शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

एक मुलगी सायकलवर एकटी भारतभ्रमणाला निघते तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 05:10 IST

तू मुलगी आहेस, एकटी जाऊ नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस, तुला कसं जमेल, एकटीनं कशी सायकलवर फिरशील या सार्‍या वाक्यांनाच आव्हान द्यायचं तिनं ठरवलं.

ठळक मुद्देपुण्याची शाश्वती भोसले एकटीनं निघाली आहे, भारत पहायचा म्हणून वर्षभर ती सायकलवर फिरणार आहे!

- राहुल गायकवाड

एक दिवस तिच्या मनात विचार आला सायकल काढू आणि थेट भारतच फिरून येऊ. कधीतरी कुठेतरी बसून मनात आलेला हा विचार तिनं सत्यात उतरवायचं ठरवलं आणि ती थेट निघाली भारताच्या सफरीवर..एकटी. सायकलवर. अनप्लॅण्ड ट्रिपवर.पुण्याची शाश्वती भोसले.महिला सक्षमीकरणाचा संदेश देत शाश्वती सायकलवर निघाली आहे. तू मुलगी आहेस, रात्नी घरी यायला उशीर करू नकोस, एकटी जाऊ नकोस, असं करू नकोस, तसं करू नकोस , तुला कसं जमेल, एकटीनं कशी सायकलवर फिरशील या सार्‍या वाक्यांनाच खरं तर शाश्वतीनं आव्हान दिलं आहे. ठरवलं तर आपण सर्वकाही करू शकतो हा विश्वास ठेवून या मुलीनं देशप्रवासासाठी सायकलला पायडल मारलं आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातील शाश्वती. तिच्या पालकांना कधी वाटलंही नव्हतं की आपली मुलगी एकेदिवशी सायकल घेऊन थेट भारतच फिरायला निघून जाईल, तिही एकटी. शाश्वतीने बीएस्सी केल्यांनंतर नोकरी करण्यास सुरु वात केली. काही वर्षे तिने नोकरी केली; परंतु नोकरीमध्ये तिचं मन काही रमत नव्हतं. आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे असं तिला नेहमी वाटायचं. एकेदिवशी तिच्या मनात विचार आला की, का नाही आपण सायकलवर भारतच फिरायला जावं. बघायला तसा विचार धाडसी होता; परंतु तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. शाश्वती महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीस होती. एकेदिवशी तिने थेट नोकरीचा राजीनामा देत घर गाठलं. घरच्यांना मुलगी घरी परत आल्याचा आनंद झाला. शाश्वतीने घरी येताच घरच्यांना तिचा प्लॅन सांगितला. सुरुवातीला घरच्यांना तिची काळजी वाटली. परंतु त्यांनीही नंतर तिच्या धाडसाचे कौतुक केले.

6 मार्च 2019 ला शाश्वतीच्या भारतभ्रमंतीची सुरु वात झाली. खरं तर शाश्वती ही सायकलपटू नाही. तिला स्पोर्ट्सची आवड आहे असंही काही नव्हतं. तिनं पुण्यातनं सायकल खरेदी केली आणि थेट नॉर्थ ईस्ट गाठलं. सोबत टेन्ट, इतर सामान असं सगळं सोबत घेतलं. कुठे जायचं कसं जायचं काहीही ठरवलं नाही. फक्त भारत पालथा घालायचा एवढाच चंग तिने मनाशी बांधलाय. दिवसाला साधारण 140 किलोमीटरचा प्रवास शाश्वती करते. रस्त्यात येणार्‍या गावांना, शाळांना ती भेट देतीये. कधी पोलिसांच्या मदतीने तर कधी सीआरपीएफचे जवान यांच्याकडून माहिती घेऊन ती आपल्या मुक्कामाचं ठिकाण शोधते. नाहीच कुठे सोय झाली तर टेन्ट आहेच. परंतु अजूनतरी शाश्वतीला राहण्याची कुठलीही अडचण आलेली नाही. जेव्हा ती तेथील स्थानिक लोकांना सांगते की महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी ती एकटी भारतभ्रमंतीवर निघाली आहे. तेव्हा लोक तिचं आनंदाने स्वागत करतात. त्यांना तिच्या धाडसाचं कौतुक वाटतं. ईशान्य भारतात नोकरीच्या तसेच शिक्षणाच्या फारशा संधी नाहीत. मात्र निसर्गसौंदर्य अफाट. या ठिकाणचं पर्यटन वाढवून येथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यालया हव्यात असं तिला वाटतं. तिथल्या खमक्या, नेकीनं उद्योग व्यवसाय करणार्‍या स्रिया खूप आवडल्याचं शाश्वती सांगते.डिसेंबर्पयत संपूर्ण प्रवास तिला पूर्ण करायचायं. या सगळ्या प्रवासातून, आलेल्या अनुभवातून तिला पुढचं आयुष्य जगायचं आहे. सध्यातरी ती फिरतीये, भारत पाहतीये, लोकांना समजून घेतीये. या सगळ्या प्रवासातून एक माणूस म्हणून ती अधिकच समृद्ध होतीये. पुण्यात ती तिच्या प्रवासाचा शेवट करणार आहे. परत आल्यानंतर सामाजिक कार्यामध्येच पुढील आयुष्य घालवण्याचा शाश्वतीचा विचार आहे.

***शाश्वतीने आत्तार्पयत आसाम, मिझोराम, नागालॅँड या भागांना भेटी दिल्या आहेत. या ठिकाणांचा तिचा अनुभव विलक्षण आहे. या ठिकाणचं निसर्गसौंदर्य, शांतता मनमोहून टाकणारं आहे, असं ती सांगते. पाठीला तान्हुलं बाळ घेऊन काम करणार्‍या या महिलांना पाहून त्यांच्या कष्टाचं तिला अप्रूप वाटतं. आत्तार्पयतच्या प्रवासात शाश्वतीला अनेक चांगले-वाईट अनुभव आले; परंतु प्रत्येक अनुभवामधून तिला काहीतरी शिकायला मिळालं आहे.