शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पंचविशीच्या पल्याड

By admin | Updated: July 28, 2016 17:47 IST

आर्थिक उदारीकरणानंतरचा भारत! जणू एक वेगळाच देश! व्यक्तीगत महत्वाकांक्षांनी भारलेला, संधींचं आकाश खुलं झालेला आणि संधीसोबत नवे प्रश्न, नवे ताण आणून अस्वस्थता वाढवणाराही!

 - ओंकार करंबेळकरगंजल्याने कोसळलेल्या पोस्टाच्या पेटीचा मित्राने मोबाइलवरून काढलेला आणि मोबाइलवरूनच फेसबुकवर टाकलेला फोटो पाहिला. त्याच्याखाली त्याने लिहिले होते, ‘प्लीज लूक अ‍ॅट मी. आय अ‍ॅम अल्सो इनबॉक्स...’ दोन मिनिटे गंमत वाटली, तरी हे सगळं खरंच विचारात टाकणारं होतं. ती बाजूला पडलेली पेटी आणि मोबाइलचा वापर.. दोन वेगवेगळ्या काळाची ही प्रातिनिधिक प्रतीकेच वाटू लागली.किराणावाला ते मॉलयादी करून घेऊन जायची, काटकसरीनं हव्या त्याच वस्तू आणायच्या आणि घरी परत. भाजीचंही तेच. घासाघीस. मॉल आले आणि खरेदीची ही रीतच बदलून गेली. उदारीकरण आणि मुबलक वस्तूंचे उत्पादन झाल्यावर सर्वात मोठा परिणाम झाला तो लोकांच्या आर्थिक सवयींवर. मुबलक वस्तूंमुळे खरेदीचे प्रमाण वाढलेच, त्याहून अनावश्यक वस्तूही खरेदी केल्या जाऊ लागल्या. एखादी वस्तू खरेदी करताना दुसऱ्या अनावश्यक वस्तूवर नजर पडते तीही घेतली. ती विकत घेता येणे शक्य नसेल तर तितकी ताकद येण्यासाठी प्रयत्न करायला हा काळ संधी देतो, कधीकधी भाग पाडतो. अगदीच शक्य नसेल तर कर्जाचा पर्याय उपलब्ध झाला. वन स्टॉप खरेदी हीदेखील नवी सवय झाली आहे. सर्व ब्रँडच्या वस्तू, कपडे एकाच मॉलमध्ये जाऊन विकत घेता येतात. मॉलमध्ये पायऱ्यांच्या जागी आलेले सरकते जिने वास्तविक आपल्याला खरेदीच्या वेगळ्या युगात घेऊन आलेले आहेत. हॉटेल, दुकांनामधील ‘आज रोख, उद्या उधार’ या पाटीची जागा आता कार्ड स्वाइप मशीनने घेतली आहे. कोणतीही वस्तू आता क्रेडिट, डेबिट कार्डने घेता येते. पाकिटाची बहुतांश जागा प्लॅस्टिक मनीने घेतली आहे.ईएमआय किती तुझा?कर्ज हा शब्दच मुळी १९९१ पूर्वी त्याज्य शब्दांमध्ये गणला जाई. एखाद्या घरामध्ये कर्ज घेण्याची वेळ आली तर आता त्यांचं संपलंय असाही विचार केला जाई. परंतु या दोन दशकांमध्ये कर्जाची भरपूर उपलब्धता असल्याचे दिसून येते. घर, गाडी असो वा कोणतीही लहान-मोठी वस्तू हप्त्यावर घेण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. आपल्या आर्थिक मानसिकतेत बदल झाल्याचे हे प्रमुख लक्षण. मग त्यानंतर विचार होतो तो कर्जाच्या उपलब्धतेचा आणि त्याचे भरपूर उपलब्ध झालेले पर्याय. ईएमआय भरून केलेली खरेदी आता रुबाबात सांगता येते. बँकांकडे कर्जासाठी चपला झिजवण्याऐवजी बँकाच लोकांकडे म्हणजे त्यांच्या