शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

हरवलेल्या तालसुरांच्या शोधात पाकिस्तानी तरुणाचा प्रवास : बागी फनकार!

By meghana.dhoke | Published: May 09, 2019 3:25 PM

जवाद शरीफ. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. सिंधू नदीच्या खोर्‍यात एकेकाळी समृद्ध असलेलं संगीत, वाद्यं आणि कलाकार यांच्या शोधात तो फिरलाय. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय.

ठळक मुद्दे पाकिस्तानातही काही ‘सुलझे हुए’ लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करताहेत; पण बाकी मात्र त्याच्या वाटय़ालाही भरपूर टीका, नालस्ती आली. 

- मेघना ढोके

कुछ ना कुछ तो करना ही था, तो बगावत कर दी.- तो दिलखुलास हसून म्हणाला; पण त्या म्हणण्यात एक असहाय हतबलता जाणवते. विषण्ण. उदास स्वर.विचारलंच त्याला, ‘फिर क्यूं किया यह मॅडनेस? आया कहॉँसे ये पागलपन?’तसा तो पटकन म्हणाला, ‘कोई कुछ भी कहें, गाली दे, इसका मतलब यें नहीं की हम रुक जाए.’थांबलं - नाकारलं आणि झापडं बांधून बसलं की काय होतं समाजाचं, माणसांचं आणि कलेचंही त्याचीच तर गोष्ट तो सांगतोय. आजच्या घडीला त्याची ही गोष्ट दुनियेनं डोक्यावर घेतली आहे; पण त्याच्या देशात मात्र त्याच्या त्या गोष्टीवरही ‘हराम’ लेबल चिकटलं आहे.जवाद शरीफ त्याच नावं. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगातल्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय. पाकिस्तानातही काही ‘सुलझे हुए’ लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करताहेत; पण बाकी मात्र त्याच्या वाटय़ालाही भरपूर टीका, नालस्ती आली. असं काय आहे त्याच्या फिल्ममध्ये?खरं तर काहीही ‘स्फोटक’ किंवा विशेष खास नाही.एक दिवस हा तरुण मुलगा उठला, त्यानं काही आपल्यासारखेच पागल जमवले आणि कॅमेरा घेऊन सिंधू नदीच्या खोर्‍यात फिरला. उभाआडवा फिरला. त्या एकेकाळच्या समृद्ध खोर्‍यात कोणे एकेकाळी सूरसाज झंकारले. लोकगीतांपासून ते गीत-संगीत ते थेट वाद्यवादनार्पयत माणसं तालात जगली. आज ते ताल-सूर हरवलेत, नुस्ते हरवलेच नाहीत तर संपण्याच्या वाटेवर आहेत, आणि जे उरलेत ते धर्मानुसार निषिद्ध आहे असं ठरवून ते वाजवणार्‍या साजिंद्याना भ्रष्ट ठरवणं सुरू झालं आहे. मात्र तरीही या मुलानं ठरवलं की, जे फनकार उरलेत त्यांना तर भेटू.कॅमेर्‍यासह त्यानं सिंधू नदीचं खोरं, ते अरबी समुद्राचा किनारा ते कराकोरम पर्वत रांगा पिंजून काढल्या आणि पाकिस्तानातल्या काही अनवट सुरील्या हरवल्या जागाही शोधल्या. तिथं भेटलेली मौसिकी, फनकार आणि त्यांचं आजचं जगणं, धर्माध माणसांनी जगण्यातून पुसून टाकलेले सूर हे सारं तो या आपल्या फिल्ममधून मांडत राहतो. त्या फिल्मचा यू टय़ूबवर उपलब्ध ट्रेलर पाहिला तरी कळतं की, हजारो वर्षाची संस्कृती, सांझी लोकसंस्कृती आणि लोकजीवन नाकारलं की माणसांचं काय होतं, जे कधीकाळी  समृद्ध होतं त्याला कसा चूड लागतो.

