शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 07:00 IST

पुण्यात वाहतूक पोलिसांनी एक प्रयोग केला, एका कर्मचार्‍यानं नियम पाळून 11 किलोमीटर प्रवास केला, दुसर्‍यानं बेफाम, नियम तोडून..

ठळक मुद्देघाईनं गाडी चालवून काही मिनिटे जीव धोक्यात घालण्याइतकी व्यर्थ आहेत का हा विचार सर्वानीच करण्याची गरज आहे.

- नम्रता फडणीस 

आपल्याच  ‘तीर्थरूपां’चा रस्ता असल्यासारखं मन मानेल तशी भरधाव वेगात गाडी चालविणं हा जणू एक अभिमानाचाच विषय झाला आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांसाठी कितीही जाचक नियम करा, त्याची कितीही कडक अंमलबजावणी करा पण सामान्यांच्या मानसिकतेत मात्र मिनिटाचाही तसूभर फरक पडत नाही.-असा निराशाजनक अनुभव. मात्र या सार्‍यावर उत्तर शोधत, तेही कृतीतून आणि थेट देत पुणे वाहतूक पोलिसांनी एक नवीन प्रयोग केला. पुण्याच्या वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदाचा नुकताच कार्यभार हाती घेतलेल्या तेजस्वी सातपुते यांनी एक अभिनव शक्कल लढविली. वाहतुकीचे नियम पाळूनही आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यास (कितीही घाई असली तरीही) साधारण निर्धारितच वेळ लागतो, फारतर किरकोळ काही मिनिटांचा फरक पडतो हे त्यांनी प्रयोगानिशी सिद्ध करून दाखवलं.      वाहतूक शाखेच्या चार कर्मचार्‍यांच्या मदतीनं त्यांनी हा प्रयोग  कात्रज चौक, भाजी मंडई ते शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस चौकार्पयत केला. कात्रज ते सिमला ऑफिस चौक हे अंतर 10 किलोमीटर व 100 मीटरचं आह़े या अंतरात तब्बल 11 सिग्नल आहेत़ साध्या वेशातील कर्मचारी सकाळी 10़30 वाजता कात्रज येथून निघाले. त्यापैकी एका कर्मचार्‍यानं नियम पालन करायचं ठरवलं. दुचाकी चालवताना हॉर्न  न वाजवणं, सिग्नल न तोडणं या नियमाचं तंतोतंत पालन केलं. तर दुसर्‍या दुचाकीवरील कर्मचार्‍यानं वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले नाहीत. दोघंही निर्धारित स्थळी पोहचले. नियम न पाळणारा कर्मचारी आधी पोहचला तर नियम पाळणारा नंतर? पण पहिला कर्मचारी नियम पाळणार्‍या कर्मचार्‍यापेक्षा किती आधी पोहचला? फक्त 4 मिनिटं!नियम न पाळणार्‍या कर्मचार्‍याला हे अंतर पार करण्यासाठी 24 मिनिटं लागली  तर सर्व नियम पाळणार्‍या कर्मचार्‍याला 28 मिनिटं लागली.  याचा अर्थ दोन्ही वाहनचालकांमध्ये फरक होता तो केवळ 4 मिनिटांचा . त्यामुळे नियम तोडून कशाही पद्धतीने वाहन चालवलं तरी केवळ चार ते पाचच मिनिटं फार तर आधी पोहचता येतं, पण वाहतूक शिस्त बिघडते. रॅश ड्रायव्हिंग करत जिवाला धोका वाढतो. या उलट नियम पाळल्यास सुरक्षित आणि वेळेतही निश्चित स्थळी पोहोचू शकतो, याचा जणू एक धडाच मिळाला. 

एक प्रयोग,तेच ट्रॅफिकचं उत्तर!

तेजस्वी सातपुते सीआयडीमध्ये (टेक्निकल)  एसपी आणि ग्रामीण विभागात अ‍ॅडिशनल एसपी म्हणून पुण्यात दोन वर्षापासून कार्यरत आहे. नुकताच वाहतूक चार्ज हाती घेतला आहे. त्यांनाही पुण्याच्या वाहतुकीची स्टोरी माहीत होती.  त्या सांगतात,  प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार दरवर्षी अडीच लाख वाहनं पुण्यात वाढत आहेत. अडीच लाख ही खूप मोठी संख्या आहे. म्हणजे मी दोन वर्षापूर्वी आले तेव्हाची आणि आताची स्थिती यात खूप फरक आहे. तेव्हा आजच्या इतकं ट्रॅफिक जॅम होत नव्हतं; पण दोन वर्षात पाच लाख वाहनं वाढल्यावर दोन वर्षानी परिस्थिती प्रचंड भयानक होण्याची अधिक भीती वाटते. पावसाळ्यात मी चार्ज घेतला होता. तेव्हा खड्डे, त्यामध्ये भरलेलं पाणी त्यामुळे ट्रॅफिक खूप स्लो व्हायची.  जिथं पाणी साठतं तिथं लोकांना अंदाज येत नाही. याव्यतिरिक्त नो पार्किग झोनमध्ये वाहने उभी असली की आणखीनच अडचण. रस्ता रुंद असला आणि एखादी गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क झाली असेल तर त्याठिकाणच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी व्हायला वेळ लागत नाही. या व्यतिरिक्त छोटय़ा गाडय़ा दिसेल त्या मार्गाने गाडय़ा काढतात, लोक आडवे तिडवे घुसतात. यासाठी जर थोडक्यात सांगायचे झाले तर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेशन आणि वाहनचालकांत शिस्तीचा अभाव, या गोष्टी कारणीभूत आहेत. या दोन्हींमध्ये जर तोडगा काढायचा असेल तर शिस्त लावण्यासाठी आपण तातडीने प्रयत्न करू शकतो. म्हणून मी हा प्रयोग करून पाहिला.    आज तरुणाईची मुळातच  वाहनचालकांमध्येच संख्या जास्त आहे. 100 माणसांपैकी 60 तरुण असतील तर नियम तोडणार्‍यांत तेच जास्त असणार.  त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक गाडी चालवावी. नियम पाळावेत. ट्रॅफिकची शिस्त पाळावी ही अपेक्षा आहेच. त्यांच्यासमोर मी हे उदाहरण ठेवलंय की, घाईनं गाडी चालवून काही मिनिटे जीव धोक्यात घालण्याइतकी व्यर्थ आहेत का हा विचार सर्वानीच करण्याची गरज आहे. हा गैरसमज आहे की नियम तोडले तर लवकर पोहोचू. तो गैरसमज या प्रयोगातून दूर झाला असेल अशी अपेक्षा. सगळ्यांनी नियम पाळले तर सर्वाचाच वेळ आणि वेग वाढेल. कुणीतरी आडवा घुसतो, कुणीतरी चुकीचे पार्किग करतो आणि बाकीच्यांना उशीर होतो. त्यामुळे याबाबत प्रबोधन होणं गरजेचं आहे. यापुढील काळातही जसं सुचतील तसे प्रयोग करत राहणार आहे.  हा प्रयोग इतक्या लोकांर्पयत पोहोचेल याची अपेक्षा नव्हती. मी जर म्हणलं असतं की टेक्सासमध्ये हा प्रयोग केला तर लोकांना ते अपील झालं नसतं. त्यामुळे पुणेकरांना ते पटावे यासाठी हा प्रयोग मुद्दाम पुण्यात केला.