ग्राहकांकडे येतात. कागदपत्रांची पूर्तता झाली की कर्ज तत्काळ उपलब्ध होते. मदर इल कम सून१९९१ नंतर काळात उदारीकरणाने माहिती क्षेत्रामध्ये आणि दळवळणाच्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. पत्रलेखन आता फक्त शाळा-महाविद्यालयात शिकवण्यासाठी राहिले, तर मदर इल (बहुतांशवेळा डेड) कम सून अशा त्रोटक शब्दांच्या ‘तारा’ बंदच करण्यात आल्या. ट्रंकॉल वगैरे शब्दांचा अर्थ तर आपल्याला कळणारच नाहीत इतके मागे पडलेत. काही महिने किंवा वर्षे नंबर लावून मिळणाऱ्या फोनचे एकेकाळी नवसाच्या पोरासारखे स्वागत आणि कौतुक व्हायचे. चैत्रगौरीसारख्या सजवलेल्या कोनाड्यात किंवा टेबलावर क्रोशाने विणलेल्या रुमालावर हे फोनसाहेब विराजमान होत. संदेश देण्यासाठी १९९१ नंतर पेजरने थोडाकाळ डोकावण्याचा प्रयत्न केला परंतु ते फारवेळ राहिले नाहँत. मग मोबाइल आले. माहितीचे क्षेत्र एकदम खुले झाल्यासारखे वाटू लागले. मोबाइलशिवाय दिवस कसा जाईल, असा प्रश्न पडावा इतके त्याच्यावरील अवलंबित्व वाढले आहे. मोबाइलचा हॅण्डसेट कोणत्याही वेळेस जाऊन विकत घ्यावा, हव्या त्या कंपनीची हवी ती सेवा देणारा प्लॅन निवडावा आणि तत्काळ सुरू झालेल्या मोबाइलवरून संभाषण सुरू करावे, एसएमएस करावेत, चित्रपटापासून रेल्वे-विमानाची तिकिटे काढावीत, ई-मेल करावेत, बिले भरावीत, बँकेच्या खात्यात ये-जा तपासावी असा सगळा मामला आहे हा. नाही म्हणायला बटणं दाबायच्या कंटाळ्याने एसएमएस, ई-मेलची भाषा पुन्हा टेलिग्रामसारखी मदर इल कम सूनसारखीच त्रोटक, तुटक केली आहे. मॅक्डी, सब आणि ग्रॅब-इटमोठ्या शहरांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी व्हेंडिंग मशीनवर अवंलबून राहिल्या आहेत. एटीएमसारखी चिप्स, कोल्ड्रिंक्सची ग्रॅबइट व्हेंडिंग मशीन्स मोठ्या कार्यालयात किंवा संकुलांमध्ये लावली जातात. आपल्याला हव्या त्या वस्तूसाठी नाणे सरकवायचे आणि वस्तू मिळवायची. मग ते चिप्स असतील, कोला, चॉकलेट, गोळ्या किंवा नूडल्सही... आठवड्याकाठी फिरायला गेल्यावर तेथे काहीही मागायचं नाही बरं का अशी दटावणी ऐकणारी किंवा एक भेळ खाऊन झाल्यावर गप्प बसणारी मुलं आता पालकांच्या भूमिकेत गेली आहेत. ती स्वत:च मनमुराद खातात आणि मुलांना खाऊ घालतात. बटाटेवड्याच्या शेजारी मॅकडोनल्डचा बर्गर आणि सबवेचे मोठाले सँडविच येऊन बसले आहेत. थालीपिठाबरोबर पिझ्झाचेही तितक्याच आनंदात स्वागत केले जाते. हॉटेलात जाणे ही चैनीची बाब सवयीत रूपांतरित झाली आहे. काही शहरांमध्ये शनिवारच्या रात्रीस अगदी लोक हटकून (जणू चूलबंदीच लागू झाली अशा थाटात) हॉटेलात जेवतात. या जेवणासाठी टेबल बुक वगैरे करून नंबर लावले