शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

यशाची उडी

By admin | Updated: September 22, 2016 18:24 IST

पोलिओनं त्याला गाठलं म्हणून तो रडत बसला नाही. त्यानं जे ठरवलं ते यश गाठलंच. तो म्हणतो, ‘बिना गोल के लाइफ भी कोई लाइफ है?’

-  राकेश जोशी
 
पोलिओनं त्याला गाठलं 
म्हणून तो रडत बसला नाही.
त्यानं जे ठरवलं ते यश गाठलंच.
 तो म्हणतो, 
‘बिना गोल के लाइफ भी 
कोई लाइफ है?’
 
वरुण भाटी. 
उत्तर प्रदेशातल्या नोएडातल्या जमलपूर गावचा हा २१ वर्षांचा मुलगा. त्याचे वडील गावचे सरपंच. शाळेत असल्यापासून त्याला खेळाची आवड. मात्र पोलिओनं घात केला आणि अपंगत्व आलं. बास्केटबॉल तो उत्तम खेळायचा. मग त्याला कळलं की बास्केटबॉलपेक्षाही आपल्याला उंच उडीत जास्त यश मिळू शकतं. म्हणून मग शिक्षणात ब्रेक घेऊन त्यानं गेली दोन वर्षे फक्त खेळावर आणि उंच उडीच्या प्रशिक्षणावर भर दिला. आशियाई स्पर्धेत त्यानं उंच उडीत एक आशिया स्तरावरचा विक्रमही प्रस्थापित केला.
आणि मग स्वप्न होतं ते ऑलिम्पिकचं. तो सांगतो, ‘मला सर्वार्थानं उंच उडी घ्यायची होती. म्हणून मग मेहनत करू लागलो. एकच लक्ष्य होतं ऑलिम्पिक. ते डोळ्यासमोर दिसत होतं. आणि मला काहीही झालं तरी जिंकायचंच होतं.
त्याची जिंकण्याची जिद्द इतकी अफाट होती की, यंदा तो ऑलिम्पिक मेडल आणणारच अशी सगळ्यांना खात्रीच होती.
ती खात्रीही त्यानं खरी ठरवली. सुवर्णपदक ना सही कांस्य तरी त्यानं पटकावलंच. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला उत्तर प्रदेश सरकारनं एक करोड रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. तो एकाएकी श्रीमंत झाला हे खरंय, पण त्यापलीकडच्या एका श्रीमंतीची गोष्ट तो सांगतो.
‘जिंदगी का कोई लक्ष्य तो होना चाहिए, और उस लक्ष्य पर फोकस भी करना जरुरी है, बिना लक्ष्य के जिंदगी कोई जिंदगी ही नहीं होती.!’
ऑलिम्पिकच्या अनुभवानं तो म्हणतो, ‘मी एकच गोष्ट शिकलो, आयुष्य खूप मोठं आणि खूप आव्हानात्मकही आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत का राहायचं? आणि आपण रडलो म्हणून जग थांबत नाही. पण जिंकलोच तर आपल्यासाठी जग काही क्षण तरी थांबून जल्लोष करतंच.!
वरुणची ही उंच उडी म्हणूनच यशाला हात लावणारी ठरली आहे.