शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

हॅमर आणि नेल

By admin | Updated: July 23, 2015 18:06 IST

दुष्काळाबद्दल जे काही वर्तमानपत्रतून वगैरे कळत असतं, ते प्रत्यक्षात पाहावं म्हणून दुष्काळी भागात जाऊन काम करायचं ठरवलं.

- शतानंद पाटील
 
दुष्काळाबद्दल जे काही वर्तमानपत्रतून वगैरे कळत असतं, ते प्रत्यक्षात पाहावं म्हणून दुष्काळी भागात जाऊन काम करायचं ठरवलं. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील चार गावांत दोन महिने प्रत्येक शनिवार-रविवारी जात होतो. आमचं मुख्य काम होतं ते म्हणजे प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची माहिती देणं. ती कामं सुरू करून देण्यास हातभार लावणं. त्यानुसार रोजगार हमी योजनेचा अभ्यास करून आम्ही गावात जाऊन पोहोचलो. 
 नमुना अर्ज भरून घेणं, बँकेत खाती उघडणो अशा कामांना सुरुवात केली. मी आंबेवाडी नावाच्या गावात गेलो असताना बाइकवरून पडलो. पायाला, हाताला, हनुवटीला थोडं लागलं. गावात किंवा जवळपास उपचारांची सोय नव्हती. उपचारांकरिता थेट 12-13 किमी अंतरावरील इगतपुरीच्या रुग्णालयात जावं लागलं. तेव्हा डोक्यात मास्लोचं का 'If you have only a hammer, you tend to see every problem as nail' हे वाक्य आठवलं. 
मग म्हटलं गावांमध्ये इतरही प्रश्न आहेत. ते आपल्याला सोडवता नाही आले तरी निदान त्यांची नोंद तरी घेता आली पाहिजे. ते आपल्याला कळले पाहिजेत.
पण बघा, आमच्या मोहिमेचे दोन महिने संपूनही कुठल्याच गावात कामाला सुरु वात झाली नाही. त्याची कारणं शोधताना बरेच निष्कर्ष काढले. या कामाची लोकांना फार गरज वाटत नाही का? त्यांचं सगळं ‘व्यवस्थित’च चाललं होतं किंवा जी काही परिस्थिती होती त्याची सवयच होऊन गेली होती त्यांना? मला प्रश्नच होते. तसं आम्ही शेवटच्या मीटिंगमध्ये प्रगती अभियानच्या आश्विनीताईंना सांगितलं तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं-
‘‘कुठल्याही समाजात/व्यवस्थेत एक ठरावीक काळ गेल्यानंतर आपोआपच एक समतोल तयार होतो किंवा तसं वाटतं. आपल्याला फक्त हे ओळखता आलं पाहिजे की हा समतोल वाईट स्थितीतला आहे की चांगल्या. आणि तो जर वाईट स्थितीतला असेल तर आपल्याला काम करण्याची नक्कीच गरज आहे.’’
 यानंतर कामाच्या गरजेबद्दल मुळीच शंका उरली नाही. फक्त कामाच्या पद्धतीत बदल हवा, अजून चांगली जनजागृती करायला हवी असं मला वाटलं. महत्त्वाचं म्हणजे प्रश्न दिसायला-कळायला आणि पडायलाही लागले.