शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

माहितीचा,प्रश्नांचा आणि उत्तरांचाही दुष्काळ

By admin | Updated: July 23, 2015 18:12 IST

दुष्काळ म्हटला की कडक उन्हाचा तडाखा, भेगा पडलेली शेतं, चातक पक्ष्याप्रमाणो ढगाकडे पावसाची वाट पाहत बसलेला एक म्हातारा असे फोटो आपण वृत्तपत्रंत कायम पाहिलेले असतात.

- विकास भीमराव वाघमोडे 
 
खरंच दुष्काळ म्हणजे फक्त पाणीटंचाईच का?
दुष्काळ म्हटला की कडक उन्हाचा तडाखा, भेगा पडलेली शेतं, चातक पक्ष्याप्रमाणो ढगाकडे पावसाची वाट पाहत बसलेला एक म्हातारा असे फोटो आपण वृत्तपत्रंत कायम पाहिलेले असतात.
मी दोन महिने या मोहिमेत पूर्णवेळ काम करायचं ठरवलं आणि मराठवाडय़ात पोहचलो. ज्याच्यावर ‘ऊस तोडणीवाल्यांचा जिल्हा’ असा शिक्का आहे, त्या बीड जिल्ह्यातील नित्रुड (ता. माजलगाव) या गावी मी काम केलं. काम करण्याआधी ‘दुष्काळ विरुद्ध पाणी’ असंच एक चित्र माङया मनात होतं. पाणी नाही तो दुष्काळ. परंतु प्रत्यक्ष काम करताना माझी दुष्काळाविषयी संकल्पनाच बदलली. 
खरंच दुष्काळ म्हणजे फक्त पाणीटंचाईच का? माङया मते खरंतर दुष्काळ म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभाव. मग तो रोजगाराचा असेल, शिक्षणाचा असेल, सरकारी योजनांचा असेल, नाही तर स्वत:च्याच गावामध्ये ऊसतोडणीनंतर परत आल्यावर न मिळणा:या विकासाचा. 1क् एप्रिल 2क्15, प्रथमच या भागात आलो आणि तेही काहीतरी आव्हानात्मक करायचं आहे असं ठरवून. गाव फिरताना सर्वत्र दिसली ती उदासीनता. बस स्टँडवर निवांत बसलेले लोक (वयोवृद्ध फक्त, कारण तरु णवर्ग ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाला होता), शेतात दिसलं ते वाळलेलं कापसाचं पीक. हे सर्व पाहताना मनात एकाच प्रश्नाचा कल्लोळ माजला ‘आपण खरंच स्वतंत्र झालोय का?’ या लोकशाहीप्रधान देशात ज्या विकासाच्या योजनांसाठी एवढा अमाप पैसा खर्च केला जातो त्या योजना खरंच तळातील लोकांपर्यंत पोहचल्या आहेत का?
मग तेव्हाच ठरवलं  6क् दिवस आपल्याकडे आहेत. या 6क् दिवसांत किमान सहा समस्या तरी आपल्यापरीने समजून घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करायच्या. एक समस्या सोडवायला घेतली आणि दुसरी समस्या दिसत गेली. रोजगार हमी योजना गावात सुरू करायची या एकाच समस्येवर भर दिला होता. आणि त्याच वेळी इतर समस्या दिसल्या. 
गावात फिरताना एक जाणवलं की, दलित आणि मुस्लीम वस्तीमध्ये विकासाचा खूप अभाव आहे. मग ठरवलं, फक्त या दोन वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करायची. येथीलच समस्या जाणून घ्यायच्या. मुस्लीम वस्तीमधील लोकांमध्ये जागृती करताना लोक जास्त संवाद करत नव्हते. मग मशिदीत जाऊ लागलो. त्यामुळे नंतर जाणवलं की लोक बोलू लागले.
रोजगार हमी योजनेची ब:यापैकी जागृती केली. मग लोक स्वत:हून भेटायला लागले. गावातीलच एका जोडप्याने (बाळासाहेब व वर्षाताई आवाड) खूप मदत केली. मात्र इथंच कळलं की, ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ म्हणजे काय असतं.  ग्रामसेवक ते तहसीलदार सर्वाना भेटून सतत सांगावं लागायचं. एवढं करून येऊ घातलेल्या पावसाळ्यामुळे काम काही सुरू झाले नाही. फक्त कामाचे अंदाजपत्रक तेवढे तयार झाले. 
रोहयो जागृतीसाठीच गावात फिरताना एका बाईने तिचे वीजबिल सांगितले 13 हजार रुपये. मी तिचे वीजबिल पाहिले तर त्यावर मीटरचा फोटोच नव्हता. मग वस्तीमधील ब:यापैकी लोकांची बिलं पाहिली, तर गेल्या दोन वर्षात फक्त डिसेंबर महिन्यातीलच बिलांवर मीटरचा फोटो होता. मग ऑनलाइन आणि कार्यालयात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर कार्यालयाने ज्या ठेकेदाराला फोटो काढण्याचा ठेका दिला होता, त्याच्या जागी नवा ठेकेदार नेमल्याची माहिती मिळाली. 
आरोग्य केंद्राचे उपकेंद्र तर लसीकरणाव्यतिरिक्त चालूच नसायचे. मग ऑनलाइन आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. या समस्येचं काय झालं हे प्रत्यक्ष पाहायला मी गावात राहू शकलो नाही; पण हे उपकेंद्र अधूनमधून उघडू लागल्याचं आता लोकांच्या फोनवरून कळतंय.
इथला सगळ्यात मोठा प्रश्न होता ऊसतोडणीसाठी होणा:या स्थलांतराचा. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा कसा होतो, शेतीचं नुकसान कसं होतं हे समजलं. 
ऊसतोडणीवरून गावाकडे परतताना अपघातामुळे एक बाई पूर्णपणो झोपून आली होती. तिला कोण मदत करणार? मग जाणवलं की जर या बाईचा अपघाती विमा असता तर तिला पैसे मिळाले असते. त्याच वेळी पंतप्रधानांनी दोन विमा योजनांची घोषणा केली होती. त्याबाबत मग जागृती केली. चक्क लोकांनी दुस:याच दिवशी बॅँकेमध्ये जाऊन पैसे भरले.
भ्रष्टाचाराचे तर अनेक अनुभव मला या काळात जवळून पाहता आले, काहीतर अनुभवता आले.  समस्या सोडवता सोडवता मला  एकच समजलं की, समस्या म्हणजे सृजनशीलतेचा अभाव. जरा वेगळा विचार, माहिती, योग्य प्रश्न या सा:याचाही गावखेडय़ात दुष्काळच आहे.
आणि तो दुष्काळ कसा हटवायचा, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहेच!