शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

BHNS चा दादामाणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:50 IST

दहावी-बारावीत त्याला अगदीच जेमतेम मार्क होते; पण आज तो वन्यजीव संशोधन क्षेत्रात मोठी भरीव कामगिरी करतो आहे. हे कसं साधलं?

-ओंकार करंबेळकर

उच्चशिक्षण, संशोधन, तज्ज्ञ असे शब्द ऐकले की हे सगळं कोण्या दुसर्‍या लोकांसाठी आहे, आपण अगदी साधे आहोत, आम्हाला कसं बरं एखाद्या विषयात संशोधन करायला मिळणार असं वाटतं. पण परीक्षेत मिळालेले मार्क्‍स, तुमची आर्थिक पार्श्वभूमी  यांचा तुमच्या भविष्यातील यशाचा काहीही संबंध नसतो, केवळ योग्य दिशेनं केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण वन्यजीव संशोधन क्षेत्र.  आणि ते कसं याची कहाणी वरददादा सांगतात. हा  आपला दादाच आहे. होय दादाच. वन्यजीव आणि पर्यावरण या क्षेत्रांतील संशोधनामध्ये वरद गिरी यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यामुळे केवळ वयामुळे नाही तर त्याच्या कामामुळेही तो एकदम दादामाणूस झाला आहे. या क्षेत्रात आज नव्यानं येणार्‍या मुला-मुलींसाठी मार्गदर्शन करणारा आणि संशोधनाच्या कामातून स्वतर्‍चा वेगळा ठसा निर्माण करणार्‍या माणसाची गोष्ट एकदम भन्नाट आहे.    बेळगाव जिल्ह्यातल्या अंकली नावाच्या गावापासून त्याचा सगळा प्रवास सुरू झाला. अगदी साध्या घरातल्या वरदचं शिक्षण अंकली, कर्‍हाड, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी झालं. शिवाजी विद्यापीठामध्ये प्राणिशास्रमध्ये  मध्ये एम.एस्सी. करेर्पयत त्याचं काय करिअर करायचं हे ठरलं नव्हतं. पण सुदैवानं त्याला हेमंत धमके, सचिन माळी आणि अनिल शिंगारे यांच्यासारखे प्राणिशास्रवर मनापासून प्रेम करणारे मित्र मिळाले. ते त्याचे मित्र मार्गदर्शक असे सगळेच काही होते. प्राणिशा हे विद्यापीठातील वर्गाबरोबर बाहेरही शिकायचं शास्त्र आहे हे या सगळ्या मुलांना मनापासून पटलेलं होतं. त्यामुळे विद्यापीठासह आजूबाजूच्या प्रदेशातील झाडांचं, प्राण्याचं निरीक्षण करण्याची सवय या सर्वाना लागली. मित्रांबरोबरच प्रत्येक निर्णयाच्या वेळेस मार्गदर्शन करायला, मदतीसाठी त्याला सत्यजित माने हे मार्गदर्शक भेटले. या सर्वाच्याबरोबर बिनभिंतीच्या शाळेत गेल्यावर वरदला आपण यामध्येच पुढचं करिअर करू शकतो हे लक्षात आलं. पक्षीनिरीक्षण आणि फुलपाखरांच्या अभ्यासापासून सुरू झालेली त्याची आवड एम.एस्सीनंतर सापांच्या अभ्यासार्पयत सुरू झाली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)मध्ये काम सुरू केल्यानंतर त्यानं साप आणि सरपटणार्‍या प्राण्यांचा अभ्यास सुरू केला. बीएनएचएसमध्ये विविध प्रजातींची झालेली ओळख, ग्रंथालयात झालेले वाचन, विविध क्षेत्रांतील लोकांच्या झालेल्या भेटी यामुळे सरपटणार्‍या प्राण्यांच्या जगातील भरपूर माहिती त्याला मिळाली. बीएनएचएसमध्ये अशोक कॅप्टन यांनी त्याला टॅक्सोनॉमी कशी करायची शिकवली. विठोबा हेगडे यांनी बेडूक कसे पकडायचे आणि ओळखायचे हे शिकवलं तर समीर किहिमकर यांनी पाली, सरडे कसे ओळखायचे हे शिकवलं. असं त्याचं हळूहळू शिक्षण होत गेलं. वरद स्वतर्‍ला आजही विद्यार्थीच म्हणवतो. आजही त्याची कोणतीही माहिती आपल्यापेक्षा लहान-मोठय़ा कोणत्याही वयाच्या व्यक्तीकडून शिकण्याची त्याची तयारी असते आणि तो तसे शिकतोही. हे सगळं शिक्षण, संशोधन सुरू असताना त्याच्यामागे त्याचे आई-वडील ठाम उभे होते. वरद म्हणतो, माझे आई-बाबा एकदम साधे होते, त्यांना मी नक्की काय संशोधन करतो याची कल्पनाही नसावी. पण वेळोवेळी त्यांनी मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये याची जाणीव करून द्यायचे, परिस्थिती नसतानाही आर्थिक मदत करायचे. वर्तमानपत्रात, मासिकांमध्ये लेख, मुलाखती, फोटो प्रसिद्ध झाल्यावर आपला मुलगा काहीतरी चांगलं करत आहे हे त्यांना समजलं. पण आज जे संशोधन करता आलं, अभ्यास करता आला, आदर मिळतो तो केवळ त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच.  वरदनं काम सुरू केलं तेव्हा त्याला वाटायचं आपण एखाद्या तरी प्रजातीच्या शोधामध्ये योगदान दिलं पाहिजे. पण आज वरदनं 40 प्रजातींच्या शोधांमध्ये सहभाग घेतला आहे, अनेक नव्या संशोधकांना मदत करून त्यांना या जगताची ओळख करून दिली आहे. त्याचे नाव 3 प्रजातींना देण्यात आलं आहे. 

