शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

ती एक भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:54 IST

समर आणि इशाना. दोघं प्रेमात असतात. वेगळे होतात. एक दिवस सहज भेटतात. तेव्हा..

‘ती एक भेट’ ही फक्त साडेआठ मिनिटांची शॉर्ट फिल्म. पण, ही शॉर्ट फिल्म दोघांच्या दोन वर्षांपूर्वीच्या आणि दोन वर्षांनंतरच्या आयुष्याबद्दल बोलते. दोघांच्या नात्याबद्दल सांगते. नात्यापलीकडचंही खूप काही सांगून जाते. ही गोष्ट आहे समर आणि इशानाची. त्यांच्या एकत्र असण्याची, वेगळे होण्याची आणि तरीही आनंदी असण्याची. ही गोष्ट फक्त मौज-मजेची, रोमॅण्टिक नाही. आणि रडक्या, उद्ध्वस्त ब्रेकअपचीही नाही. ही गोष्ट आहे ब्रेकअपनंतरच्या एका छोट्याशा भेटीची. आणि ब्रेकअपसारख्या आयुष्यातल्या वेदनादायी घटनेकडे प्रॅक्टिकली पाहण्याची.समर आणि इशाना हे दोन वर्षांपूर्वी प्रेमात होते; पण ते एका टप्प्यावर वेगळे होतात. मात्र त्यांच्या वेगळे होण्यात कटुता नसते. एकमेकांना दुखवून, फसवून, दूषणं देऊन ती एकमेकांपासून वेगळी होत नाही. अतिशय समजून-उमजून, नात्यातल्या एकमेकांच्या स्पेसचा, निर्णयाचा आदर राखून वेगळी होतात. एकमेकांना विसरून जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण क्षणाक्षणाला आठवण काढून देवदासही होत नाहीत. आयुष्यात नात्यातल्या, नात्याबाहेरच्या, ओळखीच्या लोकांची जशी आपल्याला अधून-मधून हलकी, फुलकी आठवण येते, तशा या दोघांना एकमेकांच्या आठवणी येतात.त्या दिवशी इशानाला समरची आठवण येते. ज्या शहरात दोघांनी एकत्र अनेक वर्षं घालवली त्या शहरात इशाना आपल्या लिखाणाच्या कामासंदर्भात आलेली असते. तिथे आल्यावर तिला न राहवून समरची आठवण येते. करू का नको असं न करता ती त्याला फोन करते. आहे का वेळ, भेटायचं का? असा सहज प्रश्नही विचारते. व्यवसायाच्या कामात बुडालेल्या समरला तर आधी इशानाचा आवाजही ओळखू येत नाही; पण काही क्षणांत तो ओळखतो. भेटीसाठी तयारही होतो. तो तयार होत असताना त्याच्या मनात इशानाच्या आठवणी येत असतात. या आठवणींमुळेच समर आणि इशानाच्या नात्याची प्रेक्षकांना कल्पना येते. एकमेकांच्या इतक्या जवळ असतानाही ते वेगळे झाल्याची एक बाजू प्रेक्षकांना समरच्या नजरेतून समजते.समर आणि इशाना दोन वर्षांनंतर एकमेकांना भेटतात. पूर्वीचे प्रेमी म्हणून नाही, तर दोन अति ओळखीची माणसं भेटल्याप्रमाणे ती दोघं भेटतात. सुरुवातीला दोघं अडखळतात, अवघडतात. पण, नंतर सहज एकमेकांची, एकमेकांच्या कामाची, घरातल्यांची चौकशी करतात. काही मीनिटांमध्ये दोघांची भेट संपते.समरला भेटून इशाना रिक्षानं परतते तेव्हा तिच्या मनातल्या विचारांनी प्रेक्षकांना दोघांच्या वेगळं होण्याचं कारण इशानाच्या नजरेतून समजत जातं. समर आणि इशाना दोघेही समजूतदार. एकमेकांच्या प्रेमात. पण, या प्रेमापलीकडेही दोघांचं स्वतंत्र आयुष्य असलेली. दोघांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करायचं असतं, आयुष्य रेखायचं असतं. यात दोघांचं प्रेम, नातं अ‍ॅडजस्ट होणार नसतं. मग दोघेही वेगळे होतात.आता इशानाला समरला पुन्हा भेटण्याचा पश्चाताप होत नाही. उलट या एका भेटीतूनच इशानाला हे तीव्रपणे जाणवतं की माणसं वेगळी होतात, नाती संपतात; पण मनात त्यांचं असलेलं विशिष्ट स्थान कधीही संपत नाही.मनाली तेंडुलकर या फिल्मची लेखक, दिग्दर्शक. डिझायनिंगचं शिक्षण घेत असताना फिल्म मेकिंग हा तिचा स्पेशल सब्जेक्ट होता. नात्यांवर, नात्यांचं आपल्या आयुष्यात असलेल्या स्थानावर मनाली खूप गंभीरपणे विचार करायची. अभ्यासाचा भाग म्हणून तिला शॉर्ट फिल्म बनवायची होती, तेव्हा तिनं तिच्या नात्यांबद्दलचे विचार मांडायचं ठरवलं. त्यातूनच ही समर आणि इशानाची गोष्ट निर्माण झाली.‘ती एक भेट’.ही फिल्म इथं पाहता येईल..https://www.youtube.com/watch?v=c6V6w1b9P78माधुरी पेठकरmadhuripethkar29@gmail.com