शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हिस्ट्री-पॉलिटिक्सचा उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 07:05 IST

शिक्षणातून मिळणारे ज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनात, नोकरी-व्यवसायात वापरण्याजोगे असावे हे खरे; पण त्यापलीकडील ज्ञान, ज्याचा प्रत्यक्ष वापर आपल्याला दिसून येत नाही, त्याचे काहीच महत्त्व नाही का? ते महत्त्व नाकारल्याने समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास याकडे दुर्लक्ष होते आणि वर्तमानात काय चाललेय हेच अनेकांना कळत नाही.

ठळक मुद्देसंवादाअभावी लोकशाही मरते. ही प्रक्रि या समजून घेण्यासाठी सामाजिकशास्त्नांची समज असावी लागते

- सई पवार

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जोक वाचला.– ‘प्रिय शाळा, आज अजून एक दिवस गेला आणि मी पायथागोरसचा सिद्धांत वापरला नाही.’ असे अनेक जोक्स अधूनमधून व्हायरल झालेले दिसतात. शाळेत जीवनोपयोगी कौशल्ये शिकवण्याऐवजी नुसते पुस्तकी ज्ञान शिकवले जाते अशा आशयाचे हे जोक्स. त्यामध्ये तथ्य आहेच; परंतु ज्ञानाची उपयुक्तता या विषयाबद्दलचे काही चिंताजनक अर्थही त्यात सामावलेले आहेत. शिक्षणातून मिळणारे ज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनात, नोकरी-व्यवसायात वापरण्याजोगे असावे हे खरे; पण त्यापलीकडील ज्ञान, ज्याचा प्रत्यक्ष वापर आपल्याला दिसून येत नाही, त्याचे काहीच महत्त्व नाही का? आपल्याकडे सायन्स आणि इंजिनिअरिंगकडे जाण्याचा मुलांचा जो ओघ आहे, कलाशाखेकडे काहीतरी परके म्हणून बघण्याची जी दृष्टी आहे ती या ज्ञानाच्या उपयुक्ततेच्या धारणेतून तयार होते. शिक्षण हे नोकरी मिळण्यासाठी असावे हा भांडवलशाही व्यवस्थेतला समज आहे, जिथे व्यक्तीची किंमत तिच्या आर्थिक स्थितीवरून केली जाते. शिक्षणातून समाजभान मिळवणे, आपली वैयक्तिक जीवनदृष्टी निर्माण करणे आणि माणूस म्हणून आपला, केवळ आर्थिक नाही, तर सर्वागीण विकास साधणे ही समजूत हरवत चालली आहे. म्हणूनच देशात सामाजिक व राजकीय पातळीवर तप्त वातावरण असताना, लोकशाही धोक्यात आली असतानाही अनेकजण याकडे डोळेझाक करू शकतात. आपला देश सध्या ऐतिहासिक कालखंडातून जात आहे. सीएए आणि एनआरसी या कायद्यांवरून दिल्ली, आसाम अशा भागातील प्राथमिक आंदोलनांनंतर लगेचच जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी इथे पोलिसांकडून झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातील तरु ण पिढी खाडकन जागी झाली आणि स्वतर्‍हून आंदोलनांच्या केंद्रस्थानी आली. यानंतर सुरू असणारी रस्ते भरून टाकणारी आंदोलने, विविध विद्यापीठांमधून जामिया आणि जेएनयूला दिला गेलेला पाठिंबा, सोशल मीडियावरील प्रखर विरोध, फैझच्या कवितांचा मारा हे सगळं आपल्या समोर आहेच. पण इथे ‘तरु ण पिढी’ हा शब्द एकांगीपणे वापरणे चुकीचे ठरेल. अशीही अनेक तरु ण मंडळी आहेत ज्यांना देशात होणार्‍या या घडामोडींचा अर्थ लावता येत नाहीये. गेल्या काही दिवसात सायन्सवाल्या उच्चशिक्षित मित्न-मैत्रिणींकडून ‘हे सीएए/एनआरसीबद्दल नक्की काय चाललय?’ असे प्रश्न येताहेत. एकीकडे बहुतांशी मुख्य प्रवाही मीडियामध्ये सरकारचे अंधभक्तांसारखे समर्थन होत असताना, त्याचवेळी सोशल मीडिया आणि रस्त्यावरील आंदोलनात सरकारवर दुर्लक्ष न करता येण्यासारखी तीव्र टीका होत असताना, सामाजिक बाबतीत एरव्ही तटस्थ राहणार्‍यांमध्ये आता अगदी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणती बाजू घ्यायची हे त्यांना कळत नाहीये. -याचे कारण म्हणजे समाजभानाचा अभाव. हा अभाव येतो इतिहास, समाजशास्त्न, राज्यशास्त्न यांसारख्या विषयांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, तसेच या विषयांच्या परस्परसंबंधांची, त्यांच्या एकत्रित अस्तित्वाची जाणीव नसल्यामुळे. या अभावामुळे धर्माच्या निकषावर नागरिकता ठरवणे म्हणजे लोकशाही या मूलभूत संकल्पनेच्या विरोधात जाणे आहे हेच अनेकांना कळत नाही. दुसरीकडे सीएए/एनआरसी या कायद्यांना पाठिंबा देणारे सरकारचे समर्थकही अनेक आहेत. सरकारने आणलेला कायदा हा आपल्या भल्यासाठीच असणार, कायद्यांसारख्या कठीण गोष्टी समजण्याची सामान्य नागरिकांची कुवत नाही व त्यामुळे हे काम सरकारवर सोपवावे, अशी एकूण त्यांची धारणा. यामध्ये हिंदुत्ववादी भारताची सुप्त इच्छाही दडलेली.

