शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

वन वे तिकीट : काबिल बनण्याची कोशिश, घरदार सोडून मोठ्या शहरात स्वप्नांच्या मागे धावणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 13:20 IST

वडिलांचा औजारं बनवण्याचा व्यवसाय. पण त्यांनी मला इंजिनिअरिंग करायला शहरात पाठवलं. आयटीत प्रवेश मिळाला; पण मी ठरवलं मेकॅनिकलच करायचं..

-भूषण राजेंद्र सूर्यवंशीसायगाव (बगळी). गिरणा व मन्याड नद्यांच्या काठावर वसलेलं हे गाव. उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठी दत्ताची यात्रा भरणारं आणि पहिलवानांचं गाव. आता तर ‘महाराष्ट्र केसरीचं गाव’ म्हणून राज्यात माझ्या गावाची ओळख आहे. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे गावातच झालं. आम्ही दोन भावंडं आणि एक लहान बहीण. माझे वडील शेती औजारं बनवतात. पंचक्रोशीत त्यांची राजू बाबा म्हणून ओळख आहे. मी घरात मोठा, अभ्यासात हुशार. त्याला शिक्षणासाठी माझ्याकडे पाठवा असं माझ्या मामांनी सुचवलं. वडिलांचं स्वप्न होतं की, मुलाला इंजिनिअरिंगला पाठवावं आणि त्यांनी मला नाशिक ब्रह्मा व्हॅलीला प्रवेश घेऊन दिला. २००९ मध्ये पहिल्यांदा घर सोडलं. राहायची सोय मामांकडेच झाली. आता आपण घर सोडून नवीन शहरात आलो हे जाणवलं. घरच्यांच्या आठवणीनं जीव व्याकूळ व्हायचा; पण मी स्वत:ला सावरायचो. इंजिनिअरिंगच्या दुसºया वर्षाला मी थ्री इडियट्स चित्रपट बघितला. आणि तो पाहून मी ब्रँच बदलायचा निर्णय घेतला. आयटीमधून मेकॅनिकला बदली करून घेतलं. आमचा व्यवसाय वेल्डिंग वर्कशॉपचा असल्यानं मेकॅनिकलची आवड होती. पण आयटी मिळालं म्हणून घेतलं होतं. पण थ्री इडियट्स सिनेमा पाहून मला एक शिकायला मिळालं की, आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे, तेच करावं. ‘कामयाब नही काबिल बनो’.जे ठरवलं ते केलं. मी मेकॅनिकल इंजिनिअर झालो. आणि थोडे दिवस क्वालिटी इंजिनिअर म्हणून कंपनीत जॉब केला; पण तेथेही मन लागेना. एक दिवस जॉब सोडला आणि मनाशी खूणगाठ बांधली की, आता नोकरी करू तर सरकारी, नाहीतर आपला शेती अवजारांचा बिझनेस वाढवू.नाशिकमध्ये बरेच मित्र मिळाले व नवजीवन गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्ञानाबरोबर जीवनमान व मामासोबत राहून दुनियादारी समजली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कमी वयात समाजकारणाची आवड निर्माण झाली. माझे मामा करत त्या कामात मी सहभागी होत होतो. समाज पाहत होतो. मामाच्या मार्गदर्शनाने व मित्रपरिवाराच्या सहकार्याने गावात गुरुकुल इंग्लिश स्कूल सुरू केलं. संस्थेला आईवडिलांचं नाव दिलं. गावात विविध उपक्रम सुरू केले. ग्रामीण भागात डिजिटल पद्धतीनं मुलांना शिक्षण देणं हा आनंद काही वेगळाच मिळाला.मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्या कौशल्याचाही उपयोग करतोय. छोटे ट्रॅक्टर बनवायचा प्रयत्न करतो आहे. २०१६ ला भंगारमधून एम-८० गाडी घेतली आणि तिची चारचाकी गाडी बनवली, इंग्रज काळातील मॉडेल सारखी. पूर्ण गाव जमायचा गाडी बघायला. काहीतरी नवीन दिसायचं म्हणून खूपच मजा यायची. असेच काही उपक्रम डोक्यात आहे. एक नक्की, बाहेरगावी गेलो, नवीन जग दिसलं. शिक्षणामुळे नवीन संकल्पना सुचवायला लागल्या. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता प्रशासनात जाऊन काम करायचं आहे. म्हणून राज्य सेवा परीक्षेची तयारी पण करतोय.काबिल बनण्याचा प्रयत्न सुरूच आहे..