डेंड्रेलाफिस गिरी, सनेनास्पीस गिरी, सीटरेडाक्टीलस वरदगिरी अशा या तीन सरपटणार्‍या प्राण्यांच्या जाती आहेत. वरद म्हणतो, मला दहावीत 48 टक्के गुण मिळाले होते, बारावीत 53 टक्के गुण मिळाले होते, शिक्षणाच्या प्रत्येक प्रवेशाच्या वेळेस माझा नंबर अगदी शेवटचा किंवा शेवटच्या मुलांमध्ये असायचा. आपण आयुष्यात काहीतरी मोठं करू शकू, असं तेव्हा स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण शिक्षकांच्या आणि या क्षेत्रातल्या मित्रांचं अगदी आधीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळे हे साध्य झालं. भारत हा जैवविविधतेने संपन्न असा देश आहे. त्यामुळे येथे संशोधनासाठी भरपूर वाव आहे, या क्षेत्रात तरुण मुलं मोठय़ा संख्येने येतही आहेत. नव्यानं या क्षेत्रात येणार्‍या मुलांना वरद सांगतो, वन्यजीव संशोधन क्षेत्रामध्ये सर्व काही संगणकाच्या क्लीकवर होत नाही. तुम्हाला घराबाहेर पडून संशोधन करावं लागेल, मेहनत करावी लागेल. इथे मेहनतीला पर्याय नाही. योग्य वेळ आणि कष्ट केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षार्पयत पोहचता येत नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत असाल मात्र तुमच्याकडे चिकाटी नसेल किंवा तुम्ही फारच अधीर असाल तर या क्षेत्रामध्ये फार काळ राहाता येत नाही. वैयक्तिक गौरवासाठी तुम्हाला या क्षेत्रात यायचे असेल तर तुम्ही परत विचार करायला हवा. सोशल मीडियावर एखाददोन प्रजाती ओळखता येणं म्हणजे तुम्ही या क्षेत्रातले तज्ज्ञ होणं नाही. सगळ्यांनी कामासाठी योग्य वेळ देणं, संशोधन करणं सध्या उपलब्ध असलेल्या ज्ञानात भर घालणं हा एकमेव योग्य मार्ग आहे असं तो स्पष्टपणे सांगतो. 

onkark2@gmail.com 

टॅग्स :environmentवातावरण