शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

स्थलांतराचं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:32 AM

स्थलांतरानं मला काय दिलं? ऊर्जा दिली, दृष्टिकोन दिला आणि एक अभ्यासून नजरही दिली.

- डॉ. मारोती तेगमपुरे

स्थलांतर मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतं. स्थलांतरामुळे स्थलात्मकच नव्हे तर सर्वांगीण पातळींवर बदल संभवतात. भाषा, संस्कृती, खानपान, या सर्वच बाबतीत महत्त्वपूर्ण स्वरूपाचे बदल घडून येतात हे सारं आपण वाचतो. पण मी हे सारं स्वत: जगलोय.माझे प्राथमिक शिक्षण गावापासून तीन किलोमीटर (उच्छा (बु), ता. मुखेड, जि. नांदेड ) अंतरावर असलेल्या बेटमोगरा जिल्हा परिषद शाळेत झालं. आठवीसाठी नांदेड येथील खालसा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गावापासून ८० किलोमीटर असलेले हे अंतर १९८९-९० साली फार मोठं वाटायचं. एकदा नांदेडला आलं की गावाकडे संपर्क होत नसे. त्यावेळी आत्ताच्यासारखी संपर्काची प्रभावी माध्यमं नव्हती, आमच्या गावात साधं पोस्ट आॅफिस नव्हतं. आजही नाही. अर्थात घरी पत्र तरी कुणाला वाचता येत होतं? मोठे बंधू शिकलेले; परंतु तेही रोजगाराच्या शोधात बाहेरच होते. अशा परिस्थितीत शहरातील मगणपुरा (नवीन मोंढा) परिसरात असलेल्या डेस्टिट्यूट चिल्ड्रन होममध्ये मी आणि माझा लहान भाऊ ओमनाथ राहू लागलो. तो त्यावेळी साधारणत: इयत्ता दुसरी-तिसरीत असेल. खऱ्या अर्थानं गावापासून माय बाबा यांच्यापासून दूर जाण्याचा हा पहिलाच प्रसंग. याठिकाणी जे जेवण दिलं जाई, त्यास जेवण कसं म्हणावं; पण त्यावेळी त्याच अन्नानं जगवलं. याकाळात अनेक बरेवाईट अनुभव आले, जिवाभावाचे मित्र मिळाले, त्यातील नीलकंठ यमूनवाड यास कधीच विसरू शकत नाही. त्याकाळात कळलं माणसं महत्त्वाची, जातधर्म हे काही खरं नाही.महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी उस्मानाबाद गाठलं, मोठे बंधू संभाजी ग्रामसेवक म्हणून तिथं रुजू झाले होते. पुढील शिक्षणासाठी मला त्यांनी तिथं बोलावून घेतलं. हे दुसरं स्थलांतर.उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयात मी बी.ए.साठी या काळात महाविद्यालयात डॉ. काझीसर भेटले. त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करणाºया प्रेमळ मार्गदर्शनाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आरपार बदलून गेला. डॉ. कल्याण गडकर, डॉ. डी.बी. मोरे यांचं अर्थशास्त्रीय विवेचन आजही प्राध्यापक म्हणून वावरत असतानाही अनेकदा मदतीला धावून येतं. या गुरु जनांनी सुचवलं. एम.ए.साठी विद्यापीठातच जा. त्यांनी मला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पाठवलं. स्वत: हिंदी विषयाचे प्राध्यापक असूनही मी एम.ए. अर्थशास्त्र करावं म्हणून डॉ. काझीसर विद्यापीठात नाव नोंदणी करण्यासाठी सोबत आले. विद्यापीठात डॉ. बी.बी. कवडे, डॉ. आर. एस. सोळुंके, डॉ. बी.एस. म्हस्के, डॉ. वंदना सोनालकर, डॉ. र. पु. कुरुलकर, यांच्यासारखे शिक्षक मला लाभले. नंतरच्या काळात तर डॉ. बी. एस. म्हस्केसरांकडे मला पीएच.डी. करण्याची संधी प्राप्त झाली, याकाळात मला जे शिकायला मिळाले ते आयुष्यभर पुरेल इतकं आहे.याचकाळात एसएफआयसारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणाºया व भगतसिंगांना आदर्श मानून काम करणाºया विद्यार्थी संघटनेत/चळवळीत मी कधी ओढला गेलो ते समजलेच नाही. संघटनेत कार्यकर्ता म्हणून/ पदाधिकारी म्हणून वावरताना अनेक चांगल्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं; पण याच काळात आपण जेथे चुकत आहोत तेथे स्पष्टपणे सांगणारे, आपल्याला दुरुस्त करणारे मित्रही भेटले. म्हणतात ना ज्ञान तीनच माध्यमातून प्राप्त होते, वाचन, चिंतन/अनुभव आणि प्रवास. पीएच.डी. करून मी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून रु जू झालो.आज वाटतं शिक्षणासाठी अनेकवेळा स्थलांतर करावं लागलं त्या स्थलांतरानं कठीण परिस्थितीत उभे राहण्याची ऊर्जा दिली. ती ऊर्जा घेऊनच मी वाटचाल करतो आहे.अर्थशास्त्र विभागप्रमुख,गोदावरी कला महाविद्यालय, अंबड, जि. जालना