शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

हॅमर आणि नेल

By admin | Updated: July 23, 2015 18:06 IST

दुष्काळाबद्दल जे काही वर्तमानपत्रतून वगैरे कळत असतं, ते प्रत्यक्षात पाहावं म्हणून दुष्काळी भागात जाऊन काम करायचं ठरवलं.

- शतानंद पाटील
 
दुष्काळाबद्दल जे काही वर्तमानपत्रतून वगैरे कळत असतं, ते प्रत्यक्षात पाहावं म्हणून दुष्काळी भागात जाऊन काम करायचं ठरवलं. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील चार गावांत दोन महिने प्रत्येक शनिवार-रविवारी जात होतो. आमचं मुख्य काम होतं ते म्हणजे प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची माहिती देणं. ती कामं सुरू करून देण्यास हातभार लावणं. त्यानुसार रोजगार हमी योजनेचा अभ्यास करून आम्ही गावात जाऊन पोहोचलो. 
 नमुना अर्ज भरून घेणं, बँकेत खाती उघडणो अशा कामांना सुरुवात केली. मी आंबेवाडी नावाच्या गावात गेलो असताना बाइकवरून पडलो. पायाला, हाताला, हनुवटीला थोडं लागलं. गावात किंवा जवळपास उपचारांची सोय नव्हती. उपचारांकरिता थेट 12-13 किमी अंतरावरील इगतपुरीच्या रुग्णालयात जावं लागलं. तेव्हा डोक्यात मास्लोचं का 'If you have only a hammer, you tend to see every problem as nail' हे वाक्य आठवलं. 
मग म्हटलं गावांमध्ये इतरही प्रश्न आहेत. ते आपल्याला सोडवता नाही आले तरी निदान त्यांची नोंद तरी घेता आली पाहिजे. ते आपल्याला कळले पाहिजेत.
पण बघा, आमच्या मोहिमेचे दोन महिने संपूनही कुठल्याच गावात कामाला सुरु वात झाली नाही. त्याची कारणं शोधताना बरेच निष्कर्ष काढले. या कामाची लोकांना फार गरज वाटत नाही का? त्यांचं सगळं ‘व्यवस्थित’च चाललं होतं किंवा जी काही परिस्थिती होती त्याची सवयच होऊन गेली होती त्यांना? मला प्रश्नच होते. तसं आम्ही शेवटच्या मीटिंगमध्ये प्रगती अभियानच्या आश्विनीताईंना सांगितलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं-
‘‘कुठल्याही समाजात/व्यवस्थेत एक ठरावीक काळ गेल्यानंतर आपोआपच एक समतोल तयार होतो किंवा तसं वाटतं. आपल्याला फक्त हे ओळखता आलं पाहिजे की हा समतोल वाईट स्थितीतला आहे की चांगल्या. आणि तो जर वाईट स्थितीतला असेल तर आपल्याला काम करण्याची नक्कीच गरज आहे.’’
 यानंतर कामाच्या गरजेबद्दल मुळीच शंका उरली नाही. फक्त कामाच्या पद्धतीत बदल हवा, अजून चांगली जनजागृती करायला हवी असं मला वाटलं. महत्त्वाचं म्हणजे प्रश्न दिसायला-कळायला आणि पडायलाही लागले.