शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उतरलेले इराणी तरुण म्हणतात, इनफ  इज  इनफ! आत आम्ही तयार आहोत मरायलाही, मारायलाही!

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 07:50 IST

भुकेकंगाल तारुण्य जेव्हा सत्तेच्या बंदुकांसमोर उभं राहून म्हणतं, करा जे करायचं ते, आम्ही मागे हटणार नाही!

ठळक मुद्देहाताला काम, पोटात अन्न नसलेले तरुण रस्त्यांवर मारायला-मरायला तयार उभे आहेत.

मेघना  ढोके / कलीम  अजीम 

2009ची ही गोष्ट आहे. त्या काळच्या इराणमधल्या ग्रीन मुव्हमेंटच्या वेळची. हा किस्सा इराणमध्ये फार फेमस आहे आणि इंटरनेटच्या जगात तो कायम फिरत असतो.एक इराणी कमांडर त्याच्या सैनिकांना अगदी जाहीरपणे सांगत असतो की, घाबरू नका, ही रस्त्यावर उतरलेली पोरं, शहरी आहेत. पोटं भरलेली आहेत त्यांची, त्यांना आपण सहज दडपून टाकू; पण याद राखा, उद्या जर भुकेकंगाल, मागास भागातले, गरीब पोरं आपल्यासमोर उभे राहिले आणि असा मोर्चा अनवाणीच घेऊन आले, तर आपली खैर नाही..इराणी कमांडरचे हे शब्द आज शब्दशर्‍ खरे झाले आहेत. त्याची भीतीही खरीच ठरली आहे, कारण तो दिवस उजाडलाच जेव्हा हातावर पोट असलेले आणि त्या पोटात भुकेची आग असलेले अगदी विशी-पंचविशीतले तरुण सत्तेसमोर उभे राहिले. ज्या देशात कुठलंही आंदोलन करायलाच बंदी आहे, त्या देशातलं तारुण्य सरकारच्या बंदुकांसमोर उभं ठाकलं आहे.मोनिका नावाचं एक ट्विटरवरचं इराणी हॅण्डल आहे, त्या हॅण्डलवरचं एक ट्विट इराणी तारुण्याची आजची मानसिकता सांगतं आहे. तरुणांच्या आक्रोशाची एक भयंकर क्लिप दाखवत हे हॅण्डल म्हणतं, ‘40 वर्षे झाली, आम्ही जे भोगलं ते भोगलं. इनफ इज इनफ. आता आम्ही तुमच्या शस्त्रास्त्रांना, बंदुकांना घाबरत नाही. आम्हाला आमचा हक्काचा इराण हवाय, करा तुम्हाला करायचं ते करा, आम्ही मागे हटणार नाही.’इराणमध्ये इंधन दरवाढ करण्यात आली. पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या म्हणून नोव्हेंबरमध्ये हे आंदोलन सुरू झालं. तरुण मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरले; पण हे आंदोलन फक्त इंधनवाढ झाली म्हणून झालं नाही, त्याच्या पोटात आधीपासूनचा असंतोष खदखद आहेच. इराणमध्ये पेट्रोल दरवाढ मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. सामान्य तरुण इराणीचं पोट या पेट्रोलच्या व्यवसायावर चालतं. तीच त्यांची जगण्यासाठीची आवश्यक गोष्ट आहे. मात्र तीच दरवाढ झाल्यानं असंतोषाचा भडका उडाला. आणि पोलीस, मिल्ट्री, पॅरामिल्ट्रीवाले रस्त्यांवर शस्त्रसज्ज असताना तरुण रस्त्यांवर आले. प्रत्येक शहरातल्या मोठय़ा शहरांत तरुणांनी आंदोलन सुरू केलं. इराणी सरकारने आंदोलकांवर गोळ्या झाडून दहशत निर्माण केली.  त्या चकमकीत 208 लोकांचा मृत्यू झाला आहे. सात हजार आंदोलकांना सरकारने अटक केली आहे. 

इराकमध्ये सुरू असलेल्या लोकशाही समर्थक आंदोलनाचे पडसाद इराणमध्ये उमटले. इंधन दरवाढ आंदोलनाचे निमित्त ठरलं. इराणी जनतेचा अनेक वर्षापासून साठलेला आक्रोश बाहेर पडला. तज्ज्ञांच्या मते 1978 साली झालेल्या इस्लामिक क्र ांतीनंतर प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात आंदोलन पेटलं आहे. इराणचे सर्वेसर्वा खोमेनी सांगत आहेत की, या सार्‍यात परकीय शक्तींचा हात आहे. मात्र तरीही त्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. दुसरीकडे गृहमंत्नी अब्दुलरेझा रेहमानी सांगतात की, 2 लाख लोकांनी सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांनी  700 बँका, 70 पेट्रोलपंप आणि 140 सरकारी कार्यालयांना आग लावली. तसं पाहता इराण हा जगातील सर्वात मोठा पेट्रोल उत्पादक देश मानला जातो. अन्य देशाच्या तुलनेत इथे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. पण त्याच्याच किमती वाढल्यानं, त्या व्यवसायावर ज्यांचं पोट आहे, ते तारुण्य भडकलं. मुळात हा सगळाच कष्टकरी वर्ग, त्यांच्या पोटापाण्याचाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा तो रस्त्यावर आला.  इराणच्या सुमारे 100 शहरांत सरकारविरोधात जनाआंदोलनं सुरू आहेत. एकतर इराण सरकारने पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या. पेट्रोलवरची सबसिडी पूर्णपणे बंद केली. शिवाय पेट्रोलच्या अतिरिक्त वापरावर र्निबध घातले. पेट्रोलची वितरण व्यवस्था रेशनिंगद्वारे सुरू केली. आता नागरिकांना महिन्याला केवळ 60 लिटर पेट्रोल खरेदी करता येणार आहे. यापेक्षा जास्त हवं असेल तर त्यासाठी लिटरला दुप्पट रक्कम मोजावी लागेल.त्यातून हे आंदोलन भडकलं. आंदोलनाची दाहकता ओळखून सरकारने इंटरनेट बंद केलं. नेट बंद असल्याने एकाही विद्याथ्र्याला परीक्षा अर्ज भरता आले नाहीत. परिणामी शाळा, कॉलेज, विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. देशभरात इंटरनेट शटडाउन अजूनही आहे. इराणी सरकार म्हणतंय की, काही गुंड मुलं हे सारं करत आहेत. हे आंदोलन मूठभर गुंडांचं आहे असं दाखवण्यासाठी शाळा-कॉलेज बंद करून बाकीच्या मुलांना  घरात डांबलं जात आहे. जगाशी संपर्क तोडण्यात आलाय. मात्र त्यातून तरुणांची नाराजी इतकी वाढली की, त्यांनी हातात शस्त्न घेतलं. जाळपोळ व नासधूस सुरू केली.  गेल्या वर्षी मे महिन्यापासून अमेरिकेने इराणवर अनेक आर्थिक र्निबध लादले आहेत. परिणामी देशातील अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. मूलभूत वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. आयात बंद झाल्याने देशात गरजेच्या वस्तू बाजारातून हळूहळू गायब होत आहेत. आणि हाताला काम, पोटात अन्न नसलेले तरुण रस्त्यांवर मारायला-मरायला तयार उभे आहेत.