जातात. हॉटेलंही बँकांप्रमाणे घराच्या दारात आली आहेत. आई-बाबा गावाला गेले आहेत किंवा घरी स्वयंपाक करणारे कोणीच नाही म्हणून आपल्याच शहरातील नातेवाइकांकडे जेवायला जाणे, अगदीच तसे नसेल तर शेजाऱ्यांनी त्यास अन्न देणे यातही बदल झालेला आहे. आई-बाबांची पाठ वळताच थेट पिझ्झा मागवता येतो किंवा कधी पालकच भूक लागली हे मागवून खा असे सांगून 'काळजी’ घेतात.ऐटीत आयटी संगणकाचा वाढलेला वापर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला घेऊन आले. आउटसोर्सिंग, बीपीओ अशी नावेही आपल्या कानावरून गेली नव्हती अशी क्षेत्रे भारतामध्ये उदयास आली. काही क्षेत्रांमध्ये भारत हा तर केंद्रबिंदू बनला. मध्यमवर्गीय घरातले मुलंमुली आयटीत बडेबडे पॅकेज कमवू लागले. अमेरिकेत जाऊ लागले. काही तिकडे सेटल होऊ लागले, तर काही परतून घरीही येऊ लागले. या आयटीनं अनेकांची लाइफस्टाइलच बदलून टाकली. इडियट बॉक्सची कमालदूरदर्शन संचालाही फोनसारखीच किंमत होती. या दोन दशकांमध्ये टीव्हीमुळेही भारतीयांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. टीव्हीचे आकार, प्रकार बदलले. टीव्ही म्हटला की तो रंगीत हे आलेच. खिसे फुगत गेले तसे टीव्हीचे आकार आणि संख्याही वाढत गेली. एका घरात एकच टीव्ही संच हा प्रकार मागे पडून प्रत्येकाच्या आवडीनुसार टीव्ही घरातल्या भिंतीवर लटकू लागला. पार फ्लॅटही झाला. या टीव्हीवर आवडती मालिका इंटरनेटवरही पाहण्याची सोय करून ठेवली आहे.सोशल मीडियाचे आभासअत्याधिक यांत्रिकीकरणाने दिवसाचे तासही कमी केलेत की काय अशी शंका येण्याइतपत आयुष्य वेगवान केले आहे. घरी बोलायला वेळ नाही, कामाचे तास यामध्ये मोकळा श्वास घेण्याची संधीच उरत नाही. सुटीचा दिवस आठवड्याचा शीण घालविण्यासाठी आणि इतर कामांमध्ये जातो. पुन्हा पुढच्या रविवारची वाट पाहत आठवडा ढकलायचा किंवा दोन रविवारांच्या मधल्या काळात काम करायचे अशा अवस्थेपर्यंत आयुष्याला गती आली आहे. त्यामुळे भेटण्यासाठी, बोलण्यासाठी पुन्हा मोबाइलसारख्या आभासी साधनांचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, एसएमएस आणि फोन याच भेटींच्या जागा आहेत. आज मी खूप आनंदी आहे पासून आज साहेबांनी मला फार झापलं इथपर्यंत सोशल मीडियावर वाचायला मिळते. परदेशातल्या आते-मामे-चुलत भावंडांच्या घरातील कोपरान्कोपरा फोटोत दिसतो. (पण सगळं आभासीच, खऱ्याखुऱ्या भेटी होत नाहीत. भेट झालीच तर थोड्या वेळानं काय बोलायचं अशी स्थिती होते.) सोशल मीडियासारखे कट्टेच आज माहितीचे आदानप्रदान करण्याची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत.(ओंकार लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)