शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अपवादात्मक प्रवास ! शहर स्व-भान देतं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 09:42 IST

अंजनगाव सुर्जी ते पुणं हे अंतर काही फार मोठं नाही. पण गाव सुटतं आणि शहर आपलं वाटू लागतं या दरम्यानचा प्रवास मात्र मोठा आहे.. तो स्वातंत्र्याचा श्वास घेऊ देतो तसं जबाबदारीचं भानही देतं..

- ऐश्वर्या चंद्रकांत अंबुलकरअंजनगाव सुर्जी. अमरावती जिल्ह्यातील एक तालुका. म्हणायला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध; पण तरीही सारं जेमतेमच. दहावीपर्यंत उत्तम शिक्षण झालं. त्यानंतर मात्र काहीतरी करण्याची जिद्द ठेवणारा आणि घरच्यांचं पाठबळ असणारा प्रत्येक जण शहराकडे धाव घेतो. साधारणत: मुलं अकरावी बारावीकरता अमरावती किंवा अकोला ही जवळची शहर गाठायची. त्यानंतर ज्याच्या त्याच्या गुणवत्तेप्रमाणे महानगरात दाखल व्हायचं अशी इथली पद्धत.

माझा प्रवास जरासा अपवादच.घरच्यांच्या विरोधाचं पाठिंब्यात आणि नकाराचं होकारात परिवर्तन करून माझी मोठी बहीण अकोल्याला शिकायला गेली. तिची बारावी म्हणून आई तिच्यासोबत अकोल्यात राहायला गेली. आणि त्यामागोमाग मीही गेले. तेव्हा मी आठवीत होते.माझं स्थलांतर तेव्हाच झालं.खरं तर बाबांना, गावाला आणि मैत्रिणींना सोडून नवीन अनोळखी ठिकाणी जाण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. नाइलाज म्हणून मी तिथे गेले. मात्र त्या शहराने मला आपलंसं केलं. घरी न सांगता मैत्रिणीची टू व्हीलर चालवून बघणं, एकटीने बसमधून प्रवास करणं. यासारखे आनंदाचे पहिलेवहिले क्षण मला याच शहराने दिले.अकरावी बारावीसाठी मी अमरावतीच्या बियाणी कॉलेजला प्रवेश घेतला. तो शिक्षणाचा टर्निंग पॉइंट. माझ्यासोबत असणाºया विद्यार्थ्यांची जिद्द, तळमळ, हुशारी, स्मार्टनेस बघून असं वाटलं की आपण किती लहान आहोत, किती मागास आहोत. शहरातल्या नानाविध गोष्टींच्या अस्तित्वाची मला जाणीवही नव्हती. माझ्यासारख्या विहिरीतल्या जिवाला सागराचं दर्शन झालं म्हणा ना!माझ्या आजूबाजूचे सगळेच मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या गोष्टी करायचे. मला मात्र यापेक्षा काहीतरी वेगळं पलीकडच करावं असं वाटलं. थोडा अभ्यास केल्यानंतर लॉ करायचं ठरवलं.त्यासाठी पुणं गाठणंच भाग होतं. आयएलएस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि एका वेगळ्या, नवीन आणि सुंदर दुनियेत आल्यासारखं वाटलं. साध्या सिटी बसेससुद्धा मी कधी बघितल्या नव्हत्या. एकही सिग्नल नसलेल्या अंजनगावमधली मी संध्याकाळचं एफसी रोडचं ट्राफिक बघून थक्क व्हायचे. मोठमोठे मॉल्स, आलिशान जागा, बघतच राहावं अशी पर्यटनस्थळ, सगळीकडे नुसता झगमगाट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाट्टेल तसं, वाट्टेल तेव्हा, वाट्टेल ते करण्याचं स्वातंत्र्य मला पुण्यानं दिलं. मला सुचेचना काय करावं, काय करू नये. पण मला चांगली माणसं भेटत गेली. काही जिवाला जीव देणारी, दुनियादारीचे अनुभव देणारी, काही कायम साथ देणारी आणि खूप काही शिकवून जाणारी.तीन वर्ष होत आली आता या शहरामध्ये पण अजूनही नावीन्य संपलं नाही. हे अनोळखी शहर मला आपलं वाटू लागलं आहे ते इथल्या माणसांमुळे. आपण शहराला मनापासून आपलं मानलं तर तेही दोन्ही हात पसरून आपलं स्वागत करतं. स्वत:मधे सामावून घेतं. आपण ज्या उद्देशानं, जे मिळवण्यासाठी इथं आलो हे लक्षात मात्र ठेवायचं. त्यानं खंबीर वाटतं. चांगल्या-वाईटाची थोडी समज येते. कुतूहल असतंच; पण त्यात वाहवून जायचं नसतं हेही आपलं आपल्यालाच कळतं.मोठ्या शहराकडे देण्यासाठी अमर्याद गोष्टी असतात. आपल्याला नेमकं काय हवंय ते ओळखायला लागतं. गावातली मुलगी म्हणून गावठी असा टॅग मलाही सुरुवातीला लावण्यात आला; पण असा विचार करणाºया, स्वत:ला सोफिस्टिकेटेड म्हणवून घेणाºया लोकांकडे मी साफ दुर्लक्ष केलं. उलट त्यांच्यातल्या सकारात्मक गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला.लहानपणापासून शहरात आणि गावात वाढलेल्या दोन व्यक्तींमध्ये आणि त्याच्या राहणीमानात फरक असणारच. या फरकाकडे उणीव म्हणून नाही तर प्रगतीची संधी म्हणून बघावं. शिखरावर कायमच जागा असते या म्हणीचा खरं अर्थ मग शहरात कळतो.मला तो पुण्यात कळला.अंजनगाव सुर्जी ते पुणे हे अंतर तसं फार नाही; पण हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे.माझ्यासारखे कित्येक लोक गावातून शहरात येतात. परदेशात जातात. स्वत:ची ओळख निर्माण करतात. ही शहरच त्यांना आपलंसं करतात.आणि तरीही मनात गावची ओढ कायम असते..गावं आपलीच असतात, शहरंही आपली होतात.(अंजनगाव सुर्जी, अमरावती)

 

टॅग्स :Travelप्रवास