. तिला घरी घेऊन जातो म्हणाले; पण त्यालाही ती तयार नव्हती. शेवटी तिनं मानसोपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि एका मैत्रिणीला घेऊन दवाखान्यात आली. तिच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की तिला सतत धडधड, भीती वाटत होती, घराबाहेर पडणं तिनं पूर्ण बंद केलं होतं. तपशिलात शिरल्यावर असं लक्षात आलं की हे यापूर्वीसुद्धा एक-दोन वेळा होऊन गेलं होतं. तत्कालिक कारणं नेहमी वेगवेगळी असतात. या वेळचं कारण होतं ब्रेकअप. तिच्या सततच्या मूड स्विन्ग्सना कंटाळून तिच्या मित्नानं तिला पुन्हा आपण नको भेटायला असं सुनावलं आणि मॅडम कोसळल्या. एका क्षणात जानू, स्वीटू असलेला तो हरामखोर, लुच्चा आणि मतलबी बनला. तिच्या मैत्रिणीने सांगितलं की तिच्या मनासारखं झालं नाही तर ती असंच करते, जीव द्यायची धमकी देणं, ब्लेडनं हात कापून घेणं, आदळ आपट, चिडचिड करणं आणि नंतर दिवसेंदिवस नैराश्य. असं चक्र  तयार झालं होतं.सोहिनीचं सध्याचं निदान जरी नैराश्य असलं आणि त्यासाठी तिला औषधोपचारांची गरज असली तरी मूळ समस्या ही तिच्या स्वभावदोषांत आहे असं दिसतं. आक्र मक, आततायी, समाजोमुख, धीट, बोलका किंवा भित्रा , घाबरट, चिंता करणारा, विचित्न विचार करणारा, संशय घेणारा असे स्वभावाचे असंख्य कंगोरे आपल्या सगळ्यांच्या मध्येच कमी-अधिक प्रमाणात असतात; परंतु एखादी स्वभाव विकृती जेव्हा या कोणत्याही प्रकारचा अतिरेक करते तेव्हा त्याचा तिच्या सर्व नातेसंबंधांवर, कामावर आणि पर्यायानं आयुष्यावर परिणाम होत असतो. या स्वभाव विकृती कुत्र्याच्या शेपटासारख्या असतात. वाकडय़ा (कि वाकडय़ात). स्वभावाला औषध नाही म्हणतात ते काही उगीच नाही. लहानपणाच्या अनुभवांतून, सभोवतालच्या परिस्थितीतून या विकृती निर्माण होत असतात आणि त्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य हिस्सा होऊन जातात. त्यात आयुष्यात एखादा तणाव उद्भवला की या विकृती अक्राळ-विक्र ाळ स्वरूपात प्रकट होतात आणि जोडीला इतर मानसिक समस्या घेऊन येतात. तसंच सोहिनीचं झालं होतं.अशा व्यक्तींना मानसोपचारांची मदत होते. त्याचा खूपच परिणाम दिसून येतो. आयुष्य जगताना निर्माण होणार्‍या समस्या सोडवायला हे उपचार मदत करतात. आणि कालांतराने आपण हे प्रश्न आपले आपले सोडवायला शिकतो. मात्र आपलं नक्की काय होतं आहे, हे कळलं तर पाहिजे. ती अनेकदा असते का?हा प्रश्न आहे.

( मानसी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ आहे.)