शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

साता-याची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 10:39 IST

कानडी.. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक छोटंसं गाव. आई-वडील शेतकरी. आईची शेती व इतर कामांमुळे तब्येत बिघडलेली असायची.

- विकी चंद्रकांत जाधव

गाव सोडताना वाटलं होतं,शहर जगवेल.त्या प्रवासानं खरंच उभं केलं!कानडी.. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक छोटंसं गाव. आई-वडील शेतकरी. आईची शेती व इतर कामांमुळे तब्येत बिघडलेली असायची. आई-वडील आणि माझे दोन लहान भाऊ असं आमचं छोटंसं कुटुंब. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण शेजारच्याच गावात झालं. अकरावी व बारावीपर्यंतचं शिक्षणही गावापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आगनगडी या गावात झालं. तो प्रवासही फार खडतर होता. गावात येण्या-जाण्यासाठी बसची सोय नव्हती. त्यामुळे नेहमी सायकलवरून प्रवास करावा लागत असे. त्यातच गरिबी. आई-वडिलांचे अपार कष्ट दिसायचे. उराशी नवीन ध्येय बाळगून जसा प्रत्येकजण शहराकडे धाव घेतो तसा मीही धाव घेण्याचा निर्णय घेतला.साताºयाला आलो. साताराही तसं परवडणारं नव्हतं. पण ज्याच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल त्याच्यासाठी कोणतंच शहर परकं नसतं, असं म्हणतात. मी प्रथमच सातारासारख्या मोठ्या शहरात आलो होतो. बी.ए.च्या प्रथम वर्षाला मी सातारा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला आमच्या काही जुन्या पाहुण्यांची ओळख झाली. त्यांच्या घरी राहून मी शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. मी त्यांच्या घरी बेकरीतील काही कामंही करत असे. पुढे त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे तिथं राहता येईना. माझी अडचण मी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कानावर घातली. या समस्येवर त्यांनी योग्य तोडगा काढून माझी राहण्याची व उदरनिर्वाहाची सोय केली. एकेठिकाणी तात्पुरती का होईना नोकरीचीही व्यवस्था केली. मला हुरूप आला.मी नोकरीला जायचो ते ठिकाण होतं साताºयाचं ‘लोकमत’चं कार्यालय. या कार्यालयात मी ‘वार्तासंकलक’ तसेच ‘मुद्रितशोधक’ म्हणूनही काम करत असे. सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत कॉलेज करायचं आणि जेवण वगैरे आवरल्यानंतर दुपारी ठीक १ वाजता ‘लोकमत’च्या कार्यालयात हजर व्हायचो. रात्री साडेअकरापर्यंत काम असायचं. हा माझा दररोजचा दिनक्रम असे.पहिल्यापासूनच वाचनाची खूप आवड आणि मराठी हा विषय बी.ए.च्या तिन्ही वर्षाला ठेवला होता. मराठी व्याकरणाची थोड्याफार प्रमाणात तोंडओळखही होती. त्यामुळे काम करताना शिकत गेलो. कामाचा ताण होता पण त्याचा परिणाम अभ्यासावर कधी होऊ दिला नाही. रात्री कामावरून आल्यानंतर जेवण वगैरे उरकून एक- दीडपर्यंत अभ्यास करत बसायचो. सकाळी साडेपाचला उठून सर्व आवरून कॉलेज गाठायचो.कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचो. बी.ए.च्या तिन्ही वर्षात प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही. तसेच प्राचार्यांचे आणि शिक्षकांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळत गेले. कॉलेजमध्ये नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या, अनेक जिवा-भावाची माणसं मिळाली.साताºयात ज्या ‘लोकमत’च्या कार्यालयात काम करत होतो तिथे कुणाचीही ओळख नव्हती. मनात कायम एकच विचार घोळत राहायचा, तो म्हणजे या उच्चशिक्षित व्यक्तींबरोबर आपला निभाव लागेल का? मग मनात एक पक्क केलं, काहीही झालं तरी मागं हटायचं नाही. काही कालावधीनंतर कार्यालयातील कर्मचाºयांशी ओळख झाली. ते मला समजून घेऊ लागले. कामात सुधारणा सांगून मार्गदर्शन करत. काही दिवसांनी मी त्यांच्यात कसा रममाण झालो हे माझं मलाच कळलं नाही. तेथील प्रेमळ, जिवाभावाची माणसं मला आजही आठवतात. ‘लोकमत’ कार्यालयानं मला सुखद अनुभवांची शिदोरी दिली.अशा पद्धतीने मी बी.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. माझ्या या तीन वर्षांच्या शैक्षणिक कारकीर्दीत मला प्राध्यापकांचाही वडिलांप्रमाणे आधार होता. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. आता तिथं शिकतोय.एम.ए. व्यतिरिक्त मी नेट-सेटचाही अभ्यास करतोय. उराशी बाळगलेलं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडणार नाही. माझ्या शैक्षणिक आयुष्यात सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांनी मला भरभरून दिलं.कानडी ते सातारा साधारणत: २०० किलोमीटरचा प्रवास, पण हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला..कोल्हापूर