त्याच आगीत जगणार्‍या काही फनकारांना जवाद या फिल्ममधून भेटवतो. 9 वाद्यं, 11 संगीतकार यांची ही भेट. मात्र ते शुट करणंही सोपं नव्हतं. त्या फनकारांच्या गरीब फाटक्या घरांत तर सहज शूटिंग झालं; पण बाहेर शूटिंग होतंय, गाना-बजाना सुरू आहे असं कळताच अनेकदा कुठून कुठून तरुण जमा होत. हे बंद करा, म्हणून दादागिरी करत. त्यांचं एकच म्हणणं की, ‘ये बंद कर दो, ये हमारी सकाफत (संस्कृती) नहीं है!’ जवादला विचारलं की, का असं म्हणतात लोक? का नाकारतात हे सारं संस्कृती म्हणून.?तो सांगतो, ‘पाकिस्तानातली मोठी शहरं कराची, लाहोर, इस्लामाबाद, फैसलाबाद सोडून जरा आत जा, गावखेडय़ांत संगीत, वादन, गायन हे सारं निषिद्धच ठरवलं गेलेलं आहे. त्यात स्वातंत्र्यानंतर आमच्या पिढय़ांत मेंदूत असं रुजवण्यात आलेलं आहे की, जे जे भारताशी संबंधित ते ते आपलं नाही. कधी काळी जे संस्कृतीचा भाग होतं, जे आपल्याच मातीत जन्मलं, वाढलं तेही आपलं नाही असं म्हणून अनेक गोष्टी आम्ही ‘नाकारल्या’! संस्कृती नाकारली, इतिहास नाकारला, लोकजीवनात घट्ट रुतलेल्या गोष्टी नाकारल्या, मालकीच सोडून दिली. उरलं काय, डोक्यात काहीतरी टोकाचं, भलतंच.जवाद म्हणतो, ‘हुआ ये की ना फनकार बचें, ना मौसिकी, ना इज्जत और ना ही कुछ लगाव !’

आणि हे सारं जवाद फक्त सांगत नाही, तर त्यानंही स्वत:  वाढताना, हे सारं अनुभवलेलं आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा. ही फिल्म बनवण्याचा त्याचा ट्रिगरही त्याच्या वाढीच्या दिवसांत त्याला आलेल्या अनुभवातला असावा. त्याच्या घरच्यांना वाटायचं मुलानं चारचौघांसारखं काम करावं. जवाद सांगतो , ‘घरवाले कहते थे बेटा कुछ अच्छा काम कर, कुछ और कर, कुछ ऐसा कर जिससे इज्जत मिले.’ आपला मुलगा कलेशी संबंधित काही करणार आहे हे घरच्यांनाच मान्य नव्हतं, तिथं समाजात विरोध झाला याचं जवादला काहीही वाटलं नाही. तो सांगतोच, ‘हमारे दिमाग में ही ये पुश कर देते है, की मौसिकी इज्जतवाला काम नहीं है! मैने सोचा चलो, ना सहीं कर लेते है!’सिंधू नदीच्या खोर्‍यात मग तो फिरला. हरवलेली मरणपंथाला लागलेली वाद्यं त्यानं शोधली. असे लोक भेटले की, ते वाद्यं वाजवणारी तर आता शेवटची एकेक माणसं उरली आहेत. (पिढी नव्हे !) त्यातलंच एक उदाहरण सारंगीचं. संपूर्ण पाकिस्तानात आता सारंगी वाजवणारे दोन-तीनच कलाकार उरलेत. एकेक लोकवाद्यं तर अशी की, ती बनवणारी माणसंच नाहीत, वाजवणारा कुणी एकेकटा, एकांडा फनकार भेटतो. तोही गुपचूप वाजवतो. कुणाला कळलं तर काय ही भीती असतेच.ही माणसं एकेक करून संपली की, संपलं सगळं असं जवाद म्हणतो.  सिंधू नदीच्या काठांवरून ते संपू नये अशी त्याची कळकळ आहे. त्या कळकळीपोटीच त्यानं ही फिल्म केली आणि आता तो जगभर आणि पाकिस्तानातही आपली फिल्म दाखवत फिरतो आहे..

(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com