 या सगळ्यामध्ये जास्त चिंतेची बाब म्हणजे आता मतभिन्नता असलेल्या दोन व्यक्तींशी संवाद साधणे अशक्य होऊन बसले आहे. एकदा संवाद थांबला की कट्टरता फोफावते; पण हा संवाद का आणि कसा थांबला? ही काही एका दिवसात घडलेली गोष्ट नाही. हे पद्धतशीररीत्या घडवून आणलेले आहे. ते कसे हे समजण्यासाठी सामाजिकशास्त्रांची मदत घ्यावी लागते. कोणताही अर्थपूर्ण संवाद घडण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये एक प्रकारचे कॉमन ग्राउण्ंड असावे लागते. म्हणजेच त्यांचा एकूण समाजाकडे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यातील काही मूलभूत संकल्पना आणि तत्त्वे अगदी हुबेहूब नाहीत तरी काही प्रमाणात सारखी असावी लागतात. जिथे मतभेद असतात तिथे समोरच्याची बाजू एकूण घेण्याची तयारी असावी लागते. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शिक्षणातून तयार होतो. समाजशास्त्न, मानवशास्त्न, राज्यशास्त्न, भाषा हे विषय कशासाठी आहेत? तर आपला जो दृष्टिकोन आहे तो मानवी हक्कांना धरून असावा, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाहीतील तत्त्वांशी मेळ खाणारा असावा, विविधता जपून शाश्वत विकासाकडे वाटचाल करणारा असावा म्हणून. तसेच एकूण समाजाचं चलनवलन कसं होतं, वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांमध्ये समाजातील वेगवेगळ्या संस्था कशा आकाराला येतात, त्यामध्ये धर्म-वंश-वर्ण-लिंग कसे बदल घडवून आणतात याचे आकलन होण्यासाठी. गेल्या काही वर्षामध्ये शाळेतील इतिहासाचा अभ्यासक्र म हा अशा पद्धतीने बदलला जातोय, की ज्यातून हिंदुत्ववादी दृष्टिकोन ठसवला जातो. सामाजिक विचारविश्वात देशभक्तीच्या नावाखाली असहिष्णुता पसरवली गेली आहे. अगदी सिनेमा, मालिकांमधूनसुद्धा देशप्रेम उतू जात आहे.मुख्य विचारप्रवाहात घडवून आणल्या जात असलेल्या या बदलांमधून समानता व धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्त्वेच पुसली जात आहेत हे लक्षात घ्या. यामुळे संवादासाठी कोणतेही कॉमन ग्राउण्ड उरत नाही. संवादाअभावी लोकशाही मरते. ही प्रक्रि या समजून घेण्यासाठी सामाजिकशास्त्नांची समज असावी लागते, जी आपल्या ज्ञानाच्या उपयुक्ततेच्या संकल्पनेमुळे अपुरी राहाते. यावर सामाजिकशस्त्नांमधील विषयांचे वाचन व या शाखेतील लोकांशी संवाद साधणे ही प्राथमिक उत्तरे आहेत. त्यानंतरचे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मात्न व्यवस्थेत बदल आणावा लागेल. ( सईने पुणे विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी घेताना नुकतंच सुवर्णपदक मिळवलं आहे.)